शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

कर्नाटकातील पुलांमुळे 'शिरोळ'ला 'महापुरा'चा धोका, १५ किलोमीटर अंतरात चार पूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 12:17 IST

२००५, २०१९ व २०२१ अशा तीन महापुराने संपूर्ण शिरोळ तालुका उद्ध्वस्त झाला आहे. अंकली-मांजरी दरम्यान कृष्णा नदीवरील बांधलेला कर्नाटक शासनाने पूल व त्याच्या दोन्ही बाजूला घातलेला भराव हाच या पुराचे कारण असल्याचे तज्ज्ञ मान्य करतात

मिलिंद देशपांडे

दत्तवाड : शिरोळ तालुक्यातील महापुराला कारणीभूत ठरत असलेल्या मांजरी-अंकली या कृष्णा नदीवरील पुलाचा भराव काढण्याची मागणी एकीकडे हात असताना कर्नाटक सरकार मात्र कल्लोळ-येडूर असा नवीन पूल बांधून नवीन भराव घालत असल्याने शिरोळ तालुका पुन्हा एकदा महापुराच्या संकटात लोटला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

२००५, २०१९ व २०२१ अशा तीन महापुराने संपूर्ण शिरोळ तालुका उद्ध्वस्त झाला आहे. अंकली-मांजरी दरम्यान कृष्णा नदीवरील बांधलेला कर्नाटक शासनाने पूल व त्याच्या दोन्ही बाजूला घातलेला भराव हाच या पुराचे कारण असल्याचे तज्ज्ञ मान्य करतात. मात्र, हा भराव काढून तेथे पिलर करावेत, अशी मागणी शिरोळ तालुक्यातून होत असतानाच कर्नाटक शासनाने खिद्रापूर-जुगूळ, टाकळी-चंदूर असे दोन नवीन पूल बांधण्यास सुरुवात केली आहे.

येथील भराव काढावा व पिलर करावेत, अशी शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा, दुधगंगा नदीकाठावरील गावांतून मागणी सुरू असतानाच कर्नाटक शासनाने कल्लोळ-येडूर हा नवीन पूल बांधण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी तेथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा होता. पण तो कमकुवत होऊन महापुरात त्याचा काही भाग वाहून गेला. यानंतर तेथील वाहतूक बंद आहे. पण पुढे दोन किलोमीटरवर अंकली-मांजरी पूल असल्याने वाहतूक त्या पुलावरून सुरू होती.

पण शासनाने वाहून गेलेल्या बंधारा लगतच नवीन पूल बांधण्यास सुरू केली असून, या पुलाला देखील दोन्ही बाजूला भराव घातला जाणार आहे. त्यामुळे आधीचा अंकली-मांजरी पूल याबरोबरच खिद्रापूर-जुगूळ व टाकळी-चंदूर हे दोन पूर्ण होत असतानाच यामध्ये या चौथ्या पुलाचे काम सुरू असल्याने महापुराचे पाणी खाली वाहून जाण्यास मोठा अडथळा निर्माण होणार आहे. पंधरा किलोमीटर अंतरामध्ये चार पूल झाल्याने महापुराचे पाणी जास्त दिवस राहणार आहे. यामुळे शिरोळ तालुका महापुराच्या पाण्याने वेढला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरKarnatakकर्नाटकshirol-acशिरोळ