शहरं
Join us  
Trending Stories
1
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
3
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
4
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
5
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
6
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
7
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
8
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
9
Shocking: पोट दुखतंय म्हणून मुलाला दवाखान्यात नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहून आई-वडील हादरले!
10
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
11
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
12
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
13
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
14
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
15
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
16
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
17
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
18
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
19
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
20
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...

Kolhapur: पन्हाळ्यात ‘जनसुराज्य’ला रोखण्याचे आव्हान; शिंदेसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 17:52 IST

काही ठिकाणी बंडखोरी होणार

सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील नेत्यांनी जोडण्या लावण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यात ‘जनसुराज्य’ला विरोध म्हणून महाविकास आणि महायुतीच्या नेत्यांनी मोट बांधण्याची तयारी केली आहे. आमदार विनय कोरे यांच्या सूक्ष्म नियोजनाला विरोधक कसे उत्तर देतात, याकडे तालुक्याचे लक्ष आहे.तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट, तर पंचायत समितीचे बारा गण आहेत. प्रारूप रचनेत बदल न झाल्याने इच्छुकांनी नि:श्वास टाकला आहे. आमदार विनय कोरे यांच्या पक्षाची प्रत्येक मतदारसंघात ताकद आहे. बेरजेच्या राजकारणामुळे जनसुराज्यमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांची पक्षाकडून अपेक्षा आहे. माजी आमदार सत्यजित पाटील यांच्यासह डॉ. जयंत पाटील यांच्याशी त्यांचे राजकीय सख्य आहे. पन्हाळ्याच्या पश्चिम भागात शिंदेसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांचे वर्चस्व आहे. गतवेळी सत्तेत नसताना नरके यांनी एका जिल्हा परिषदेसह, चार जागा पंचायत समितीच्या जिंकल्या होत्या. आता ते सत्तेबरोबर आहेत. भाजप तीन जागांवर लढण्याच्या तयारीत असला, तरी त्यांचे कोणाशी कसे गणित जुळते, यावरच पुढील राजकारण अवलंबून आहे. तडजोडीच्या राजकारणात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. तालुक्यात इतर पक्ष संघटनांची ताकद ज्या-त्या मतदारसंघात निर्णायक ठरत असल्याने निवडणुकांचे आखाडे बांधताना याचा विचार करावा लागणार आहे.

गतवेळचे बलाबलजिल्हा परिषद ६ जागा

  • जनसुराज्य पक्ष - ३
  • बाबासाहेब पाटील (अजित पवार) - १
  • भाजपा - १
  • चंद्रदीप नरके (शिंदेसेना) - १

पंचायत समिती १२ जागा

  • जनसुराज्य पक्ष - ८
  • महाविकास आघाडी - ४

जनसुराज्यची शक्तीगतवेळी जनसुराज्याने जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सर्वच जागा लढवल्या होत्या. भाजपने मैत्रिपूर्ण लढतीत यवलुज मतदारसंघातून विजय मिळवला होता. जनसुराज्यच्या विरोधात शिंदेसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, उद्धवसेनेचे सत्यजित पाटील, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, काॅंग्रेसचे अमर पाटील, डाॅ. जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी केली होती. तर पी. एन. पाटील गट स्वतंत्र लढला होता. जनसुराज्यने पंचायत समितीच्या ८, तर जिल्हा परिषदेत ३ जागा जिंकून तालुक्याच्या राजकारणावर वर्चस्व निर्माण केले होते.

समीकरणे बदलली..राज्याच्या सत्ता पालटानंतर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. ‘गोकुळ’चे संचालक अमर पाटील यांनी विधानसभेला विनय कोरे यांना उघड पाठिंबा देऊन जिल्हा परिषदेचा शब्द घेतल्याची चर्चा आहे. भाजपने युती धर्म पाळत करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांना विधानसभेला मदत केल्याने मतदारसंघात भाजपला जागा मिळण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांची जिल्हाध्यक्ष पदामुळे राजकीय ताकद वाढल्याने उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.

आरक्षणावर चित्रसत्तेत असणाऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना विजयाची खात्री वाटत आहे. आरक्षण सोडतीनंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. विधानसभेत शब्द दिलेल्या मतदारसंघात उलटसुलट आरक्षण पडले, तर उमेदवाराची घोषणा करताना नेत्यांची कसोटी, तर नाराजांची मनधरणी करताना दमछाक होणार आहे.