शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

साखर निर्यात बंदीचा केंद्र सरकारचा निर्णय मुर्खपणाचा, माजी खासदार राजू शेट्टींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 15:52 IST

या धोेरणामुळे शेतकऱ्यांसह संपूर्ण उद्योग खड्ड्यात जाईल

कोल्हापूर : दिल्लीत कृषी भवनमध्ये अति शहाण्या लोकांच्या सल्ल्याने साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत मुर्खपणाचा आहे, अशी जोरदार टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. या धोेरणामुळे शेतकऱ्यांसह संपूर्ण उद्योग खड्ड्यात जाईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने एक जून पासून साखरेच्या निर्यातीवर बंदीचा घेण्याचे नियोजन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना शेतमालाच्या निर्यात बंदीच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले,केंद्र सरकारने रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली, त्याचा फटका गहू उत्पादकांना बसला. कांदा निर्यात बंदी केली, तो आता एक रुपया दराने शेतकऱ्यांकडून घेतला जात आहे. साखरेवर बंदी घातली तर गहू आणि कांद्यासारखी परिस्थिती होऊन बऱ्याच संकटानंतर आता कुठे सावरत असलेला साखर उद्योग पुन्हा मोडून पडणार आहे.

महाराष्ट्रात अद्यापही हजारो एकरातील ऊस गाळपाविना पडून आहे. ऊस गाळपाला जात नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करू लागला आहे. यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन होणार आहे. गेल्या वर्षीची ८५ लाख टन साखर शिल्लक होती. यंदा ३५५ लाख टन साखर उत्पादित झालेली आहे. ४४० लाख टन साखरेपैकी २८० लाख टन साखर देशाला लागते. ८० लाख टन निर्यात झालेली आहे. देशात या क्षणाला ८० लाख टन साखर शिल्लक आहे. पुढच्या वर्षी देखील साखरेचे विक्रमी उत्पादन होणार आहे.

शिल्लक साखरेचे करणार काय

पुढील वर्षी देखील ११० लाख टन साखर निर्यात करावी लागणार आहे. निर्यात न झाल्यास मग शिल्लक साखरेचे काय करायचे असा प्रश्न साखर उद्योगासमोर निर्माण होणार आहे. पुढील वर्षीच्या निर्यातीचे आंतरराष्ट्रीय बाजारातील करार न झाल्यास साखर उद्योगावर गंभीर परिणाम होतील अशी भीतीही शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेCentral Governmentकेंद्र सरकारRaju Shettyराजू शेट्टी