शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

कचरा विल्हेवाटीचे पालिकेसमोर आव्हान

By admin | Updated: January 3, 2017 00:32 IST

जयसिंगपूरच्या कचऱ्याला चिपरीकरांचा विरोध : कचऱ्यावरुन आज पालिकेची तातडीची सभा; शहरातून दररोज १६ टन कचरा उठाव

संदीप बावचे --- जयसिंगपूर -गेल्या दहा वर्षांपासून जयसिंगपुरातील कचऱ्याचा प्रश्न आवासून उभा राहिला आहे. शहरातून दररोज १६ टन कचऱ्याचा उठाव होत आहे. २०१० मध्येच कचरा टाकण्यावरून चिपरी ग्रामस्थ व जयसिंगपूर पालिकेत संघर्ष निर्माण झाला होता. जयसिंगपूरचा कचरा आमच्या गावात का? अशी भूमिका चिपरीकरांनी घेतली होती. कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाबरोबरच घनकचरा प्रकल्पही कागदावरच राहिला आहे. कचऱ्याच्या प्रदूषणावरून चिपरी ग्रामस्थांनी पुन्हा विरोधाची भूमिका घेतली आहे. सुरुवातीला जयसिंगपूर शहरातील कचरा सांगली-कोल्हापूर महामार्गावरील धर्मनगरजवळ टाकला जात होता. कालांतराने तेथे वाढलेल्या वस्तीमुळे पालिकेने तेथे कचरा टाकणे बंद केले. त्यानंतर नांदणी नाक्याजवळील खाणीत कचरा टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यालाही स्थानिक नागरिकांचा विरोध झाला. शहरात बंद अवस्थेत असणाऱ्या विहिरीत कचरा टाकून त्या मुजविण्यात आल्या. त्यानंतर कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडल्यानंतर चिपरी गावच्या हद्दीत दोन एकर जागा पालिकेला मिळाली होती. यावेळी नगरपालिकेने १३ व्या वित्त आयोगातून सुमारे एक कोटी रुपये खर्चाचा प्रदूषणविरहित प्रकल्प उभारण्याच्या हालचाली त्यावेळी केल्या होत्या. दरम्यान, टप्प्याटप्प्याने पालिकेने कचरा टाकण्यासाठी उपलब्ध झालेल्या जागेवर वॉल कंपाऊंड, कचऱ्यातील पाणी जमिनीत झिरपून त्याचे प्रदूषण होऊन लोकांना दूषित पाण्याचा त्रास होऊ नये, यासाठी काँक्रिट बेड टाकण्यात आले होते. यावेळी चिपरी गावच्या हद्दीत कचरा टाकण्यावरून ग्रामस्थ व जयसिंगपूर पालिका यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून हा संघर्ष धुमसत आहे. दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून जयसिंगपूर नगरपालिकेकडून शहरातील घनकचरा, मृत जनावरे टाकण्यात येत आहेत. खाणीतील दुर्गंधीचा त्रास परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना जाणवू लागल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने येथील नागरिकांनी आॅक्टोबर २०१६ मध्ये नगरपालिकेकडे तक्रार दाखल करून कचरा न टाकण्याची विनंती केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पालिकेने डिसेंबर अखेरपर्यंत खाणीत कचरा टाकण्याची मुदत घेतली होती. तसेच १ जानेवारीपासून चिपरी हद्दीतील खाणीत कचरा टाकणार नसल्याचे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. १) चिपरी ग्रामस्थांनी जयसिंगपूरच्या कचऱ्याला विरोध करीत कचरा डेपोसमोर चरखुदाई करून रस्ता बंद केला आहे. यामुळे दोन दिवसांपासून कचरा भरून जाणारी वाहने थांबून आहेत. दरम्यान, कचरा टाकण्यासाठी पालिकेकडे सध्या पर्यायी जागाच उपलब्ध नसल्यामुळे पालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींसमोर आव्हान उभे राहिले आहे. ‘लोकमत’कडून वृत्तजयसिंगपूरच्या कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर, ३१ डिसेंबरपर्यंत चिपरीत कचरा टाकण्याची मुदत, चिपरीकरांचा विरोध या मथळ्याखाली ९ डिसेंबर २०१६ रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करुन कचऱ्याचा प्रश्न मांडला होता. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कचरा डेपोसमोर चरखुदाई करुन रस्ता बंद करुन चिपरी ग्रामस्थांनी जयसिंगपूरचा कचरा आमच्या गावात का? अशी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. कचऱ्यावरुन आज सभाचिपरीच्या हद्दीत जयसिंगपूरचा कचरा टाकण्यास ग्रामस्थांनी मज्जाव केल्याने शहरातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जयसिंगपूर पालिकेची आज, मंगळवारी तातडीची विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. कचरा प्रश्नासाठी नव्या सभागृहाने ही सभा आयोजित केली आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.