शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
4
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
5
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
6
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
7
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
8
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
9
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
10
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
11
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
12
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
13
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
14
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
15
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
16
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
18
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
19
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

रंग, डिझाइन ठरेना.. १०० ई-बसेस धावेनात?; कोल्हापूरकरांना दीडवर्षे नुसतीच प्रतिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 16:23 IST

सप्टेंबरअखेर पायाभूत सुविधा होणार

कोल्हापूर : बुद्धगार्डन येथील ‘केएमटी’च्या कार्यशाळेत ई-बसेसच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा निर्माण करण्याची कामे गतीने सुरू असून जवळपास सत्तर टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामेही सप्टेंबरअखेर पूर्ण केली जाणार आहेत; परंतु ई-बसेसचे डिझाइन, रंग कोणता असावा यावरच अद्याप निर्णय झाला नसल्याने या बसेस केव्हा येणार याबाबत सगळेच अनभिज्ञ आहेत.महानगरपालिकेच्या परिवहन विभागाला (केएमटी) भाडेतत्त्वावर १०० ई-बसेस केंद्र सरकारकडून दिल्या जाणार आहेत. याबाबतचा निर्णय होऊन दीड वर्ष होऊन गेले. या ई-बसेससाठी लागणारे चार्जिंग स्टेशन आणि अद्ययावत डेपोसह पायाभूत सुविधा देण्याकरिता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास ३४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून चार्जिंग स्टेशन व डेपोची कामे सुरू करण्यात आली आहेत.बुद्धगार्डन येथील कार्यशाळेच्या प्रशस्त जागेवर पायाभूत सुविधा निर्माण करण्याची कामे अत्यंत गतीने सुरू झाली आहेत. डेपो अद्यावतीकरण करण्याची कामे महापालिकेतर्फे, तर चार्जिंग स्टेशनसाठी एच.टी. व एल.टी. लाइन टाकणे, पॅनेल, ट्रान्स्फॉर्मर बसविणे ही कामे महावितरण विभागाकडून केली जात आहेत. डेपोच्या इमारतीचे काम पूर्ण होऊन त्यावर स्लॅब टाकला आहे. तेथील सिव्हिलची सर्व कामे सप्टेंबरअखेर पूर्ण केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.एच.टी. लाइन टाकण्याचे केवळ साडेपाचशे मीटरचे काम राहिले आहे. गोकुळ शिरगाव येथे म्हसोबा मंदिरजवळ या कामात तांत्रिक अडचण आल्यामुळे थांबले आहे. सेवारस्त्यावरून ही लाइन ओढून घ्यावी, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. एल.टी. लाइनचे दोन ट्रान्स्फॉर्मर बसले आहेत. या कामाची मुदत संपल्यानंतर जादा दोन महिन्यांची वाढीव मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे एच.टी. व एल.टी. लाइनचे काम सप्टेंबरअखेर पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.

निवडणुकीनंतरच शक्यताइलेक्ट्रिक लाइन ओढून घेण्याबरोबरच डेपोचे काम सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जरी पूर्ण होत असले तर ज्यांच्यासाठी ही कामे हाती घेतली आहेत, त्या ई-बसेस केव्हा येणार याची उत्सुकता आहे. महापालिकेची निवडणूक झाल्यानंतरच ई-बसेस कोल्हापुरात धावतील, अशी अपेक्षा आहे.

१७ कोटींपैकी आले ३.३० कोटीअद्यावत डेपो आणि पायाभूत सुविधांकरिता केंद्र व राज्य सरकारने १७ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून आतापर्यंत ७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, मंजूर निधीपैकी केवळ ३ कोटी ३० लाख रुपयेच प्राप्त झाले आहेत.