शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

पाचवी ते बारावीचे वर्ग सकाळी गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 18:35 IST

CoronaVirus School Kolhapur-कडक उन्हाळ्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून माध्यमिक शाळा सकाळी साडेसात ते दुपारी बारा यावेळेत भरल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देपाचवी ते बारावीचे वर्ग सकाळी गजबजले माध्यमिक शाळा भरल्या : विद्यार्थ्यांना दिलासा

कोल्हापूर : कडक उन्हाळ्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून माध्यमिक शाळा सकाळी साडेसात ते दुपारी बारा यावेळेत भरल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.दरवर्षी दिनांक १ मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा सुरू होतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे सकाळ सत्रातील शाळा सोमवारपासून भरविण्यात आल्या. सकाळी सात वाजल्यापासून विद्यार्थी शाळेत येऊ लागले. त्यानंतर अर्ध्या तासामध्ये शाळांचा परिसर गजबजून गेला. प्रार्थना होऊन वर्ग भरले, त्यानंतर वेळापत्रकानुसार विविध विषयांचे तास घेण्यात आले.

दुपारी बारा वाजता शाळा सुटली. जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसणे आरोग्याच्यादृष्टीने त्रासदायक ठरणार होते. त्याचा विचार करून आणि विविध शिक्षक संघटनांनी केलेल्या विनंतीनुसार सकाळच्या सत्रात शाळा भरविण्यात आल्या. बहुतांश पालक त्यांच्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी आणि शाळा सुटल्यानंतर घरी नेण्यासाठी आले होते.

माध्यमिक शिक्षण विभागाने सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याचे परिपत्रक शनिवारी काढले. त्यामुळे काही शाळांना विद्यार्थ्यांना त्याबाबत सूचना देता आली नाही. या शाळांनी सोमवारी विद्यार्थ्यांना सूचना दिली असून, त्यातील काही शाळांनी आज (मंगळवार), तर काहींनी बुधवार (दि. १७)पासून सकाळी वर्ग भरविण्याचे नियोजन केले आहे.

 

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या