शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

आयुक्तसाहेब, ‘केशवराव’चं पुढं काय झालं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 01:01 IST

उद्या, शुक्रवारपासून सुरू होणाºया ‘राज्य नाट्य’च्या स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना या गैरसोर्इंचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.राज्य शासनाच्या निधीतून २०१४ साली केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण झाले; पण आतून आणि बाहेरूनच केवळ देखणी, चकाचक इमारत सोडली तर नाट्यगृहातील प्राथमिक सुविधांच्या नावाने सगळा आनंदीआनंद आहे.

ठळक मुद्देउद्यापासून सुरू होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेच्या स्पर्धक, प्रेक्षकांना होणार त्रास नाट्यगृहात गैरसोर्इंची जंत्री : बैठकीवरच थांबला विषय

इंदुमती गणेश ।

कोल्हापूर : कोल्हापुरातील कलाविश्वाचे केंद्र असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहातील गैरसोर्इंची जंत्री वाढतच चालली आहे. या गैरसोर्इंबाबत मे महिन्यात आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कलाकारांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने एकही पाऊल उचलले गेले नाही. उद्या, शुक्रवारपासून सुरू होणाºया ‘राज्य नाट्य’च्या स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना या गैरसोर्इंचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे, राज्य शासनाच्या निधीतून २०१४ साली केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण झाले; पण आतून आणि बाहेरूनच केवळ देखणी, चकाचक इमारत सोडली तर नाट्यगृहातील प्राथमिक सुविधांच्या नावाने सगळा आनंदीआनंद आहे.

मूळ वास्तूचे बदललेले रुपडे सोडले तर इथे मेकअप रूम, नाटकांच्या सादरीकरणासाठी लागणारी लेव्हल, स्टेज, वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स, डिमर, स्पॉट, पडदे, नेपथ्यासाठी लागणाºया मूलभूत वस्तू या सगळ्या सुविधांची अक्षरश: वानवा आहे.नाट्यगृहातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी रंगकर्मींनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली होती. आयुक्तांनी ती तातडीने मान्य करीत मे महिन्यात ‘केशवराव’मधील गैरसोर्इंची पाहणी केली, रंगकर्मींच्या अडचणी

समजून घेतल्या आणि लवकरात लवकर त्यांवर उपाययोजना करण्याचे आश्वासनही दिले; पण त्या आश्वासनाची गाडी तिथेच पंक्चर झाली. त्यानंतर सुविधांच्या दृष्टीने एकही पाऊल महापालिकेच्या व्यवस्थापनाकडून उचलले गेलेले नाही. उद्यापासून राज्य नाट्य स्पर्धा सुरू होत आहेत. त्यासाठी येणा-या संघांना सादरीकरणासाठीची वास्तू सोडली तर कोणतीही सुविधा नाही. रंगमंचाचे प्राथमिक सेटदेखील मिलिंद अष्टेकर यांच्याकडून पुरविले जातात.

चालविता येत नसेल तर शासनाला परत कराराजर्षी शाहू महाराजांनी उभारलेले हे नाट्यगृह पूर्वी राज्य शासनाच्या अखत्यारित होते. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर महापालिकेने स्वत:हून त्याची जबाबदारी स्वीकारली. तेव्हापासून नाट्यगृहाचे दिवस बदलले, खुद्द राजर्षी शाहू महाराज आणि केशवरावांची छायाचित्रेही येथे बेदखल झाली. सुविधांच्या नावाने तर चांगभलंच! त्यामुळे महापालिकेला नाट्यगृह चालवणं जमणार नसेल तर त्यांनी ही वास्तू शासनाला परत करावी, अशी मागणी ज्येष्ठ नाट्य व्यावसायिकांनी केली आहे.नाट्य परिषद पुरविणार पाणीपिण्याचे पाणी ही महत्त्वाची गोष्टदेखील नाट्यगृहाच्या आवारात नाही. आता राज्य नाट्य स्पर्धा सुरू होत आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी असते. कलाकारांना सादरीकरणादरम्यान पाण्याची नितांत आवश्यकता असते, याचीही जाणीव महापालिका व संबंधित व्यवस्थापनाला नाही. अखेर स्पर्धा कालावधीत अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने कलाकार व प्रेक्षकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे.

 

  • या आहेत गैरसोयी
  • केशवरावांचा पुतळा नाही, तर छायाचित्र छतावर
  • पिण्याचे पाणी नाही, वॉटर कुलर्स बंद अवस्थेत
  • लेव्हल्स, बॉक्स सेट, पडदे, स्पॉटलाईट, पार लाईट्स, डीमर
  • हे प्राथमिक साहित्य नाही.
  • साउंड आॅपरेटर नाही
  • कलाकार व प्रेक्षकांसाठी
  • चहा, नाष्टा, सादरीकरणानंतर जेवण्यासाठी
  • कॅँटीन नाही.
  • अस्वच्छ व दुरवस्था झालेले स्वच्छतागृह
  • तिकीटविक्रीसाठी
  • खोली नाही
  • प्रवेशद्वारावर नाट्यगृहाच्या नावाची पाटी नाही, चांगली प्रकाश-योजना नाही.

 

नाट्यगृहाच्या गैरसोर्इंबाबत महापालिकेची दारे ठोठावून आम्ही आता दमलोय. आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा होती; पण पुढे काही झाले नाही. अशा परिस्थितीत राज्य नाट्य स्पर्धा रंगणार कशी आणि नाट्यचळवळ चालवायची कशी, हे महापालिकेने सांगावे.- आनंद कुलकर्णी, अध्यक्ष, अ. भा. मराठी नाट्यपरिषद, कोल्हापूर शााखासादरीकरणासाठीची वास्तू सोडली तर नाट्यगृहात कोणतीही सुविधा नाही. सांस्कृतिक संचालनालयाकडून ‘राज्य नाट्य’मधील संघांना सहा हजार रुपये दिले जातात. बाकी सगळी व्यवस्था त्यांनीच करायची. नाट्यगृहात आल्यानंतर कोणत्याही कारणासाठी कलावंत किंवा प्रेक्षकांना बाहेर जावे लागू नये अशा सोईसुविधा असल्या पाहिजेत.- मिलिंद अष्टेकर, उपाध्यक्ष, अ. भा. मराठी नाट्य परिषद

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNatakनाटक