शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

बालदिन : मी भांडी घासून, तर मी भंगार गोळा करून शाळेत जाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:42 IST

घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने काहीकाळ शाळाबाह्य राहिलेली मुले-मुली शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आली आहेत, अशा काही मुला-मुलींनी बुधवारी बालदिनानिमित्त ‘लोकमत’च्या कार्यालयात मुक्तपणे संवाद साधत आपले ध्येय, हक्क आणि कर्तव्यांबाबत मते मांडली.

ठळक मुद्दे‘लोकमत’मध्ये बालदिन : प्रतिकूल परिस्थितीतील मुला-मुलींची जिद्दमी भांडी घासून, तर मी भंगार गोळा करून शाळेत जाते ; साधला मुक्त संवाद

कोल्हापूर : मी दोन-चार घरांतील भांडी घासून, तर मी भंगार गोळा करून शाळेला जाते. आम्हांला भविष्यात शिक्षक व्हायचे आहे, असे शाहूवाडीतील भारती गोसावी आणि शिवानी गोसावी यांनी सांगितले. शिक्षण घेण्याबाबतच्या त्यांच्या कष्ट, जिद्दीला बुधवारी अन्य विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात सलाम केला.

घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने काहीकाळ शाळाबाह्य राहिलेली मुले-मुली शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आली आहेत, अशा काही मुला-मुलींनी बुधवारी बालदिनानिमित्त ‘लोकमत’च्या कार्यालयात मुक्तपणे संवाद साधत आपले ध्येय, हक्क आणि कर्तव्यांबाबत मते मांडली.शाळाबाह्य मुला-मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम सांगरूळ (ता. करवीर) येथील उमेद शिक्षण केंद्र आणि शाहूवाडीतील ज्ञानसेतू प्रकल्पामार्फत केले जात आहे. या केंद्रांच्या माध्यमातून शाहूवाडी, सांगरूळ, पासार्डे, कुडित्रे या परिसरातील मुले-मुलींसमवेत संवाद साधण्याचा उपक्रम ‘लोकमत’ने बालदिनानिमित्त घेतला.‘लोकमत’च्या शहर कार्यालयातील या कार्यक्रमात विविध प्रश्नांना उत्तरे देत उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यात शाहूवाडीतील भारती गोसावी हिने पहाटे पाच वाजता उठून भंगार गोळा करते. त्यानंतर घरातील कामे करून शाळेला जात असल्याचे सांगितले. तिच्याच समवेत आलेल्या शिवानी हिने सकाळी दोन-चार घरांमध्ये भांडी घासण्याचे काम करून शाळेला जातो. सायंकाळी आम्ही अभ्यास पूर्ण करतो. आम्हा दोघींना आयुष्यात शिक्षक म्हणून काम करायचे आहे, असे सांगताच उपस्थितांनी शिक्षणाबाबतच्या त्यांच्या जिद्दीला टाळ्यांच्या गजरात सलाम केला.

त्यानंतर शिक्षण आमचा हक्क आहे; त्यामुळे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि आनंददायी शिक्षण आम्हाला मिळाले पाहिजे, असे उपस्थित सर्व मुलांनी सांगितले. कोणी शिक्षक, कोणी डॉक्टर, तर कोणी पोलीस निरीक्षक, सैन्यदलातील अधिकारी, आयएएस आॅफिसर, ऐरोनॉटिकल आॅफिसर, वैद्यकीय अधिकारी होण्याचे ध्येय सांगितले.या कार्यक्रमात ‘उमेद’ केंद्राचे प्रकाश गाताडे, आभास फौंडेशनचे अध्यक्ष अतुल देसाई यांनी विद्यार्थ्यांना बालहक्क आणि कर्तव्यांबाबत मार्गदर्शन केले. ‘लोकमत’ चे मुख्य बातमीदार विश्र्वास पाटील यांनी वर्तमानपत्रांची कार्यपद्धती, पत्रकारांचे दैनंदिन काम याबाबतची माहिती दिली. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मेधप्रणव याचा ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते ‘दीपोत्सव’ देऊन सत्कार करण्यात आला. ‘लोकमत’चे उपवृत्तसंपादक चंद्रकांत कित्तुरे, ‘उमेद’ केंद्राचे सचिन कुंभार, सुनील गोसावी, राजेंद्र चव्हाण, राजाराम कांबळे, आदी उपस्थित होते.

या विद्यार्थ्यांनी साधला संवादसिद्धी लोहार, प्राजक्ता हरणे, सानिका जाधव, प्रणव पाटील (कुडित्रे), भारती आणि शिवानी गोसावी, सुमित गोसावी (शाहूवाडी), राजआर्यन गोसावी (येळाणे), राजवर्धन गाताडे, प्रज्योत नाळे, श्रेयश नाळे, राजवर्धन सणगर, विवेक बोळावे (सांगरूळ), ओंकार कांबळे, आशिष कांबळे (पासार्डे).

लघुपट पाहून विद्यार्थी भावूकया कार्यक्रमात लघुपट दिग्दर्शक मेधप्रणव बाबासाहेब सरस्वती यांनी ‘एफटीटीआय’ मार्फत बनविलेल्या ‘हॅप्पी बर्थडे’ हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लघुपट दाखविला. बाबा आणि मुलगा यांचे भावविश्व उलघडणारा लघुपट पाहून उपस्थित विद्यार्थी भावूक झाले.

 

 

टॅग्स :children's dayबालदिनkolhapurकोल्हापूर