शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

बाजार समितीतील भूखंड भाडेकरार रद्द करा, जिल्हा उपनिबंधकांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 14:19 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत मागील व राजीनामे दिलेल्या संचालक मंडळाने अनेक चुकीच्या भूखंडांचे वाटप केले असून ...

ठळक मुद्देबाजार समितीतील भूखंड भाडेकरार रद्द करा, जिल्हा उपनिबंधकांचे निर्देश रोजंदारी २९ कर्मचाऱ्यांना कमी करण्याचेही आदेश

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत मागील व राजीनामे दिलेल्या संचालक मंडळाने अनेक चुकीच्या भूखंडांचे वाटप केले असून त्यांचे भाडेकरार तत्काळ रद्द करून ते समितीच्या ताब्यात घ्यावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी समिती प्रशासनाला दिले आहेत.

रोजंदारी कर्मचाऱ्यांची भरती ही बेकायदेशीर असून त्यांनाही कामावरून कमी करण्याचे आदेश दिले आहेत. या कार्यवाहीचा अहवाल महिन्यात कार्यालयास सादर करण्यास सांगितला आहे.मागील संचालक मंडळाने (२०१५ पूर्वीच्या) ११६ प्लॉट एकाच व्यक्ती अथवा संस्थेंच्या नावावर दोनपेक्षा अधिक प्लॉट दिले आहेत. १८ जून २०१२ रोजी तत्कालीन सभापती दिनकर कोतेकर यांनी संचालकांच्या सहमतीशिवाय एकट्यानेच अडत विभागातील प्लॉट क्रमांक ३३ (जुना) व नवीन प्लॉट क्रमांक १९ चे शेजारील बोळ भाडेकरारावर मदन आण्णासाहेब मिरजकर यांना बेकायदेशीरपणे दिला आहे.

कोतेकर यांच्यावर समितीच्या स्तरावर कायदेशीर कारवाई करावी. मुख्य बाजार आवारातील प्लॉट क्रमांक २७६ लगत पूर्व बाजूकडील जागा अमोल चटके यांना शेतीमाल वाहतूक ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी देण्याचा ठराव केला, तो बेकायदेशीर आहे.राजीनामा दिलेल्या संचालकांनी शाहू मार्केट गेट क्रमांक सुरक्षा चौकी भाड्याने दिली. मात्र ती खुली जागा व रस्ता आहे. मात्र तत्कालीन सभापती बाबासाहेब लाड यांनी ६९० चौरस फूट बेकायदेशीररीत्या दिली आहे. त्याचबरोबर फळे व भाजीपाला युनिट क्रमांक १ व २ च्या पूर्व बाजूला दिलेल्या प्लॉटचे करार रद्द करावेत.

रस्ता क्रमांक ९ दक्षिण बाजूस सेंट्रल वेअर हाऊसच्या उत्तरेकडील कंपौंडलगत १० बाय १० चे प्लॉट ३० वर्षे मुदतीने महापालिकेची मान्यता न घेताच दिले आहेत, तो करार रद्द करावा.मागील संचालक मंडळाने केलेल्या रोजंदारी भरतीतील कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाने कामावर घेण्याचे आदेश दिले. मात्र याबाबत औद्योगिक न्यायालयात एक याचिका प्रलंबित असून तिथे प्रभावीपणे बाजू मांडण्याचे आदेश दिले.

राजीनामा दिलेल्या संचालकांनी २९ कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपूर्वी हजार दाखवून कामावर घेतले आहे. त्यांच्या पगारापोटी ३६ लाख ६६ हजार रुपये खर्ची टाकले असून ते वसूलपात्र आहेत. त्याचबरोबर त्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करावे, असे आदेशही जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिले.९० ऐवजी ३० वर्षांचा भाडेकरार कराजुन्या संचालकांनी शाहू मार्केट यार्ड १९६ व टेंबलाईवाडी येथील २१३ प्लॉट ९० वर्षांच्या भाडेकराराने दिले आहेत. हे करार रद्द करून ३० वर्षांो करण्याची सूचना जिल्हा उपनिबंधकांनी दिली आहे.टेंबलाईवाडीला स्थलांतर न होणाऱ्यांचे करार रद्द कराटेंबलाईवाडी उपबाजार विकसित करण्यासाठी चार कोटी १२ लाख रुपये खर्च केला. मात्र तिथे व्यापारी स्थलांतरित होत नाहीत. जर ते स्थलांतरित होणार नसतील तर त्यांचे भाडे करार रद्द करावेत, असे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूर