शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

तक्रारी, तरीही अंगणवाडी ताईंना मोबाईलच कामाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 4:18 AM

नसिम सनदी-लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि हाताळणीसंदर्भात काही तांत्रिक अडचणी असल्या, तरी कोल्हापुरातील अंगणवाडी ताईंना ...

नसिम सनदी-लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि हाताळणीसंदर्भात काही तांत्रिक अडचणी असल्या, तरी कोल्हापुरातील अंगणवाडी ताईंना मोबाईलच सर्वाधिक कामाचा ठरत असल्याचे दिसत आहे. कामेही झटपट होत असल्याने मोबाईल हा अंगणवाड्यांसाठी आता अविभाज्य घटक बनला आहे.

अंगणवाड्यांच्या कामात गती आणि पारदर्शकता यावी, या हेतूने दोन वर्षांपूर्वी राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडी सेविकांना मोफत मोबाईल दिले. दरवर्षाला १६०० रुपयांची रक्कम इंटरनेटसाठी डाटा पॅक मारण्यासाठीही आगाऊ खात्यावर जमा करण्याची तरतूद केली.

अंगणवाडी सेविकांना रोजच्या रोज २५ प्रकारची रजिस्टर भरावी लागतात. ती हातानेच भरली जात होती. आता हे सर्व काम मोबाईलवर होत आहे. रजिस्टरवर नाेंदीसाठी जितका वेळ लागत होता, त्यापेक्षा कमी वेळ मोबाईलवर माहिती भरताना लागतो. शिवाय जेव्हा गरज वाटेल तेव्हा एका क्लिकवर ही माहिती उपलब्ध होत असल्याने अंगणवाडी ताईंचे काम सोपे झाले आहे.

लॉकडाऊन काळात तर मोबाईलच्या या उपक्रमाची खूपच मदत झाली. एकट्या कोल्हापूर जिल्हा परिषदेने आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ३ हजार ९९४ अंगणवाड्या व्हॉटस‌्-ॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र जोडल्या. त्यातही अंगणवाडी सेविका, स्तनदा माता, गरोदर माता, बालकांचे पालक असे वेगवेगळे दहा हजार ग्रुप तयार केले. या माध्यमातून आकार अभ्यासक्रमासह प्रबोधनही केले. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे गेली दहा महिने अंगणवाड्या बंद असल्या, तरी शिक्षण सुरूच राहिले आहे.

१) पॉईंटर्स

जिल्ह्यातील अंगणवाडी - ३९९४

अंगणवाडी सेविका - ३९९४

मोबाईल वाटप - ३९९४

२) मोबाईलवरून ही कामे करावी लागतात

अंगणवाडीत येणाऱ्या बालकांची हजेरी, वजन, उंची, पोषण, आहार यांच्या नोंदी ठेवणे, गरोदर, स्तनदा महिलांना आहार व औषधासह आरोग्याचे मार्गदर्शन, गृहभेटीद्वारे व्हिडीओ दाखवून प्रबोधन करणे.

३) अडचणी काय?

बालकांना शिकविण्यापासून ते त्यांना आहार देणे, किशोरी, गराेदर, स्तनदा माता यांच्या सर्व नोंदी मोबाईलवरच कराव्या लागत असल्याने बऱ्याचवेळेला मोबाईल हॅंग होण्याचे, बंद होण्याचेही प्रकार घडतात. कधी नेटवर्कचा हा प्रश्न येतो. सर्वात महत्त्वाची अडचण आहे, ती ज्येष्ठ सेविकांची. त्यांना मोबाईल हाताळणे अवघड जात असल्याने त्यांना इतरांच्या मदतीवर विसंबून रहावे लागते. याचा परिणाम दैनंदिन कामावर होतो, असे निरीक्षण सेविका असलेल्या आशा पाटील यांनी नाेंदवले.

४) महिला व बालकल्याण विभाग अधिकारी कोट

मोबाईलद्वारे अंगणवाडीचे सर्व कामकाज चालविण्याचा सर्वात चांगला प्रतिसाद कोल्हापुरातून मिळत आहे. मोबाईल बंद पडला, हरवला, तर पर्यायी मोबाईलची उपलब्धता करून देण्यासाठी स्वतंत्र कक्षही स्थापन केला आहे. या व्यवस्थेमुळे कामे जलद होत आहेत.

सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद