शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Kolhapur: मुडशिंगीतील सरकारी ३९ एकर जमिनीमध्ये प्लॉटिंगची तक्रार, ग्रामस्थांमध्ये संभ्रम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 18:29 IST

दलित, मातंग, चर्मकार बांधवांची जमीन

कोल्हापूर : शहराशेजारी आणि राष्ट्रीय महामार्गापासून जवळच असलेल्या गडमुडशिंगी (ता.करवीर) येथील सरकारी ३९ एकर जमिनीमध्ये प्लाटिंग सुरू असल्याची तक्रार गावातील तरुण मंडळांनी करवीर तहसीलदारांकडे केली आहे. लोकमत हेल्पलाइनकडेही त्याची प्रत पाठवली आहे. हे प्लाटिंग नसून शेती कसण्यासाठी योग्य व्हावे यासाठी मोजणी सुरू असून, त्याद्वारे हद्द निश्चित करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये मात्र मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.मुडशिंगीजवळील ही ३९ एकर जमीन तीन समाजांसाठी शाहू महाराजांनी दिली आहे. सध्या या ठिकाणी हद्दीचे छाेटे खांब पुरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे हे प्लॉटिंग सुरू असल्याचा संभ्रम निर्माण झाल्याने गावातील तरुण मंडळांनी कोणाचेही नाव न घालता करवीर तहसीलदारांना मंगळवारी निवेदन दिले. मात्र या निवेदनात या कामात कोण आहे त्यांचे, अभियंता, खांब पुरणाऱ्यांचीही नावे देण्यात आली आहेत. तसेच हे प्लॉटिंग पैसे घेऊन सुरू असल्याचा आरोप करण्यात आला असून, एकीकडे वेळोवेळी गावसभेत मागणी करून क्रीडांगण मिळत नाही आणि या सरकारी जागेत प्लाॅटिंग कसे सुरू आहे, अशी विचारणा सुरू झाली आहे.

  • ‘लोकमत’ने अधिक माहिती घेतली असता ही जमीन तीनही समाजाची असून, पीकपाण्याला १९४९ पासून या समाजांची नावे आहेत. या समाजातील प्रमुख पाच, पाच अशा पंधराजणांची नावे सात बाराला लागावीत असा प्रस्तावही या समाजाकडून मंडल अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
  • परंतु तशी कोणाचीही नावे लावता येणार नाहीत असे मंडल अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर या ठिकाणी कोणालाच वैयक्तिक काही करता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले असून तीनही समाजांनी सामूहिक पद्धतीने या जमिनीचा वापर उदरनिर्वाहासाठी करावयाचा असल्याचे स्पष्ट केले आहे.

कसण्यासाठी सोय व्हावी म्हणूनही जमीन समाजाची आहे हे सर्वांनाच मान्य आहे. परंतु कसण्यासाठी नेमकी कोणाला किती जमीन द्यायची यासाठी मोजमाप करून हद्द ठरवण्याचे काम सुरू असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात येत आहे. परंतू अशा पद्धतीने हद्द ठरवून परस्पर कसण्यापेक्षा महसूल प्रशासनाला सोबत घेऊनच हे काम करावे लागेल, असे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.

मुडशिंगीतील तीन समाजांसाठी ही जमीन देण्यात आली आहे. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी देण्यात आलेल्या या जमिनीचा कोणालाही वैयक्तिक वापर करता येणार नाही किंवा वैयक्तिक कोणाचीही नावे लावता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. तरीही नेमका त्या ठिकाणी काय प्रकार सुरू आहे याची उद्या माहिती घेणार आहे. - आदित्य दाभाडे मंडल अधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूर