शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

साखर निर्यात बंदीचा केंद्र सरकारचा निर्णय मुर्खपणाचा, माजी खासदार राजू शेट्टींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 15:52 IST

या धोेरणामुळे शेतकऱ्यांसह संपूर्ण उद्योग खड्ड्यात जाईल

कोल्हापूर : दिल्लीत कृषी भवनमध्ये अति शहाण्या लोकांच्या सल्ल्याने साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत मुर्खपणाचा आहे, अशी जोरदार टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. या धोेरणामुळे शेतकऱ्यांसह संपूर्ण उद्योग खड्ड्यात जाईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने एक जून पासून साखरेच्या निर्यातीवर बंदीचा घेण्याचे नियोजन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना शेतमालाच्या निर्यात बंदीच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले,केंद्र सरकारने रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली, त्याचा फटका गहू उत्पादकांना बसला. कांदा निर्यात बंदी केली, तो आता एक रुपया दराने शेतकऱ्यांकडून घेतला जात आहे. साखरेवर बंदी घातली तर गहू आणि कांद्यासारखी परिस्थिती होऊन बऱ्याच संकटानंतर आता कुठे सावरत असलेला साखर उद्योग पुन्हा मोडून पडणार आहे.

महाराष्ट्रात अद्यापही हजारो एकरातील ऊस गाळपाविना पडून आहे. ऊस गाळपाला जात नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करू लागला आहे. यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन होणार आहे. गेल्या वर्षीची ८५ लाख टन साखर शिल्लक होती. यंदा ३५५ लाख टन साखर उत्पादित झालेली आहे. ४४० लाख टन साखरेपैकी २८० लाख टन साखर देशाला लागते. ८० लाख टन निर्यात झालेली आहे. देशात या क्षणाला ८० लाख टन साखर शिल्लक आहे. पुढच्या वर्षी देखील साखरेचे विक्रमी उत्पादन होणार आहे.

शिल्लक साखरेचे करणार काय

पुढील वर्षी देखील ११० लाख टन साखर निर्यात करावी लागणार आहे. निर्यात न झाल्यास मग शिल्लक साखरेचे काय करायचे असा प्रश्न साखर उद्योगासमोर निर्माण होणार आहे. पुढील वर्षीच्या निर्यातीचे आंतरराष्ट्रीय बाजारातील करार न झाल्यास साखर उद्योगावर गंभीर परिणाम होतील अशी भीतीही शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेCentral Governmentकेंद्र सरकारRaju Shettyराजू शेट्टी