शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
4
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
5
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
6
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
7
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
8
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
9
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
10
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
11
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
12
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
13
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
14
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
15
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
16
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
17
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
18
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
19
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
20
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

चिकोत्रा खोऱ्याचा घसा कोरडाच...

By admin | Updated: April 7, 2017 00:28 IST

भीषण पाणीटंचाई : उपसाबंदीतही राजरोस पाणीउपसा; चार दिवसांत नदीपात्र कोरडे, शेतातील विहिरींचा आसरा

सेनापती कापशी : चिकोत्रा खोरा हा तसा कागल, आजरा व भुदरगड तालुक्यांच्या सीमारेषेवर वसला असून, भौगौलिकदृष्ट्या अनेक गावे डोंगराच्या कुशीत, तर काही उंच डोंगर माथ्यावर आहेत. चिकोत्रा खोऱ्यातील शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चिकोत्रा प्रकल्प बांधण्यात आला. यामुळे थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली; पण गेल्या पंधरा वर्षांत हा प्रकल्प फक्त दोनवेळाच पूर्ण क्षमतेने भरला आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून तर धरणात फक्त ४० ते ६० टक्केच पाणीसाठी होत आहे. त्यामुळे चिकोत्रा खोऱ्याला सातत्याने भीषण पाणीटंचाईला सामारे जावे लागत आहे. सध्या चिकोत्रा प्रकल्पात अल्प पाणीसाठा असल्यामुळे महिन्यातून एकदाच पाणी सोडले जाते. ते पाणी बंधारा भरण्याआधीच काही स्वत:ला प्रगतिशील समजणारे शेतकरी उपसाबंदीतच राजरोसपणे पाणी उपसा करतात. याला वीज वितरण कंपनीचे काही कर्मचारी अर्थपूर्ण व्यवहार करून पाठीशी घालतात ही वस्तुस्थिती आहे. पाठबंधारे विभाग, वीज वितरण कंपनी व काही प्रगतिशील शेतकरी हे संगणमताने दोन ते तीन दिवसांत चिकोत्रा नदीचे पात्र कोरडे करतात. परिणामी, चिकोत्रा खोऱ्यातील २५ ते ३० गावांतील सर्वसामान्य नागरिकांना पिण्याचे पाणी मिळविण्यास शेतातील विहिरींचा सहारा घ्यावा लागत आहे. पाठबंधारे व वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी हे सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करीत आहेत. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख दिलीप तिप्पे, युवासेनेचे सागर मोहिते, यांनी वेळोवेळी आंदोलने करून अधिकाऱ्यांना निवेदन दिले;पण संबंधित विभागाकडून पुढे कोणतीच कारवाई झाली नाही. काही शेतकऱ्यांनी तर चिकोत्रा नदीत अनधिकृत मातीचा मोठा बांध घालून संपूर्ण पाणीच अडविले व शेतीसाठी उपसा करण्यास सुरू केले. यावरही कोणतीच कारवाई झाली नाही. आता काही शेतकरी सिंगल फेज मोटारींचा राजरोस वापर करून पाणी उपसा करीत आहेत. यामुळे चिकोत्रा खोऱ्यात पिण्याच्या व खर्चाच्या पाण्याची अवस्था मोठी बिकट झाली आहे. यामुळे ग्रामस्थांना उन्हाची पर्वा न करता शेतातील विहिरींचा आसरा घ्यावा लागत आहे. सेनापती कापशी, मुगळी, जैन्याळ, अर्जुनवाडा, नंद्याळ, बोळावी, बोळावीवाडी, तमनाकवाडा, माध्याळ, हणबरवाडी, हसूर खुर्द, कासारी, आदी गावांत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे.