शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

सर्किट बेंच : पत्र द्या, अन्यथा २८ पासून न्यायालयीन कामकाज बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 19:45 IST

सर्किट बेंचप्रश्नी शासनाने कॅबिनेट बैठक घेऊन पत्र द्यावे; अन्यथा २८ जानेवारीपासून जिल्ह्यातील सर्व न्यायालयांतील वकील कामकाज बंद ठेवतील. प्रसंगी कोल्हापूर बंद करण्याचाही निर्धार महामोर्चाद्वारे गुरुवारी करण्यात आला.

ठळक मुद्देसर्किट बेंच : पत्र द्या, अन्यथा २८ पासून न्यायालयीन कामकाज बंदसर्वपक्षीय महामोर्चाद्वारे शासनास ‘अल्टिमेटम’; प्रसंगी कोल्हापूरही ‘बंद’

कोल्हापूर : सर्किट बेंचप्रश्नी शासनाने कॅबिनेट बैठक घेऊन पत्र द्यावे; अन्यथा २८ जानेवारीपासून जिल्ह्यातील सर्व न्यायालयांतील वकील कामकाज बंद ठेवतील. प्रसंगी कोल्हापूर बंद करण्याचाही निर्धार महामोर्चाद्वारे गुरुवारी करण्यात आला.कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापनेबाबत शासनाने पत्र द्यावे यासाठी गुरुवारी जिल्हा बार असोसिएशन आणि खंडपीठ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला. महापौर सरिता मोरे, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत चिटणीस यांच्या नेतृत्वाखाली न्यायसंकुलापासून मोर्चाचा प्रारंभ झाला.मोर्चात ‘वई वॉँट खंडपीठ, खंडपीठ झालेच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. मोर्चा महावीर महाविद्यालयमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चात विद्यार्थ्यांच्या हाती सर्किट बेंच मागणीचे फलक होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. अखेर झुंडशाहीने मुख्य प्रवेशद्वार उघडून वकील व आंदोलक आवारात शिरले. शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन दिले.आमदार पाटील म्हणाले, कोल्हापुरात सर्किट बेंच मंजूर नसताना मुख्यमंत्र्यांनी ११०० कोटींची व जमिनीची तरतूद कोठून केली? सरकारच्या फसव्या आश्वासनामुळे त्यांच्यासोबत चर्चाही करण्याची इच्छा नाही. दि.२७ पूर्वी सरकारने पत्र द्या; अन्यथा आंदोलनाची धार वाढेल.अ‍ॅड. चिटणीस म्हणाले, सरकारकडून वकिलांची व पक्षकारांची हेटाळणी सुरू आहे. उच्च न्यायालयाला देण्यासाठी सरकारने पत्र न दिल्यास २८ पासून वकीलच कामकाज चालविणार नाहीत.आमदार क्षीरसागर म्हणाले, हे आंदोलन पक्षकारांसाठी आहे. कोल्हापूर परिक्षेत्रातील ६० हजार खटले उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. सर्किट बेंच घेतल्याशिवाय मागे हटणार नाही.

मोर्चात कृती समितीचे अध्यक्ष आर. के. पोवार, बाबा पार्टे, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. शिवाजीराव राणे, अ‍ॅड. धनंजय पठाडे, अ‍ॅड. राजेंद्र किंकर, वसंतराव मुळीक, निवास साळोखे, दिलीप देसाई, प्रसाद जाधव, उद्योगपती चंद्रकांत जाधव, संजय शेटे, गणी अजरेकर, प्रसाद जाधव, आदी सहभागी झाले होते.

वादावादी अन् राजीनामाशिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात गेले. तेथे सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष आर. के. पोवार यांना बसण्यासाठी खुर्ची मिळाली नाही. त्यावरून कार्यकर्त्यांत वाद झाला. त्यातून पोवार बाहेर येऊन पत्रकारांसमोर कृती समिती अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले.

काळे-पांढरे कोट, भगवे झेंडे अन् टोप्यामोर्चात वकील काळे कोट परिधान करून, तर विद्यार्थी पांढऱ्या गणवेशात सहभागी झाले. शिवसैनिक हातात भगवे झेंडे, तर सिटीझन फोरमचे कार्यकर्ते डोक्यावर खंडपीठ मागणीच्या टोप्या परिधान करून मोर्चात सहभागी झाले होते.

संघटनांचा सहभागमोर्चात जिल्हा बार असोसिएशन व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह चेंबर आॅफ कॉमर्स, सर्व उद्योजक संघटना, असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अँड इंजिनिअअर्स, क्रिडाई, सिटीझन फोरम, चाटे स्कूल, पेट्रोलपंप चालक-मालक संघटना, न्यू लॉ कॉलेज, शहाजी लॉ कॉलेज, तपोवन शिक्षण संस्था, आदी संघटनांचा सहभाग होता.

शासनाकडून लॉलिपॉप, गाजरशासनाकडून आश्वासने, प्रलोभने, तरतूद, मंजुरी, आदी गोंडस शब्द समोर ठेवून प्रत्येक वेळी आंदोलकांना लॉलिपॉप व गाजर दाखवून फसविले असल्याचा उल्लेख आमदार पाटील, क्षीरसागर, अ‍ॅड. चिटणीस यांनी केला. 

 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर