शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 17:03 IST

उन्हाळ्यात पावसाळा असे वातावरणात बदल होत आहे. गेली पाच महिने जिल्ह्यात पाऊस राहिल्याने त्याचा थेट परिणाम पिकांवर झाला आहे. पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

राजाराम लोंढे 

कोल्हापूर : रासायनिक खतांच्या दरात गेल्या नऊ वर्षांत ७५.८५ टक्क्यांची वाढ झाली आहे. एकीकडे उसासह सर्व पिकांचा उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतमालाला भाव मात्र त्या पटीत मिळत नाही. रासायनिक खताच्या किमतीत सरासरी ७५ टक्क्यांची वाढ झाली, पण उसाचा दर केवळ २२ टक्क्यांनीच वाढला आहे. हे शेतीचे अर्थकारण शेतकऱ्यांना आतबट्ट्धात आणत आहे.

उन्हाळ्यात पावसाळा असे वातावरणात बदल होत आहे. गेली पाच महिने जिल्ह्यात पाऊस राहिल्याने त्याचा थेट परिणाम पिकांवर झाला आहे. पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अगोदरच वाढती मजूर, मशागतीच्या दरामुळे शेतकरी मेटाकुटीला भाला असताना रासायनिक खत कंपन्यांनी शेतकऱ्यांना पुन्हा झटका दिला आहे. गेल्या नऊ वर्षांत सर्वाधिक वाढ १२ : ६१

युरिया, डीएपीचे दर स्थिर, मात्र कृत्रिम टंचाई

युरिया आणि डीएपीचे दर स्थिर ठेवले आहेत. पण विक्रेत्यांकडे या खतांची टंचाई आहे. कृषी विभाग म्हणतो, ही खते मुबलक आहेत, मग ती नेमकी जातात कोठे? असा प्रश्नही शेतकरी विचारू लागले आहेत.

:०० च्या पोत्यामागे २७००, ००:५२:३४ च्या २१५०, १९: १९:१९ च्या १३०० व पोटॅशच्या किमतीत १२२० रुपयांची वाढ हझाली आहे.

अजूनही दरवाढीची शक्यता

केंद्र सरकारने रासायनिक खते नियंत्रणमुक्त केल्याने कंपन्यांनी दरवाढीचा धडाकाच लावला आहे. अजूनही दरवाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून वर्तविली जात आहे. दरवाढीचे कारण मात्र विक्रेत्यांसह शेतकऱ्यांना समजलेले नाही.

५२ रुपये किलोचे खत; उसाला तीन रुपये भाव

रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याने सरासरी ५२.५० रुपये किलो दर पडतो. महागडे खत घालून पिकविलेल्या उसाला मात्र तीन रुपये किलोने कारखान्यांना विकावा लागत आहे, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

रासायनिक खांच्या कंपन्यांची मनमानी सुरू असून, शेतकरी मेटाकुटीला आला आहे. एवढी महागडी खते घालून पिकविलेल्या उसाच्या दरासाठी रस्त्यावर उतरावे लागते, ही खरी शोकांतिका असून, युरियासह डीएपी मिळत नाही. याला लागलेल्या घुशी आम्हाला शोधाव्या लागतील.

- शिवाजी माने, अध्यक्ष, जयशिवराय

महागडी खते घेऊनही दर्जापुढे प्रश्नच

महागडी खते घालून उत्पादकता वाढेलच याची खात्री शेतकऱ्यांना नाही. भेसळयुक्त खताचा वापर केल्यानंतर उत्पादकता कशी वाढणार? शेतकरी हजारो रुपयांची खते आणून मातीत घालतात. मध्यंतरी जिल्ह्यात काही ठिकाणी बनावट खत विक्रीचे साठे सापडले होते. महागडी खते घेऊनही दर्जेदार खते मिळतात का? हे पाहणे गरजेचे आहे. एकीकडे उत्पादकता वाढेना आणि दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्चा एवद्वाही दर मिळेना, अशा दुहेरी संकटात सध्या शेतकरी आहे.

पीक पालट नसल्याने उत्पादकता घटली

सातत्याने एकच पीक घेतल्याने जमिनीचा पोत कमी झाला आहे. शेणखत वापरण्याचे प्रमाण नगण्य असल्याने तसेच पाणी व रासायनिक खतांचा वापर वाढल्याने शेती नापीक होण्याचे प्रमाण वाढ असल्याचे चित्र.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Fertilizer prices soar 75% in nine years, farmers struggle.

Web Summary : Chemical fertilizer costs have surged 75% in nine years, while sugarcane prices increased only 22%. Farmers face rising production costs, stagnant crop prices, and fertilizer shortages despite official claims of ample supply. This situation, coupled with climate change impacts and soil degradation, intensifies farmer distress.
टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर