शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

दहावीत कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा, गुणपत्रिका १४ जूनला मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 13:42 IST

गतवर्षीपेक्षा यंदा विभागाचा निकाल घटला

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेत कोल्हापूर विभागाचा ९६.७३ टक्के निकाल लागला असून, विभागाने राज्यात दुसरा क्रमांक मिळवल्याची माहिती शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष महेश चोथे यांनी शुक्रवारी दिली. गतवर्षीपेक्षा यंदा १.७७ टक्क्यांनी विभागाचा निकाल घटला.२ मार्च ते २१ मार्च या कालावधीत झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यात कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्याचा समावेश असलेल्या कोल्हापूर विभागाने राज्यात बाजी मारली. कोल्हापूर विभागात २३१६ शाळांमधील ३५५ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. विभागातील एक लाख २८ हजार ५०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी एक लाख २४ हजार ३१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

गतवर्षी विभागाचा निकाल ९८.५० टक्के लागला होता. यंदा यात घट झाली. दरम्यान, कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्ह्याने आघाडी घेतली असून, जिल्ह्याचा निकाल ९७.२१ टक्के लागला. सातारा जिल्हा द्वितीय स्थानी राहिला असून, त्यांचा निकाल ९६.७२ टक्के लागला. सांगली जिल्ह्याचा निकाल ९६.८ टक्के लागला.

कोल्हापूर जिल्ह्यात ५१ हजार विद्यार्थी उत्तीर्णकोल्हापूर जिल्ह्यातून ५२ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ५१ हजार ४५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सातारा जिल्ह्यातील परीक्षा दिलेल्या ३७ हजार ८११ विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार ५७४ विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेत यश मिळवता आले. सांगली जिल्ह्यातील ३७ हजार ७६६ विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार २८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

गुणपत्रिका १४ जूनलानिकालानंतर गुणपडताळणी, निकालाच्या छायांकित प्रती यासाठी ३ जून ते १२ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करायचा आहे. गुणपडताळणी अर्जासाठी प्रतिविषय ५० रुपये शुल्क आहे. छायांकित प्रतीसाठी ३ जून ते २२ जून या कालावधीत अर्ज करण्याची मुदत आहे. दरम्यान, १४ जूनला संबंधित शाळांमध्ये गुणपत्रिका देण्यात येणार आहेत.

सर्व प्रकिया पारदर्शक

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान राबविले गेले. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला कॉपीचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. सहायक परीरक्षक (रनर) यांनी प्रश्नपत्रिकांची गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ती केंद्रावर पोहोचेपर्यंत त्यांचे चित्रीकरण करण्यात आले. ही सर्व प्रकिया पारदर्शकपणे राबविली गेली. यामुळे निकालात काही अंशी घट झाली. विशेष म्हणजे हे कॉपीमुक्त अभियान राबविण्याची संकल्पना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागाचे अधीक्षक दीपक पवार यांनी मंडळाला सुचविली होती. मंडळानेही ती स्वीकारत राज्यभर राबविली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSSC Resultदहावीचा निकाल