शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

लोकसहभागातून कडवी नदीला पुनरुज्जीवन-केर्ले ते घोळसवडे-चांदोली दरम्यानच्या अडीच किलोमीटर पात्राची सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:13 IST

कडवी नदी पुनरुज्जीवन मोहिमेंतर्गत दुसºया टप्प्यात केर्ले ते घोळसवडे-चांदोली दरम्यानच्या अडीच कि.मी. नदीपात्राची सफाई व रुंदीकरण झाल्याची माहिती मोहीमप्रमुख राजेंद्र लाड व शिराज शेख यांनी दिली.

ठळक मुद्देमोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता

आंबा : कडवी नदी पुनरुज्जीवन मोहिमेंतर्गत दुसºया टप्प्यात केर्ले ते घोळसवडे-चांदोली दरम्यानच्या अडीच कि.मी. नदीपात्राची सफाई व रुंदीकरण झाल्याची माहिती मोहीमप्रमुख राजेंद्र लाड व शिराज शेख यांनी दिली. १ ते ५ मे दरम्यान मोहिमेच्या जागृतीसंदर्भात शेतकºयांच्या बैठका घेऊन दि. १० मे ते ५ जून या काळात मोहीम राबविली. चांदोलीच्या पुढील लव्हाळा, वारूळ, जावली या भागातील नदीची सफाई पुढीलवर्षी तिसºया टप्प्यात केली जाणार आहे. त्यादरम्यान शेतकºयांच्या भेटी घेऊन नदी पुनरुज्जीवनाचे महत्त्व रुजविले जाईल, असे लाड यांनी स्पष्ट केले.

कडवी नदीपात्रात गवत, झुडपे माजून, मातीचे ढीग (कुरव) पसरल्याने थोड्याशा पावसाने पाणी पात्राबाहेर पडून शिवाराची हानी होत होती. तसेच महामार्गावर पाणी येऊन अपघात घडत. म्हणून ‘लोकमत’ने या समस्येवर आवाज उठवून, कडवी खोºयातील शेतकºयांमध्ये जागृती केली. गेल्या वर्षापासून नदी पुनरुज्जीवनाची मोहीम राबविली जात आहे. काही ठिकाणी नदीचे पात्र साठ फूट, तर काही ठिकाणी शेतकºयांच्या अतिक्रमणामुळे तेच पात्र दहा फुटांवर शिल्लक राहिले होते. घोळसवडे पुलापासून ते चांदोली, घोळसवडे, धाऊडवाडा व जावली धाऊडवाडा येथील शेतकºयांची शिवारे कडवी नदीच्या दोन्ही काठांवर आहेत. या दरम्यानच्या अडीच किलोमीटर पात्रात शेतकºयांचे श्रमदान व लोकसहभागातून निधी जमवून जेसीबीच्या सहाय्याने पात्र चाळीस ते पन्नास फुटांपर्यंत रुंद केल्याने या परिसरातील शिवारात पाणी येऊन शेतीचे होणारे नुुकसान थांबणार आहे.मानोली ते मलकापूर अशी सतरा किलोमीटरची कडवी नदी पश्चिम भागातील ३५ गावांची जीवनवाहिनी आहे. मानोली ते वारुळ या दरम्यानच्या नऊ किलोमीटर नदीपात्रात सफाईचे मोठे काम आहे. उर्वरित कामास शासकीय निधी मिळविण्यासाठी तांत्रिक विकास आराखडा तयार करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचे चांदोलीचे सरपंच नामदेव पाटील व संदीप पाटील यांनी स्पष्ट केले.तहसीलदारांची जागृती1 नदी स्वच्छता मोहिमेत शेतकºयांमध्ये जागृती करण्यासाठी शेतकºयांच्या बैठकीला मार्गदर्शन करण्याची भूमिका तहसीलदार चंद्रशेखर सानप गेली दोन वर्षे पार पाडत आहेत. दुसºया टप्प्यातील दीड किलोमीटरचे पात्र स्वच्छ झाल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी मोहिमेला भेट देऊन जेसीबीचे सहकार्य केले. तसेच या मोहिमेला पाठबळ दिले.2 परिसरातील तरुण मंडळ व पत्रकार संघ, पाटबंधारे विभाग यांची या विधायक मोहिमेत मोलाची साथ मिळत आहे. स्वच्छतेबरोबर नदीचे नदीपण जपणारी काळजीवाहू समिती स्थापन करून नदीच्या प्रदूषणावर प्रतिबंध करून रुंद केलेल्या नदीपात्राच्या काठावर शेतकºयांच्या सहकार्यातून वृक्षारोपणाचे काम राबविले जाणार आहे.तीन गावांमध्ये जलसंधारणाला जोडनदीविकास आराखड्यास शिवाजी विद्यापीठाचे मार्गदर्शन.९२ तासांचे जेसीबीने खोदकाम.चांदोलीतील शेतकºयांचे श्रमदान.कडवीच्या निगराणीसाठी काळजीवाहू तरुणांची समिती स्थापणार.शिवाराची धूप रोखण्यासाठी स्थानिक जातीचे वृक्षारोपण.डोहांच्या पुनरुज्जीवनातून जैवविविधतेचे संवर्धन.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान