शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

कर्नाटकातील पुलांमुळे 'शिरोळ'ला 'महापुरा'चा धोका, १५ किलोमीटर अंतरात चार पूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 12:17 IST

२००५, २०१९ व २०२१ अशा तीन महापुराने संपूर्ण शिरोळ तालुका उद्ध्वस्त झाला आहे. अंकली-मांजरी दरम्यान कृष्णा नदीवरील बांधलेला कर्नाटक शासनाने पूल व त्याच्या दोन्ही बाजूला घातलेला भराव हाच या पुराचे कारण असल्याचे तज्ज्ञ मान्य करतात

मिलिंद देशपांडे

दत्तवाड : शिरोळ तालुक्यातील महापुराला कारणीभूत ठरत असलेल्या मांजरी-अंकली या कृष्णा नदीवरील पुलाचा भराव काढण्याची मागणी एकीकडे हात असताना कर्नाटक सरकार मात्र कल्लोळ-येडूर असा नवीन पूल बांधून नवीन भराव घालत असल्याने शिरोळ तालुका पुन्हा एकदा महापुराच्या संकटात लोटला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

२००५, २०१९ व २०२१ अशा तीन महापुराने संपूर्ण शिरोळ तालुका उद्ध्वस्त झाला आहे. अंकली-मांजरी दरम्यान कृष्णा नदीवरील बांधलेला कर्नाटक शासनाने पूल व त्याच्या दोन्ही बाजूला घातलेला भराव हाच या पुराचे कारण असल्याचे तज्ज्ञ मान्य करतात. मात्र, हा भराव काढून तेथे पिलर करावेत, अशी मागणी शिरोळ तालुक्यातून होत असतानाच कर्नाटक शासनाने खिद्रापूर-जुगूळ, टाकळी-चंदूर असे दोन नवीन पूल बांधण्यास सुरुवात केली आहे.

येथील भराव काढावा व पिलर करावेत, अशी शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा, दुधगंगा नदीकाठावरील गावांतून मागणी सुरू असतानाच कर्नाटक शासनाने कल्लोळ-येडूर हा नवीन पूल बांधण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी तेथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा होता. पण तो कमकुवत होऊन महापुरात त्याचा काही भाग वाहून गेला. यानंतर तेथील वाहतूक बंद आहे. पण पुढे दोन किलोमीटरवर अंकली-मांजरी पूल असल्याने वाहतूक त्या पुलावरून सुरू होती.

पण शासनाने वाहून गेलेल्या बंधारा लगतच नवीन पूल बांधण्यास सुरू केली असून, या पुलाला देखील दोन्ही बाजूला भराव घातला जाणार आहे. त्यामुळे आधीचा अंकली-मांजरी पूल याबरोबरच खिद्रापूर-जुगूळ व टाकळी-चंदूर हे दोन पूर्ण होत असतानाच यामध्ये या चौथ्या पुलाचे काम सुरू असल्याने महापुराचे पाणी खाली वाहून जाण्यास मोठा अडथळा निर्माण होणार आहे. पंधरा किलोमीटर अंतरामध्ये चार पूल झाल्याने महापुराचे पाणी जास्त दिवस राहणार आहे. यामुळे शिरोळ तालुका महापुराच्या पाण्याने वेढला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरKarnatakकर्नाटकshirol-acशिरोळ