शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व कायद्याने जातीय,धार्मिक तेढ निर्माण करण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 11:26 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारने संमत केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंद हे दोन्ही कायदे भारतीय राज्यघटनेचे उल्लंघन करणारे ...

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन बहुजन क्रांती मोर्चासह विविध संघटनांचा सहभाग

कोल्हापूर : केंद्र सरकारने संमत केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंद हे दोन्ही कायदे भारतीय राज्यघटनेचे उल्लंघन करणारे आहेत. यातून जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा घाट घातला जात आहे. त्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चासह विविध संघटनांतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.या दोन्ही कायद्यांविरोधात संघटनांच्या प्रतिनिधींनी तीव्र भावना व्यक्त केल्या. हे कायदे लादणाऱ्या केंद्रातील भाजपप्रणित सरकारवर सडकून टीका करण्यात आली. सकाळी ११ ते दुपारी चार या वेळेत हे आंदोलन करण्यात आले. यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, हे दोन्ही कायदे राज्यघटना कलम १४ चे उल्लंघन करणारे आहेत. देशात दुफळी निर्माण करण्यासाठी तसेच जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी भाजप सरकारकडून जाणीवपूर्वक असा घाट घातला जात आहे. मुसलमान विदेशी आहेत, आतंकवादी आहेत, घुसखोर आहेत, अशा पद्धतीने येथील मूलनिवासी मुस्लिमांना बदनाम केले जात आहे.

मुसलमान मूळ भारतीयच असून, त्यांनादेखील या देशात मानसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. तो अबाधित ठेवण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा मुस्लिमांबरोबरच संपूर्ण बहुजन समाजाला सोबत घेऊन हक्क, अधिकारांची लढाई लढत आहे. या कायद्यामुळे केवळ मुस्लिमच नाही तर देशातील एस.सी., एस.टी., ओबीसी, भटके विमुक्त, अल्पसंख्याक समाजाचे लोकही अडचणीत येणार आहेत.

देशात अनेक लोक असे आहेत की, ज्यांच्याकडे जातीचा दाखला, जन्माचा दाखला, रेशन कार्ड नाही; त्यांनी नोंद कशी करायची? कुंभमेळ्यात दिसणारे साधू अंगावर फक्त लंगोटा वापरतात. मग त्यांनी स्वत:ची ओळख कशी सिद्ध करायची? असा प्रश्न आहे.आंदोलनात मुफ्ती महंमद फारुख, शाहीद शेख, जदारखान पठाण, कॉम्रेड चंद्रकांत यादव, महेश बावडेकर, प्रमोद हर्षवर्धन, नामदेव गुरव, रूपेश पाटील, सिद्धार्थ नागरत्न, आदींसह विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.तीन टप्प्यांत आंदोलनया दोन्ही कायद्यांविरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून तीन टप्प्यांत आंदोलन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी धरणे आंदोलन, जिल्हास्तरावर ८ जानेवारी २०२० ला रॅली व २९ जानेवारीला संपूर्ण ‘भारत बंद’चे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील ५५० जिल्ह्यांत एकाच वेळी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जात आहे.या संघटनांचा सहभागमजलिश-ए-शुरा, उलमा-ए-शहर कोल्हापूर, भारत मुक्ती मोर्चा, जमियत-ए-उलेमा शहर व जिल्हा कोल्हापूर, भारतीय विद्यार्थी युवा, बेरोजगार मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा महिला संघ, कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय लिंगायत मोर्चा, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, एम. आय. ए., हिंदी है हम... हिंदोस्तॉँ हमारा..., जमियत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र भटके-विमुक्त समाज, वंचित बहुजन आघाडी, इमदाद फौंडेशन, अहले हदीस जमात, आदी.

 

 

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूर