शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

Coronavirus in Maharashtra रुग्णांच्या संख्येत वाढ नागरिकांनी अजिबात घाबरु नये - जिल्हाधिकारी दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:01 IST

रत्येक बाहेरुन आलेल्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. तो गृह अलगीकरणात, संस्थात्मक अलगीकरणात राहतो की नाही. सामाजिक अंतर ठेवतो का यावर नजर ठेवावी. जेणेकरुन कोणताही धोका होणार नाही, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

ठळक मुद्देरेड झोनमधून येणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात स्वॅब तपासणी; रुग्णांच्या संख्येत वाढनागरिकांनी अजिबात घाबरु नये;स्वॅब तपासणीमुळे प्रादुर्भावास प्रतिबंध

कोल्हापूर : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई, पुणे आणि सोलापूर या ठिकाणाहून रेड झोन आणि कंटेन्मेंट झोनमधून कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे स्वॅब घेण्यात आले आहेत. परिणामी बाधित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही तपासणी केली नसती तर गावामध्ये फार मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता होती. त्यामुळे नागरिकांनी अजिबात घाबरु नये परंतु, योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.            जिल्ह्यामध्ये कोव्हिड-19 च्या रुग्णांची संख्या गेल्या दोन दिवसांपासून वाढत आहे. आज ती संख्या सकाळी 134 होती. याचे एकमेव कारण म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई, पुणे आणि सोलापूर या ठिकाणाहून रेड झोन आणि कंटेन्मेंट झोनमधून मोठ्या प्रमाणात व्यक्ती जिल्ह्यात आल्या आहेत. यामधील जास्तीत जास्त  लोकांच्या स्वॅब तपासणीचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, यानुसार ही तपासणी केली.

आता या तपासणीचे अहवाल आता येत आहेत. बाहेरुन आलेल्या सर्व लोकांचे अहवाल हे पॉझिटिव्ह येत आहेत. यात कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशाचा समावेश नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणीही घाबरुन जावू नये. हे जर पाऊल आपण उचललं नसतं तर हे बाधित लोक गावा गावात गेले असते आणि मोठ्या प्रमाणात गावातल्या लोकांना झाला असता. जरी या लोकांना गृह अलगीकरण किंवा संस्थात्मक अलगीकरणात ठेवले असते तरी या लोकांच्या बेसावधतेमुळे इतरांना प्रादुर्भाव झाला असता. हा प्रादुर्भाव या पध्दतीने तपासणी करुन वाचवला आहे. 

कोव्हिड केअर सेंटरमध्ये तपासणी करावी            विना परवानगी, वेगवेगळ्या मार्गाने, माल वाहतूक वाहनामधून गावा गावात आलेले आहेत. अशा लोकांनी ज्यांची तपासणी झाली नाही, अशा लोकांना त्यांच्या कुटुंबियांनी, ग्रामस्थांनी कोव्हिड केअर सेंटरमध्ये घेवून जाणे आवश्यक आहे, त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यांना कोणतीही लक्षणे असतील तर अशा लोकांना तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात संपर्क करावा. जेणेकरुन त्यांच्या कुटुंबियांना तसेच ग्रामस्थांना प्रादुर्भाव होणार नाही. आपल्या जिल्ह्यालाही धोका होणार नाही. पॉझिटिव्ह येणाऱ्या सर्व रुग्णांना सीपीआर, डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालय किंवा तालुकास्तरावरील कोव्हिड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. त्यामुळे यांच्यापासून इतरांना कोणताही धोका नाही. पण गावातल्या, शहरातल्या लोकांनी सावध राहणे आवश्यक आहे. प्रत्येक बाहेरुन आलेल्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. तो गृह अलगीकरणात, संस्थात्मक अलगीकरणात राहतो की नाही. सामाजिक अंतर ठेवतो का यावर नजर ठेवावी. जेणेकरुन कोणताही धोका होणार नाही, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.              

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस