शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टी यांच्या विरोधात मोदींनाच उभे करण्याचे स्वाभिमानीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 18:06 IST

भाजपमध्ये दम असेल तर त्या पक्षाने हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टी यांच्या विरोधात मोदी यांना रिंगणात उतरवावे, त्यांना पळता भुई थोडी करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत देण्यात आला. या परिषदेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील शेतकऱ्यांची प्रचंड उपस्थिती आहे.

ठळक मुद्देजयसिंगपूरात ऊस परिषदेस प्रारंभहातकणंगलेमधून भाजपला पळता भुई थोडी करुस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

कोल्हापूर , दि. २८ : भाजपमध्ये दम असेल तर त्या पक्षाने हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टी यांच्या विरोधात मोदी यांना रिंगणात उतरवावे, त्यांना पळता भुई थोडी करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत देण्यात आला. या परिषदेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील शेतकऱ्यांची प्रचंड उपस्थिती आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सोळावी ऊस परिषद सुरु असून त्याला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद आहे. खासदार राजू शेट्टी ज्या मार्गावरून परिषद स्थळी येणार आहेत, त्या मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या आहेत. येतांना त्यांच्या अंगावर शेतकऱ्यांनी फुलांची उधळण करुन त्यांचे स्वागत केले आहे. आता प्रतिक्षा आहे, ती त्यांच्या भाषणाची. या परिषदेत उसाचा अंतिम दर ते जाहीर करणार आहेत.स्वाभिमानीने खा.राजू शेट्टी यांच्या विरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच रिंगणात उतरण्याचे आवाहन केले आहे. यामुळे स्व. मंडलिक यांनी २००९ लोकसभा निवडणूकीत थेट केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना आवाहन केल्याची आठवण कार्यकर्त्यांना झाली. या सभेत शेतकरी नेते जालंदर पाटील, रविकांत तुपकर यांचीही भाषणे झाली. त्यांनीही आपल्या भाषणात सरकारवर टीका केली.सतीश काकडे यांची खालच्या पातळीवरुन टीकासदाभाऊ बारामतीला आल्यास त्यांना कपडे फाटेपर्यंत मार देऊ, त्याला घरात घेऊ नका. आपले वासे मोजल्याशिवाय राहणार नाही. हे बेणं आमच्यासमोर दारू पीत असे अशी अत्यंत खालच्या पातळीवरील टीका शेतकरी कृषी समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी सतीश काकडे यांनी या सभेत केली.जयसिंगपूर येथे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १६ वी ऊस परिषद सुरु झाली आहे. दरवर्षी या परिषदेनंतर उसाचे राजकारण पेटते त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या परिषदेकडे लागून असते. यावर्षीची ऊस परिषद सदाभाऊ खोतांशिवाय होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडली आहे. सदाभाऊ खोतही स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून नव्या रयत क्रांती संघटनेची स्थापना केली आहे.ऊस परिषदेपूर्वीच राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांच्यावर टीका करत उसाचा दर म्हणजे मटक्याचा आकडा नाही अशी टीका केली होती. आता या सर्व पार्श्वभूमीवर राजू शेट्टी आपल्या भाषणात काय बोलणार याकडे सगळ्यांचे कान लागले आहेत.

दरवर्षी ऊस परिषदेनंतर राजू शेट्टी साखरेच्या दरासाठी आंदोलन करून कारखानदार आणि सरकारला वेठीस धरतात. या ऊस परिषदेनंतर राजू शेट्टीच्या आंदोलनाचा काय पवित्रा असणार आहे याच्या कडे कारखानदार आणि सरकारचे डोळे आहे. या ऊस परिषदेत राजू शेट्टीच्या भाषणाची उत्सुकता लागून आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी