शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून कडवी नदीला पुनरुज्जीवन-केर्ले ते घोळसवडे-चांदोली दरम्यानच्या अडीच किलोमीटर पात्राची सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:13 IST

कडवी नदी पुनरुज्जीवन मोहिमेंतर्गत दुसºया टप्प्यात केर्ले ते घोळसवडे-चांदोली दरम्यानच्या अडीच कि.मी. नदीपात्राची सफाई व रुंदीकरण झाल्याची माहिती मोहीमप्रमुख राजेंद्र लाड व शिराज शेख यांनी दिली.

ठळक मुद्देमोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता

आंबा : कडवी नदी पुनरुज्जीवन मोहिमेंतर्गत दुसºया टप्प्यात केर्ले ते घोळसवडे-चांदोली दरम्यानच्या अडीच कि.मी. नदीपात्राची सफाई व रुंदीकरण झाल्याची माहिती मोहीमप्रमुख राजेंद्र लाड व शिराज शेख यांनी दिली. १ ते ५ मे दरम्यान मोहिमेच्या जागृतीसंदर्भात शेतकºयांच्या बैठका घेऊन दि. १० मे ते ५ जून या काळात मोहीम राबविली. चांदोलीच्या पुढील लव्हाळा, वारूळ, जावली या भागातील नदीची सफाई पुढीलवर्षी तिसºया टप्प्यात केली जाणार आहे. त्यादरम्यान शेतकºयांच्या भेटी घेऊन नदी पुनरुज्जीवनाचे महत्त्व रुजविले जाईल, असे लाड यांनी स्पष्ट केले.

कडवी नदीपात्रात गवत, झुडपे माजून, मातीचे ढीग (कुरव) पसरल्याने थोड्याशा पावसाने पाणी पात्राबाहेर पडून शिवाराची हानी होत होती. तसेच महामार्गावर पाणी येऊन अपघात घडत. म्हणून ‘लोकमत’ने या समस्येवर आवाज उठवून, कडवी खोºयातील शेतकºयांमध्ये जागृती केली. गेल्या वर्षापासून नदी पुनरुज्जीवनाची मोहीम राबविली जात आहे. काही ठिकाणी नदीचे पात्र साठ फूट, तर काही ठिकाणी शेतकºयांच्या अतिक्रमणामुळे तेच पात्र दहा फुटांवर शिल्लक राहिले होते. घोळसवडे पुलापासून ते चांदोली, घोळसवडे, धाऊडवाडा व जावली धाऊडवाडा येथील शेतकºयांची शिवारे कडवी नदीच्या दोन्ही काठांवर आहेत. या दरम्यानच्या अडीच किलोमीटर पात्रात शेतकºयांचे श्रमदान व लोकसहभागातून निधी जमवून जेसीबीच्या सहाय्याने पात्र चाळीस ते पन्नास फुटांपर्यंत रुंद केल्याने या परिसरातील शिवारात पाणी येऊन शेतीचे होणारे नुुकसान थांबणार आहे.मानोली ते मलकापूर अशी सतरा किलोमीटरची कडवी नदी पश्चिम भागातील ३५ गावांची जीवनवाहिनी आहे. मानोली ते वारुळ या दरम्यानच्या नऊ किलोमीटर नदीपात्रात सफाईचे मोठे काम आहे. उर्वरित कामास शासकीय निधी मिळविण्यासाठी तांत्रिक विकास आराखडा तयार करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचे चांदोलीचे सरपंच नामदेव पाटील व संदीप पाटील यांनी स्पष्ट केले.तहसीलदारांची जागृती1 नदी स्वच्छता मोहिमेत शेतकºयांमध्ये जागृती करण्यासाठी शेतकºयांच्या बैठकीला मार्गदर्शन करण्याची भूमिका तहसीलदार चंद्रशेखर सानप गेली दोन वर्षे पार पाडत आहेत. दुसºया टप्प्यातील दीड किलोमीटरचे पात्र स्वच्छ झाल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी मोहिमेला भेट देऊन जेसीबीचे सहकार्य केले. तसेच या मोहिमेला पाठबळ दिले.2 परिसरातील तरुण मंडळ व पत्रकार संघ, पाटबंधारे विभाग यांची या विधायक मोहिमेत मोलाची साथ मिळत आहे. स्वच्छतेबरोबर नदीचे नदीपण जपणारी काळजीवाहू समिती स्थापन करून नदीच्या प्रदूषणावर प्रतिबंध करून रुंद केलेल्या नदीपात्राच्या काठावर शेतकºयांच्या सहकार्यातून वृक्षारोपणाचे काम राबविले जाणार आहे.तीन गावांमध्ये जलसंधारणाला जोडनदीविकास आराखड्यास शिवाजी विद्यापीठाचे मार्गदर्शन.९२ तासांचे जेसीबीने खोदकाम.चांदोलीतील शेतकºयांचे श्रमदान.कडवीच्या निगराणीसाठी काळजीवाहू तरुणांची समिती स्थापणार.शिवाराची धूप रोखण्यासाठी स्थानिक जातीचे वृक्षारोपण.डोहांच्या पुनरुज्जीवनातून जैवविविधतेचे संवर्धन.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान