शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
5
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
6
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
7
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
8
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
9
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
10
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
11
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
12
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
13
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
14
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
15
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
16
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
18
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
19
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
20
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद

रंग, डिझाइन ठरेना.. १०० ई-बसेस धावेनात?; कोल्हापूरकरांना दीडवर्षे नुसतीच प्रतिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 16:23 IST

सप्टेंबरअखेर पायाभूत सुविधा होणार

कोल्हापूर : बुद्धगार्डन येथील ‘केएमटी’च्या कार्यशाळेत ई-बसेसच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा निर्माण करण्याची कामे गतीने सुरू असून जवळपास सत्तर टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामेही सप्टेंबरअखेर पूर्ण केली जाणार आहेत; परंतु ई-बसेसचे डिझाइन, रंग कोणता असावा यावरच अद्याप निर्णय झाला नसल्याने या बसेस केव्हा येणार याबाबत सगळेच अनभिज्ञ आहेत.महानगरपालिकेच्या परिवहन विभागाला (केएमटी) भाडेतत्त्वावर १०० ई-बसेस केंद्र सरकारकडून दिल्या जाणार आहेत. याबाबतचा निर्णय होऊन दीड वर्ष होऊन गेले. या ई-बसेससाठी लागणारे चार्जिंग स्टेशन आणि अद्ययावत डेपोसह पायाभूत सुविधा देण्याकरिता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास ३४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून चार्जिंग स्टेशन व डेपोची कामे सुरू करण्यात आली आहेत.बुद्धगार्डन येथील कार्यशाळेच्या प्रशस्त जागेवर पायाभूत सुविधा निर्माण करण्याची कामे अत्यंत गतीने सुरू झाली आहेत. डेपो अद्यावतीकरण करण्याची कामे महापालिकेतर्फे, तर चार्जिंग स्टेशनसाठी एच.टी. व एल.टी. लाइन टाकणे, पॅनेल, ट्रान्स्फॉर्मर बसविणे ही कामे महावितरण विभागाकडून केली जात आहेत. डेपोच्या इमारतीचे काम पूर्ण होऊन त्यावर स्लॅब टाकला आहे. तेथील सिव्हिलची सर्व कामे सप्टेंबरअखेर पूर्ण केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.एच.टी. लाइन टाकण्याचे केवळ साडेपाचशे मीटरचे काम राहिले आहे. गोकुळ शिरगाव येथे म्हसोबा मंदिरजवळ या कामात तांत्रिक अडचण आल्यामुळे थांबले आहे. सेवारस्त्यावरून ही लाइन ओढून घ्यावी, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. एल.टी. लाइनचे दोन ट्रान्स्फॉर्मर बसले आहेत. या कामाची मुदत संपल्यानंतर जादा दोन महिन्यांची वाढीव मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे एच.टी. व एल.टी. लाइनचे काम सप्टेंबरअखेर पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.

निवडणुकीनंतरच शक्यताइलेक्ट्रिक लाइन ओढून घेण्याबरोबरच डेपोचे काम सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जरी पूर्ण होत असले तर ज्यांच्यासाठी ही कामे हाती घेतली आहेत, त्या ई-बसेस केव्हा येणार याची उत्सुकता आहे. महापालिकेची निवडणूक झाल्यानंतरच ई-बसेस कोल्हापुरात धावतील, अशी अपेक्षा आहे.

१७ कोटींपैकी आले ३.३० कोटीअद्यावत डेपो आणि पायाभूत सुविधांकरिता केंद्र व राज्य सरकारने १७ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून आतापर्यंत ७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, मंजूर निधीपैकी केवळ ३ कोटी ३० लाख रुपयेच प्राप्त झाले आहेत.