शहरं
Join us  
Trending Stories
1
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
2
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
3
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
4
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
5
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
6
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
7
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
8
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
9
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
10
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
11
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
12
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
13
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
14
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
15
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
16
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार शेतकऱ्यांची गेल्या महापुरातील भरपाई अडकली, प्रशासनाकडे पैसे पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 19:23 IST

त्रुटींमुळे अडकली रक्कम

कोल्हापूर : मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम अजूनही जिल्ह्यातील २ हजार शेतकऱ्यांना मिळालेली नाही. या शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्याने त्यांची ९९ लाख १८ हजार २१० इतकी रक्कम अजूनही जिल्हा प्रशासनाकडे आहे. यंदा मेमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणून लोकमतने गेल्यावर्षीच्या नुकसानीचे किती पैसे शेतकऱ्यांना मिळाले याची माहिती घेतली.मागील वर्षी अतिवृष्टीमुळे काेल्हापूर जिल्हा महापुराच्या उंबरठ्यावरून परतला असला तरी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे नुकसान भरपाईची रक्कम थेट बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची ई-केवायसी करून घेणे बंधनकारक केले आहे.मात्र अजूनही १ हजार ९९२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही किंवा त्यांच्या ई-केवायसीमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांच्या खात्यावर रक्कम झालेली नाही. आता नव्या वर्षातील पावसाळा सुरू झाला. इथे आधीची रक्कम मिळायचा पत्ता नाही यावर्षी काय होणार या विचारानेच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

म्हणून अडकली ई-केवायसीई-केवायसी म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार नंबरला जोडून घ्यायचे आहे. पण अजूनही अनेक शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही. काही जणांचा आधार नंबर चुकला आहे तर काही जणांचे बँक खाते क्रमांक चुकले आहे. दुरुस्तीचे अर्ज देऊनही ते अपडेट झालेले नाही. अशा विविध कारणांमुळे ई-केवायसी योग्य झालेली नाही, ई-केवायसी नाही म्हणून रक्कम नाही असे हे त्रांगडे आहे.

दृष्टिक्षेपात नुकसान भरपाई..

  • बाधित शेतकरी : १ लाख ०८ हजार ८२९
  • जिल्ह्याला मिळालेली रक्कम : १२२ कोटी ४२ लाख ३७ हजार
  • मंजूर रक्कम : ९४ कोटी ५२ लाख १९ हजार ५३३
  • खात्यावर जमा झालेली रक्कम : ९१ कोटी ६८ लाख ८८ हजार ७६८
  • ई-केवायसी प्रलंबित शेतकरी : १ हजार ९९२
  • प्रलंबित रक्कम : ९९ लाख १८ हजार २१०
टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीfloodपूर