शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

राजू शेट्टी यांच्या विरोधात मोदींनाच उभे करण्याचे स्वाभिमानीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 5:57 PM

भाजपमध्ये दम असेल तर त्या पक्षाने हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टी यांच्या विरोधात मोदी यांना रिंगणात उतरवावे, त्यांना पळता भुई थोडी करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत देण्यात आला. या परिषदेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील शेतकऱ्यांची प्रचंड उपस्थिती आहे.

ठळक मुद्देजयसिंगपूरात ऊस परिषदेस प्रारंभहातकणंगलेमधून भाजपला पळता भुई थोडी करुस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

कोल्हापूर , दि. २८ : भाजपमध्ये दम असेल तर त्या पक्षाने हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टी यांच्या विरोधात मोदी यांना रिंगणात उतरवावे, त्यांना पळता भुई थोडी करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत देण्यात आला. या परिषदेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील शेतकऱ्यांची प्रचंड उपस्थिती आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सोळावी ऊस परिषद सुरु असून त्याला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद आहे. खासदार राजू शेट्टी ज्या मार्गावरून परिषद स्थळी येणार आहेत, त्या मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या आहेत. येतांना त्यांच्या अंगावर शेतकऱ्यांनी फुलांची उधळण करुन त्यांचे स्वागत केले आहे. आता प्रतिक्षा आहे, ती त्यांच्या भाषणाची. या परिषदेत उसाचा अंतिम दर ते जाहीर करणार आहेत.स्वाभिमानीने खा.राजू शेट्टी यांच्या विरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच रिंगणात उतरण्याचे आवाहन केले आहे. यामुळे स्व. मंडलिक यांनी २००९ लोकसभा निवडणूकीत थेट केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना आवाहन केल्याची आठवण कार्यकर्त्यांना झाली. या सभेत शेतकरी नेते जालंदर पाटील, रविकांत तुपकर यांचीही भाषणे झाली. त्यांनीही आपल्या भाषणात सरकारवर टीका केली.सतीश काकडे यांची खालच्या पातळीवरुन टीकासदाभाऊ बारामतीला आल्यास त्यांना कपडे फाटेपर्यंत मार देऊ, त्याला घरात घेऊ नका. आपले वासे मोजल्याशिवाय राहणार नाही. हे बेणं आमच्यासमोर दारू पीत असे अशी अत्यंत खालच्या पातळीवरील टीका शेतकरी कृषी समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी सतीश काकडे यांनी या सभेत केली.जयसिंगपूर येथे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १६ वी ऊस परिषद सुरु झाली आहे. दरवर्षी या परिषदेनंतर उसाचे राजकारण पेटते त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या परिषदेकडे लागून असते. यावर्षीची ऊस परिषद सदाभाऊ खोतांशिवाय होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडली आहे. सदाभाऊ खोतही स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून नव्या रयत क्रांती संघटनेची स्थापना केली आहे.ऊस परिषदेपूर्वीच राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांच्यावर टीका करत उसाचा दर म्हणजे मटक्याचा आकडा नाही अशी टीका केली होती. आता या सर्व पार्श्वभूमीवर राजू शेट्टी आपल्या भाषणात काय बोलणार याकडे सगळ्यांचे कान लागले आहेत.

दरवर्षी ऊस परिषदेनंतर राजू शेट्टी साखरेच्या दरासाठी आंदोलन करून कारखानदार आणि सरकारला वेठीस धरतात. या ऊस परिषदेनंतर राजू शेट्टीच्या आंदोलनाचा काय पवित्रा असणार आहे याच्या कडे कारखानदार आणि सरकारचे डोळे आहे. या ऊस परिषदेत राजू शेट्टीच्या भाषणाची उत्सुकता लागून आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी