शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

पॅकेज देणारा नव्हे, मदत करणारा मुख्यमंत्री : उध्दव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 15:27 IST

Uddhav Thackeray Kolhapur Flood : मी पॅकेज देणारा नव्हे तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे महापुराच्या अस्मानी संकटात कोणत्याही सवंग घोषणा करणार नाही असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

ठळक मुद्देपॅकेज देणारा नव्हे, मदत करणारा मुख्यमंत्री : उध्दव ठाकरेफडणवीस यांनाही दिले चर्चेचे निमंत्रण

कोल्हापूर : मी पॅकेज देणारा नव्हे तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे महापुराच्या अस्मानी संकटात कोणत्याही सवंग घोषणा करणार नाही असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

कोल्हापूर-सांगलीतील अनेक लोकांच्या घरातील पूराचे पाणी अजून ओसरलेले नाही, लोक आता कुठे सावरत आहेत. त्यामुळे नुकसानीचा नेमका अंदाज आलेला नसल्याने मदतीची घोषणा केलेली नाही. तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.शिरोळ व कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागांस भेट देवून त्यांनी पूरग्रस्तांच्या भावना जाणून घेतल्या. प्रत्येकास त्यांनी धीर दिला. सरकार तुमच्या पाठिशी असल्याचे विश्वास दिला. त्यानंतर शासकीय विश्रामधामवर बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद झाली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, महापुरानंतर नुकसानीबध्दल मदत व उपाययोजनांसाठी नक्की किती निधी लागेल यासंबंधीचा अंदाज आम्ही घेत आहोत. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे अजूनही कोणत्याही मदतीची अथवा रक्कमेची मागणी केली आहे. मी ती लगेच करणारही नाही. गुजरातला एवढे दिले म्हणून आम्हांला इतके हजार कोटी द्या अशी माझी भूमिका नाही.

जेव्हा लागेल तेव्हाच मदत मागू. त्यावेळी मात्र केंद्र सरकारने ती मदत तातडीने द्यावी कारण २०१९ चा महापुरावेळचा अनुभव तसा नाही. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार महापूरातील नुकसानीची भरपाई दिली जाते. परंतू हा कायदा २०१५ चा आहे. त्यास आता सहा वर्षे झाली आहेत. त्यामुळे नुकसानीचे निकष बदलण्याची मागणी नीती आयोगाकडे केली आहे.

महापूर रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना-पर्यात सूचविले जातात,तसाच भिंत घालण्याचा पर्याय पुढे आला होता. हा काय राज्य सरकारने घेतलेला निर्णय नाही. लोकांचा त्याबध्दल आक्षेप असेल तर आम्हीही या पर्यांयाचा विचार करणार नाही असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेKolhapur Floodकोल्हापूर पूर