शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

कर्नाटकातील पुलांमुळे 'शिरोळ'ला 'महापुरा'चा धोका, १५ किलोमीटर अंतरात चार पूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 12:17 IST

२००५, २०१९ व २०२१ अशा तीन महापुराने संपूर्ण शिरोळ तालुका उद्ध्वस्त झाला आहे. अंकली-मांजरी दरम्यान कृष्णा नदीवरील बांधलेला कर्नाटक शासनाने पूल व त्याच्या दोन्ही बाजूला घातलेला भराव हाच या पुराचे कारण असल्याचे तज्ज्ञ मान्य करतात

मिलिंद देशपांडे

दत्तवाड : शिरोळ तालुक्यातील महापुराला कारणीभूत ठरत असलेल्या मांजरी-अंकली या कृष्णा नदीवरील पुलाचा भराव काढण्याची मागणी एकीकडे हात असताना कर्नाटक सरकार मात्र कल्लोळ-येडूर असा नवीन पूल बांधून नवीन भराव घालत असल्याने शिरोळ तालुका पुन्हा एकदा महापुराच्या संकटात लोटला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

२००५, २०१९ व २०२१ अशा तीन महापुराने संपूर्ण शिरोळ तालुका उद्ध्वस्त झाला आहे. अंकली-मांजरी दरम्यान कृष्णा नदीवरील बांधलेला कर्नाटक शासनाने पूल व त्याच्या दोन्ही बाजूला घातलेला भराव हाच या पुराचे कारण असल्याचे तज्ज्ञ मान्य करतात. मात्र, हा भराव काढून तेथे पिलर करावेत, अशी मागणी शिरोळ तालुक्यातून होत असतानाच कर्नाटक शासनाने खिद्रापूर-जुगूळ, टाकळी-चंदूर असे दोन नवीन पूल बांधण्यास सुरुवात केली आहे.

येथील भराव काढावा व पिलर करावेत, अशी शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा, दुधगंगा नदीकाठावरील गावांतून मागणी सुरू असतानाच कर्नाटक शासनाने कल्लोळ-येडूर हा नवीन पूल बांधण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी तेथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा होता. पण तो कमकुवत होऊन महापुरात त्याचा काही भाग वाहून गेला. यानंतर तेथील वाहतूक बंद आहे. पण पुढे दोन किलोमीटरवर अंकली-मांजरी पूल असल्याने वाहतूक त्या पुलावरून सुरू होती.

पण शासनाने वाहून गेलेल्या बंधारा लगतच नवीन पूल बांधण्यास सुरू केली असून, या पुलाला देखील दोन्ही बाजूला भराव घातला जाणार आहे. त्यामुळे आधीचा अंकली-मांजरी पूल याबरोबरच खिद्रापूर-जुगूळ व टाकळी-चंदूर हे दोन पूर्ण होत असतानाच यामध्ये या चौथ्या पुलाचे काम सुरू असल्याने महापुराचे पाणी खाली वाहून जाण्यास मोठा अडथळा निर्माण होणार आहे. पंधरा किलोमीटर अंतरामध्ये चार पूल झाल्याने महापुराचे पाणी जास्त दिवस राहणार आहे. यामुळे शिरोळ तालुका महापुराच्या पाण्याने वेढला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरKarnatakकर्नाटकshirol-acशिरोळ