शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

आत्महत्या केलेल्या पाच शेतकऱ्यांचे दावे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 13:29 IST

गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पाच शेतकऱ्यांचे सानुग्रह अनुदानाचे दावे बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंजूर केले. विषप्राशन केलेल्या दोघांचे मात्र दावे फेटाळण्यात आले. या पाचजणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३० हजार रुपये रोख व ७० हजार रुपये पोस्टाचे बचत प्रमाणपत्र असे एक लाखाचे अनुदान दिले जाणार आहे.

ठळक मुद्देआत्महत्या केलेल्या पाच शेतकऱ्यांचे दावे मंजूरदोघांचे दावे फेटाळले: प्रत्येकी एक लाखाचे सानुग्रह अनुदान

कोल्हापूर : गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पाच शेतकऱ्यांचे सानुग्रह अनुदानाचे दावे बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंजूर केले. विषप्राशन केलेल्या दोघांचे मात्र दावे फेटाळण्यात आले. या पाचजणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३० हजार रुपये रोख व ७० हजार रुपये पोस्टाचे बचत प्रमाणपत्र असे एक लाखाचे अनुदान दिले जाणार आहे.जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या शेतकरी आत्महत्या समितीची बैठक झाली. बैठकीला समिती सदस्य म्हणून शिवाजीराव परुळेकर, जनरल तहसीलदार अर्चना कापसे, गडहिंग्लज तहसीलदार दिनेश पारगे, करवीर तहसीलदार शीतल मुळे, शिरोळचे तहसीलदार अपर्णा मोरे, जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे उपस्थित होते.दावे मंजूर केलेल्या पाचजणांमध्ये गडहिंग्लज व शिरोळ तालुक्यांतील प्रत्येकी दोन शेतकरी आहेत; तर करवीर तालुक्यातील एक आहे. या पाचही जणांचा फेब्रुवारी ते सप्टेंबर या काळात गळफास घेऊन मृत्यू झाला आहे. यात सुनील बंदी (भडगाव, ता. गडहिंग्लज), पांडुरंग अनकमोरे (कडलगे, ता. गडहिंग्लज), राजाराम भाट (कोगे, ता. करवीर), रावसाहेब माळी (तेरवाड, ता. शिरोळ), राजेंद्र पाटील (शिरोळ) यांचा समावेश आहे.शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद असूनही विषप्राशन आणि उलटसुलट जबाबांमुळे दोन शेतकऱ्यांचे दावे नामंजूर झाले आहेत. यात गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथील शेतकरी विष्णू भोसले यांनी ३० मार्च रोजी विष प्राशन केले होते. ते स्वत: कर्जदार नसून त्यांच्या आईच्या नावावर कर्ज असल्याचे सांगत हा दावा फेटाळण्यात आला.

अशीच परिस्थिती करवीर तालुक्यातील वाकरे येथील शेतकरी कृष्णात पाटील यांची झाली. कर्जाच्या ओझ्यामुळे १३ जुलैला त्यांनी विष प्राशन करून जीवन संपविले होते; पण त्यांनी दोन दिवशी दोन वेगवेगळे जबाब दिल्याने त्यांच्याही कुटुंबीयांचा सानुग्रह अनुदानाचा दावा समितीने फेटाळून लावला.

 

एक लाखाची दिली जाणारी सानुग्रह अनुदानाची रक्कम फारच तोकडी असल्याने ती चार लाख रुपये करावी, अशी मागणी मी केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने सरकारला सूचनाही दिल्या होत्या; पण त्यांचे आजअखेर पालन झालेले नसल्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक फरफट कायम आहे.- शिवाजीराव परुळेकर, आत्महत्याग्रस्त शेतकरी संघर्ष समिती 

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी