शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
4
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
5
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
6
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
7
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
8
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
9
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
10
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
11
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
12
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
13
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
14
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
15
साखरपुडा झाल्यानंतर प्राजक्ता गायकवाड तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, म्हणाली "खूप वर्षांपासून"
16
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी
17
"आता या लग्नाच्या हॉलमध्ये आग लागो, काहीही होवो पण....", लग्नाच्या दिवशी उमेश प्रियाला असं का म्हणाला?
18
Sangli Murder: तिसंगी येथे युवकाचा दगडाने ठेचून खून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
19
निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी कुठे, कशी, कधीपासून गुंतवणूक करावी?
20
महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली...

Kolhapur: पन्हाळ्यात ‘जनसुराज्य’ला रोखण्याचे आव्हान; शिंदेसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 17:52 IST

काही ठिकाणी बंडखोरी होणार

सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील नेत्यांनी जोडण्या लावण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यात ‘जनसुराज्य’ला विरोध म्हणून महाविकास आणि महायुतीच्या नेत्यांनी मोट बांधण्याची तयारी केली आहे. आमदार विनय कोरे यांच्या सूक्ष्म नियोजनाला विरोधक कसे उत्तर देतात, याकडे तालुक्याचे लक्ष आहे.तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट, तर पंचायत समितीचे बारा गण आहेत. प्रारूप रचनेत बदल न झाल्याने इच्छुकांनी नि:श्वास टाकला आहे. आमदार विनय कोरे यांच्या पक्षाची प्रत्येक मतदारसंघात ताकद आहे. बेरजेच्या राजकारणामुळे जनसुराज्यमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांची पक्षाकडून अपेक्षा आहे. माजी आमदार सत्यजित पाटील यांच्यासह डॉ. जयंत पाटील यांच्याशी त्यांचे राजकीय सख्य आहे. पन्हाळ्याच्या पश्चिम भागात शिंदेसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांचे वर्चस्व आहे. गतवेळी सत्तेत नसताना नरके यांनी एका जिल्हा परिषदेसह, चार जागा पंचायत समितीच्या जिंकल्या होत्या. आता ते सत्तेबरोबर आहेत. भाजप तीन जागांवर लढण्याच्या तयारीत असला, तरी त्यांचे कोणाशी कसे गणित जुळते, यावरच पुढील राजकारण अवलंबून आहे. तडजोडीच्या राजकारणात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. तालुक्यात इतर पक्ष संघटनांची ताकद ज्या-त्या मतदारसंघात निर्णायक ठरत असल्याने निवडणुकांचे आखाडे बांधताना याचा विचार करावा लागणार आहे.

गतवेळचे बलाबलजिल्हा परिषद ६ जागा

  • जनसुराज्य पक्ष - ३
  • बाबासाहेब पाटील (अजित पवार) - १
  • भाजपा - १
  • चंद्रदीप नरके (शिंदेसेना) - १

पंचायत समिती १२ जागा

  • जनसुराज्य पक्ष - ८
  • महाविकास आघाडी - ४

जनसुराज्यची शक्तीगतवेळी जनसुराज्याने जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सर्वच जागा लढवल्या होत्या. भाजपने मैत्रिपूर्ण लढतीत यवलुज मतदारसंघातून विजय मिळवला होता. जनसुराज्यच्या विरोधात शिंदेसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, उद्धवसेनेचे सत्यजित पाटील, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, काॅंग्रेसचे अमर पाटील, डाॅ. जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी केली होती. तर पी. एन. पाटील गट स्वतंत्र लढला होता. जनसुराज्यने पंचायत समितीच्या ८, तर जिल्हा परिषदेत ३ जागा जिंकून तालुक्याच्या राजकारणावर वर्चस्व निर्माण केले होते.

समीकरणे बदलली..राज्याच्या सत्ता पालटानंतर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. ‘गोकुळ’चे संचालक अमर पाटील यांनी विधानसभेला विनय कोरे यांना उघड पाठिंबा देऊन जिल्हा परिषदेचा शब्द घेतल्याची चर्चा आहे. भाजपने युती धर्म पाळत करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांना विधानसभेला मदत केल्याने मतदारसंघात भाजपला जागा मिळण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांची जिल्हाध्यक्ष पदामुळे राजकीय ताकद वाढल्याने उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.

आरक्षणावर चित्रसत्तेत असणाऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना विजयाची खात्री वाटत आहे. आरक्षण सोडतीनंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. विधानसभेत शब्द दिलेल्या मतदारसंघात उलटसुलट आरक्षण पडले, तर उमेदवाराची घोषणा करताना नेत्यांची कसोटी, तर नाराजांची मनधरणी करताना दमछाक होणार आहे.