शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार शेतकऱ्यांची गेल्या महापुरातील भरपाई अडकली, प्रशासनाकडे पैसे पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 19:23 IST

त्रुटींमुळे अडकली रक्कम

कोल्हापूर : मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम अजूनही जिल्ह्यातील २ हजार शेतकऱ्यांना मिळालेली नाही. या शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्याने त्यांची ९९ लाख १८ हजार २१० इतकी रक्कम अजूनही जिल्हा प्रशासनाकडे आहे. यंदा मेमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणून लोकमतने गेल्यावर्षीच्या नुकसानीचे किती पैसे शेतकऱ्यांना मिळाले याची माहिती घेतली.मागील वर्षी अतिवृष्टीमुळे काेल्हापूर जिल्हा महापुराच्या उंबरठ्यावरून परतला असला तरी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे नुकसान भरपाईची रक्कम थेट बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची ई-केवायसी करून घेणे बंधनकारक केले आहे.मात्र अजूनही १ हजार ९९२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही किंवा त्यांच्या ई-केवायसीमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांच्या खात्यावर रक्कम झालेली नाही. आता नव्या वर्षातील पावसाळा सुरू झाला. इथे आधीची रक्कम मिळायचा पत्ता नाही यावर्षी काय होणार या विचारानेच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

म्हणून अडकली ई-केवायसीई-केवायसी म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार नंबरला जोडून घ्यायचे आहे. पण अजूनही अनेक शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही. काही जणांचा आधार नंबर चुकला आहे तर काही जणांचे बँक खाते क्रमांक चुकले आहे. दुरुस्तीचे अर्ज देऊनही ते अपडेट झालेले नाही. अशा विविध कारणांमुळे ई-केवायसी योग्य झालेली नाही, ई-केवायसी नाही म्हणून रक्कम नाही असे हे त्रांगडे आहे.

दृष्टिक्षेपात नुकसान भरपाई..

  • बाधित शेतकरी : १ लाख ०८ हजार ८२९
  • जिल्ह्याला मिळालेली रक्कम : १२२ कोटी ४२ लाख ३७ हजार
  • मंजूर रक्कम : ९४ कोटी ५२ लाख १९ हजार ५३३
  • खात्यावर जमा झालेली रक्कम : ९१ कोटी ६८ लाख ८८ हजार ७६८
  • ई-केवायसी प्रलंबित शेतकरी : १ हजार ९९२
  • प्रलंबित रक्कम : ९९ लाख १८ हजार २१०
टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीfloodपूर