शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

विश्वास नसल्यानेच चंद्रकांत पाटलांची मतदारांना ईडीची धमकी, सचिन सावंत यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 12:51 IST

आरक्षणाच्या विरोधी असणाऱ्या भाजपने आपल्याच बगलबच्चांना पुढे करून, न्यायालयात याचिका दाखल करून मराठा आणि ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोपही त्यांनी केला.

कोल्हापूर : उत्तरची निवडणूक आपण जिंकू शकू, हा विश्वासच राहिला नसल्याने, भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्याकडून मतदारांना ईडीच्या धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. आरक्षणाच्या विरोधी असणाऱ्या भाजपने आपल्याच बगलबच्चांना पुढे करून, न्यायालयात याचिका दाखल करून मराठा आणि ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोपही त्यांनी केला.कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात आलेल्या सावंत यांनी पत्रकारांंशी संवाद साधला. यावेळी पृथ्वीराज पाटील, शशांक बावचकर उपस्थित होते. सावंत म्हणाले, औरंगजेबाला सळो की पळो करून सोडणाऱ्या महाराणी ताराराणीच्या या कर्मभूमीत महिलांच्या क्षमतेवर अविश्वास दाखविणे हे दुर्दैवी आहे. सैनिकांच्या पत्नीविषयी बोलणारे परिचारक आणि महिलांच्या क्षमतेवर शंका घेणारे महाडिक हे दोघेही भाजपच्या मनुवादी मानसिकतेचे दर्शन घडवितात.हा तर भाजपचा कुटिल डावमहाडिक यांच्या विरोधात जनतेच्या मनात राग आहे, दगडफेकीचा प्रकार करुन लोकांचे लक्ष वेगळीकडे वळविण्याचा भाजपचा कुटिल डाव आहे. महिलांचा अवमान करणाऱ्यांना येथील जनता येथेच मातीत गाडते, हा इतिहास भाजपने जरूर तपासावा.भाजपच्या नेत्यांना फेअर अँड लव्हली लावली आहे का?भाजपकडून केवळ सत्तेसाठी तपासयंत्रणाचा गैरवापर करून विरोधकांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. सगळे विरोधक दोषी असतील, तर मग भाजपच्या नेत्यांना काय फेअर अँड लव्हली लावून गोरेगोमटे केले आहे का, असा खोचक सवालही सावंत यांनी केला.भाजप हे आधुनिक गँगस्टरकोणत्याही थराला जाऊन सत्ता मिळविणारे भाजप हे आधुनिक काळातील गँगस्टर आहेत. स्वातंत्र्य, संविधान यांच्या निर्मितीत त्यांचे योगदान नसल्याने त्याबद्दल त्यांना आदरही वाटत नसल्याचा आरोप सावंत यांनी केला.छत्रपतींच्या वंशजांचा अवमानमराठा आरक्षण विषयावर संभाजीराजेंना संसदेत बोलू दिले नाही, स्वत: मोदींनी भेट दिली नाही. दोन्ही छत्रपतींना मागच्या रांगेत उभे करून, छत्रपतीच्या वंशजाचा अपमान केल्याचेही सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSachin sawantसचिन सावंतchandrakant patilचंद्रकांत पाटीलEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय