शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पॉलिहाऊस व शेडनेटधारक शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करावे- शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 11:42 IST

कोल्हापूर : पॉलिहाऊस व शेडनेटधारक शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, प्लास्टिक फुलांवर कायमस्वरूपी बंदी आणावी, शेतीमालास हमीभाव बाजारपेठ उपलब्ध ...

ठळक मुद्देपॉलिहाऊस व शेडनेटधारक शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करावेशेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन

कोल्हापूर : पॉलिहाऊस व शेडनेटधारक शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, प्लास्टिक फुलांवर कायमस्वरूपी बंदी आणावी, शेतीमालास हमीभाव बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, शेतीपूरक व्यवसायासाठीचे अनुदान ९० टक्के करण्यात यावे, यांसह विविध मागण्यांसाठी पॉलिहाऊस व शेडनेटधारक शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तरुण शेतकरी व महिला मोठ्या प्रमाणात पॉलिहाऊस शेतीकडे वळाल्या आहेत; मात्र गेल्या चार-पाच वर्षांत दुष्काळ, नोटाबंदी अशा विविध कारणांमुळे हे शेतकरी अडचणीत आले आहेत.

नुकताच ओला दुष्काळाचा सामना करावा लागला आहे; त्यामुळे कर्जासह व्याजाची परतफेड करणे शेतकऱ्यांना शक्य नाही. पॉलिहाऊस शेडनेटमधील जरबेरा, डच, गुलाब, कार्नेशन, कलर कॅप्सिकम, व अन्य भाजीपाल्याला हमीभाव नसल्याने व कृत्रिम फुलांमुळे कवडीमोल किंमत मिळत आहेत.वरील अडचणींचा विचार करून शासनाने कर्जमाफीसह यंदा अनुदानासाठीचा कालावधी वाढवून द्यावा, पुनर्लागवडीचा खर्च द्यावा, खते व कीटकनाशकांवरील कर माफ करावा, अनुदान नाकारलेल्या प्रकल्पांना तत्काळ मंजुरी द्यावी, विमा संरक्षणअंतर्गत त्वरित नुकसानभरपाई मिळावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. शिष्टमंडळात संघटना अध्यक्ष अ‍ॅड. माणिक शिंदे, राजश्री निंबाळकर, बाळासो शिंदे, विजय नाईक, रवींद्र वाळवेकर, प्रकाश कांबळे, सदानंद पाटील, सहदेव मिरजे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर