शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

विधान परिषद बिनविरोध होणार ?, चंद्रकांत पाटील म्हणाले, ..तर निर्णय घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 17:30 IST

कोल्हापूर : राज्यातील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ...

कोल्हापूर : राज्यातील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिली. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चेनंतर याची खातरजमा करण्यासाठी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली.पाटील म्हणाले, राजीव सातव आणि शरद रणपिसे यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकांबाबत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडून फोन आले. यानंतर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार या निवडणुका बिनविरोध केल्या. परंतु आता तसा कोणताच प्रस्ताव नाही. राष्ट्रवादीचे या निवडणुकीत कुणीच उमेदवार नाहीत. कॉंग्रेस, शिवसेनेचे आहेत. पण त्यांच्याकडून काहीही प्रस्ताव नाही.निष्कारण वेळ आणि पैसा खर्च व्हावा अशी आमची भूमिका नाही. परंतु नागपूरला आम्ही ९० मतांनी आघाडीवर आहोत, धुळेची जागा एकतर्फी आहे, मुंबईत एकच जागा लढवतोय आणि जिंकणार, अकोला लढत आहे आणि कोल्हापुरात तुल्यबळ आहे. असे असताना आम्ही प्रस्ताव द्यायचा प्रश्नच नाही. मात्र आलाच तर विरोधकांचा प्रस्ताव काय आहे, हे पाहून निर्णय घेऊ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक