शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
2
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
3
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
4
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
5
सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा...
6
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!
7
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
8
Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं
9
ICICI आणि HDFC बँकेचा ग्राहकांना धक्का! एका निर्णयामुळे होणार लाखो रुपयांचे नुकसान?
10
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
11
Inspirational: 'या' तीन गोष्टी आजपासून फॉलो करा, पाच वर्षांनी लोक तुम्हाला फॉलो करतील!
12
भारतीयांनी ज्या देशाला 'बॉयकॉट' केलं, त्याचीच ग्लोबल ब्रँड अँबेसिडर बनली कतरिना कैफ
13
अनिल अंबानींच्या कंपनीनं तोडला १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, एकाच महिन्यात कमावले हजारो कोटी
14
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
15
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
16
सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!
17
सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली...
18
SIP मध्ये गुंतवणूक करुन १० लाख रुपये जमवायचेत? महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक, 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
19
Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?

...तर खेळण्याच्या वयातच लागले असते ५२ जणींचे लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 19:13 IST

मुलगा, मुलगी सज्ञान झाल्याशिवाय त्यांचा विवाह करू नये, हा कायदा आहे. पण तरीही या कायद्याला न जुमानता राजरोसपणे बालविवाह केले जातात. याचे प्रमाण शहरीपेक्षा ग्रामीण भागात जास्त आहे.

कोल्हापूर : गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील ५२ अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यात यंत्रणेला यश आले आहे. जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभाग, चाईल्ड लाईन, बालकल्याण समिती, ग्रामीण भागातील पोलीस पाटील, ग्रामसेवक अशा वेगवेगळ्या यंत्रणांनी माहिती मिळताच कारवाईचा बडगा उगारल्याने बालविवाह वेळीच रोखले गेले. पण शासन वारंवार ओरडून सांगत असतानादेखील लोकांची बालविवाहाची मानसिकता बदलत नाही, हेच मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.

मुलगा, मुलगी सज्ञान झाल्याशिवाय त्यांचा विवाह करू नये, हा कायदा आहे. पण तरीही या कायद्याला न जुमानता जिल्ह्यात राजरोसपणे बालविवाह केले जातात. याचे प्रमाण शहरीपेक्षा ग्रामीण भागात जास्त आहे. अनेकदा ज्या कुटुंबात लग्न आहे, त्यांचे शेजारी, आप्तेष्ट, नातेवाईकांकडून ही माहिती स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली जाते. चाईल्ड लाईनला तक्रार केली जाते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत ५२ मुलींचे बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश आले आहे. कायद्याचा बडगा असला तरी, मुलीची शारीरिक व बौद्धिक वाढ याचा विचार करून पालकांनी बालविवाहासारख्या कुप्रथांना बळी पडू नये. पण आजही सर्रास बालविवाह केले जातात. कोरोना आणि लॉकडाऊननंतर तर यात अधिकच भर पडली आहे.

वधूचे वय १८, तर वराचे वय २१ हवे

विवाहासाठी मुलीचे वय १८, तर मुलाचे वय २१ असणे गरजेचे आहे. या वयात त्यांचा पूर्णत: शारीरिक व बौद्धिक विकास झालेला असतो. त्यामुळे वैवाहिक जीवनात अडथळे येत नाहीत. याबाबत शासनाने वारंवार जागृती केल्यानंतरदेखील बालविवाहांचे प्रमाण वाढले आहे. त्यासोबतच ते उघड होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

बालविवाह रोखण्यासाठी येथे करा संपर्क...

आपल्या परिसरात बालविवाह होत असल्याचे लक्षात आल्यास स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये आपले नाव न सांगता याबाबतची माहिती देऊ शकता किंवा चाईल्ड लाईनच्या १०९८ या क्रमांकावर संपर्क साधू शकता. बालकल्याण समिती, जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग, ग्रामीण भागातील पोलीस पाटील, ग्रामसेवक यांना माहिती देऊ शकता.

महिना : सन २०२० : सन २०२१

जानेवारी : १ : १

फेब्रुवारी : ० : २

मार्च : १ : ३

एप्रिल : १ : ३

मे : ४ : ३

जून : ३ : ५

जुलै : ४ : ७

ऑगस्ट : ३ : ४

सप्टेंबर : २ : २

ऑक्टोबर : १ : १

नोव्हेंबर : ० : २

डिसेंबर : ० : अजून सुरू

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारी