शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नागरिकत्व कायद्याने जातीय,धार्मिक तेढ निर्माण करण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 11:26 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारने संमत केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंद हे दोन्ही कायदे भारतीय राज्यघटनेचे उल्लंघन करणारे ...

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन बहुजन क्रांती मोर्चासह विविध संघटनांचा सहभाग

कोल्हापूर : केंद्र सरकारने संमत केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंद हे दोन्ही कायदे भारतीय राज्यघटनेचे उल्लंघन करणारे आहेत. यातून जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा घाट घातला जात आहे. त्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चासह विविध संघटनांतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.या दोन्ही कायद्यांविरोधात संघटनांच्या प्रतिनिधींनी तीव्र भावना व्यक्त केल्या. हे कायदे लादणाऱ्या केंद्रातील भाजपप्रणित सरकारवर सडकून टीका करण्यात आली. सकाळी ११ ते दुपारी चार या वेळेत हे आंदोलन करण्यात आले. यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, हे दोन्ही कायदे राज्यघटना कलम १४ चे उल्लंघन करणारे आहेत. देशात दुफळी निर्माण करण्यासाठी तसेच जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी भाजप सरकारकडून जाणीवपूर्वक असा घाट घातला जात आहे. मुसलमान विदेशी आहेत, आतंकवादी आहेत, घुसखोर आहेत, अशा पद्धतीने येथील मूलनिवासी मुस्लिमांना बदनाम केले जात आहे.

मुसलमान मूळ भारतीयच असून, त्यांनादेखील या देशात मानसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. तो अबाधित ठेवण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा मुस्लिमांबरोबरच संपूर्ण बहुजन समाजाला सोबत घेऊन हक्क, अधिकारांची लढाई लढत आहे. या कायद्यामुळे केवळ मुस्लिमच नाही तर देशातील एस.सी., एस.टी., ओबीसी, भटके विमुक्त, अल्पसंख्याक समाजाचे लोकही अडचणीत येणार आहेत.

देशात अनेक लोक असे आहेत की, ज्यांच्याकडे जातीचा दाखला, जन्माचा दाखला, रेशन कार्ड नाही; त्यांनी नोंद कशी करायची? कुंभमेळ्यात दिसणारे साधू अंगावर फक्त लंगोटा वापरतात. मग त्यांनी स्वत:ची ओळख कशी सिद्ध करायची? असा प्रश्न आहे.आंदोलनात मुफ्ती महंमद फारुख, शाहीद शेख, जदारखान पठाण, कॉम्रेड चंद्रकांत यादव, महेश बावडेकर, प्रमोद हर्षवर्धन, नामदेव गुरव, रूपेश पाटील, सिद्धार्थ नागरत्न, आदींसह विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.तीन टप्प्यांत आंदोलनया दोन्ही कायद्यांविरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून तीन टप्प्यांत आंदोलन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी धरणे आंदोलन, जिल्हास्तरावर ८ जानेवारी २०२० ला रॅली व २९ जानेवारीला संपूर्ण ‘भारत बंद’चे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील ५५० जिल्ह्यांत एकाच वेळी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जात आहे.या संघटनांचा सहभागमजलिश-ए-शुरा, उलमा-ए-शहर कोल्हापूर, भारत मुक्ती मोर्चा, जमियत-ए-उलेमा शहर व जिल्हा कोल्हापूर, भारतीय विद्यार्थी युवा, बेरोजगार मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा महिला संघ, कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय लिंगायत मोर्चा, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, एम. आय. ए., हिंदी है हम... हिंदोस्तॉँ हमारा..., जमियत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र भटके-विमुक्त समाज, वंचित बहुजन आघाडी, इमदाद फौंडेशन, अहले हदीस जमात, आदी.

 

 

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूर