शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

कोल्हापूरच्या हद्दवाढीविरोधात येत्या गुरुवारी १८ गावांत बंद, सर्वपक्षीय हद्दवाढविरोधी समितीचा निर्धार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 15:20 IST

पालकमंत्र्यांना नैतिक अधिकार आहे का ?

कणेरी: कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीविरोधात १८ गावांच्या ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. १२) गाव बंद ठेवून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचा एकमुखी निर्धार केला. उजळाईवाडी येथे झालेल्या बैठकीत १८ गावच्या पदाधिकाऱ्यांनी हद्दवाढविरोधात लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला.उजळाईवाडी (ता. करवीर) येथील समर्थ मंगल कार्यालय येथे सर्वपक्षीय हद्दवाढविरोधी समितीच्या वतीने १८ गावांतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये हद्दवाढीतील प्रस्तावित गावे शिरोली, नागाव, वळीवडे, गांधीनगर, मुडशिंगी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, पाचगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, उंचगाव, कळंबे तर्फे ठाणे, नवे बालिंगे, वाडीपीर, आंबेवाडी, वडणगे, शिंगणापूर, नागदेववाडी, शिरोली औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत या गावांतील सरपंच, पदाधिकारी, नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती. उजळाईवाडीचे सरपंच उत्तम बांबवडे यांनी प्रास्ताविकेत संभाव्य हद्दवाढीचे भूत आपल्या मानगुटीवर घोंघावत असून, अठरा गावांतील नागरिकांचा विरोध शासनापर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी सामूहिक विरोधाची मोट बांधली पाहिजे, असे सांगितले.मुडशिंगीचे तानाजी पाटील म्हणाले, हद्दवाढ विरोधासाठी कमिटी स्थापन करून यामार्फत जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन विशेष ग्रामसभेमध्ये हद्दवाढीला विरोध दर्शवला पाहिजे. यावेळी उजळाईवाडीच्या उपसरपंच मेघा गुमाणे, गोकुळ शिरगावचे पी. एस. मगदूम, रघुनाथ कांबळे, उचगावचे महालिंग स्वामी, महेश चौगुले, किरण कुसाळे, आदींनी हद्दवाढीला विरोध दर्शवला.यावेळी गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, सदस्य रणजित पाटील, शामराव पाटील, संतोष गवळी, संदीप पाटील, टी. के. पाटील, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, जि. प. सदस्य महेश चौगुले, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगुले, सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी आडसूळ, वडणगेच्या सरपंच संगीता पाटील, मुडशिंगीच्या सरपंच अश्विनी शिरगावे, कळंबा सरपंच सुमन गुरव, शिंगणापूरच्या सरपंच रसिका पाटील, पाचगावच्या सरपंच प्रियांका पाटील, वाडीपीर सरपंच संदीप मिठारी, गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे, आदींसह १८ गावांतील पदाधिकारी उपस्थित होते. आभार किरण आडसूळ (सरनोबतवाडी) यांनी मानले.पालकमंत्र्यांना नैतिक अधिकार आहे का ?कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले हसन मुश्रीफ हे आपल्या कागल तालु्क्यातील सुळकूड योजनेतून इचलकरंजी महापालिकेला पाणी देत नाहीत. मात्र, १८ गावांचे मत विचारत न घेता, हद्दवाढीत गावांचा समावेश करणार असे म्हणतात. याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का?, असा सवाल यावेळी सर्वपक्षीय हद्दवाढ विरोधी समितीच्या वतीने करण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर