शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

कचरा विल्हेवाटीचे पालिकेसमोर आव्हान

By admin | Updated: January 3, 2017 00:32 IST

जयसिंगपूरच्या कचऱ्याला चिपरीकरांचा विरोध : कचऱ्यावरुन आज पालिकेची तातडीची सभा; शहरातून दररोज १६ टन कचरा उठाव

संदीप बावचे --- जयसिंगपूर -गेल्या दहा वर्षांपासून जयसिंगपुरातील कचऱ्याचा प्रश्न आवासून उभा राहिला आहे. शहरातून दररोज १६ टन कचऱ्याचा उठाव होत आहे. २०१० मध्येच कचरा टाकण्यावरून चिपरी ग्रामस्थ व जयसिंगपूर पालिकेत संघर्ष निर्माण झाला होता. जयसिंगपूरचा कचरा आमच्या गावात का? अशी भूमिका चिपरीकरांनी घेतली होती. कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाबरोबरच घनकचरा प्रकल्पही कागदावरच राहिला आहे. कचऱ्याच्या प्रदूषणावरून चिपरी ग्रामस्थांनी पुन्हा विरोधाची भूमिका घेतली आहे. सुरुवातीला जयसिंगपूर शहरातील कचरा सांगली-कोल्हापूर महामार्गावरील धर्मनगरजवळ टाकला जात होता. कालांतराने तेथे वाढलेल्या वस्तीमुळे पालिकेने तेथे कचरा टाकणे बंद केले. त्यानंतर नांदणी नाक्याजवळील खाणीत कचरा टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यालाही स्थानिक नागरिकांचा विरोध झाला. शहरात बंद अवस्थेत असणाऱ्या विहिरीत कचरा टाकून त्या मुजविण्यात आल्या. त्यानंतर कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडल्यानंतर चिपरी गावच्या हद्दीत दोन एकर जागा पालिकेला मिळाली होती. यावेळी नगरपालिकेने १३ व्या वित्त आयोगातून सुमारे एक कोटी रुपये खर्चाचा प्रदूषणविरहित प्रकल्प उभारण्याच्या हालचाली त्यावेळी केल्या होत्या. दरम्यान, टप्प्याटप्प्याने पालिकेने कचरा टाकण्यासाठी उपलब्ध झालेल्या जागेवर वॉल कंपाऊंड, कचऱ्यातील पाणी जमिनीत झिरपून त्याचे प्रदूषण होऊन लोकांना दूषित पाण्याचा त्रास होऊ नये, यासाठी काँक्रिट बेड टाकण्यात आले होते. यावेळी चिपरी गावच्या हद्दीत कचरा टाकण्यावरून ग्रामस्थ व जयसिंगपूर पालिका यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून हा संघर्ष धुमसत आहे. दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून जयसिंगपूर नगरपालिकेकडून शहरातील घनकचरा, मृत जनावरे टाकण्यात येत आहेत. खाणीतील दुर्गंधीचा त्रास परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना जाणवू लागल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने येथील नागरिकांनी आॅक्टोबर २०१६ मध्ये नगरपालिकेकडे तक्रार दाखल करून कचरा न टाकण्याची विनंती केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पालिकेने डिसेंबर अखेरपर्यंत खाणीत कचरा टाकण्याची मुदत घेतली होती. तसेच १ जानेवारीपासून चिपरी हद्दीतील खाणीत कचरा टाकणार नसल्याचे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. १) चिपरी ग्रामस्थांनी जयसिंगपूरच्या कचऱ्याला विरोध करीत कचरा डेपोसमोर चरखुदाई करून रस्ता बंद केला आहे. यामुळे दोन दिवसांपासून कचरा भरून जाणारी वाहने थांबून आहेत. दरम्यान, कचरा टाकण्यासाठी पालिकेकडे सध्या पर्यायी जागाच उपलब्ध नसल्यामुळे पालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींसमोर आव्हान उभे राहिले आहे. ‘लोकमत’कडून वृत्तजयसिंगपूरच्या कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर, ३१ डिसेंबरपर्यंत चिपरीत कचरा टाकण्याची मुदत, चिपरीकरांचा विरोध या मथळ्याखाली ९ डिसेंबर २०१६ रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करुन कचऱ्याचा प्रश्न मांडला होता. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कचरा डेपोसमोर चरखुदाई करुन रस्ता बंद करुन चिपरी ग्रामस्थांनी जयसिंगपूरचा कचरा आमच्या गावात का? अशी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. कचऱ्यावरुन आज सभाचिपरीच्या हद्दीत जयसिंगपूरचा कचरा टाकण्यास ग्रामस्थांनी मज्जाव केल्याने शहरातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जयसिंगपूर पालिकेची आज, मंगळवारी तातडीची विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. कचरा प्रश्नासाठी नव्या सभागृहाने ही सभा आयोजित केली आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.