शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

प्राप्तिकराचे बाटलीतले भूत मानगुटीवर : साखर कारखानदार हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 18:11 IST

उसाच्या राज्याच्या वैधानिक किमतीपेक्षा जादा दिलेल्या ऊसदरावर कसा प्राप्तिकर लावायचा याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे बाटलीत बंद असलेले हे प्राप्तिकराचे भूत देशातील साखर

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर वसुलीच्या नोटिसा

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : उसाच्या राज्याच्या वैधानिक किमतीपेक्षा जादा दिलेल्या ऊसदरावर कसा प्राप्तिकर लावायचा याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे बाटलीत बंद असलेले हे प्राप्तिकराचे भूत देशातील साखर कारखान्यांच्या मानगुटीवर बसणार आहे. प्राप्तिकर खात्याकडून एफआरपी लागू होण्यापूर्वीच्या काळातील या कराच्या नोटिसा येऊ लागल्याने कारखानदार हवालदिल झाले आहेत.

एफआरपी लागू होण्यापूर्वी उसाला किमान वैधानिक दर होता. साखर नियंत्रण कायदा १९६६ च्या कलम ३ नुसार तो पहिला हप्ता म्हणून होता. कलम ५ अ नुसार हंगाम समाप्तीनंतर अतिरिक्त दर ठरविण्याची तरतूद होती. तथापि, राज्यात उसाला दुसरा, तिसरा आणि अंतिम दर असे आणखी तीन हप्ते साखर आयुक्तांच्या मान्यतेने दिले जात होते; परंतु प्राप्तिकर विभागाने किमान जो दर दिला असेल त्यावर दिलेली सर्व रक्कम नफा समजून त्यावर प्राप्तिकरांच्या नोटिसा लागू केल्या होत्या. याऊलट किमान वैधानिक दरापेक्षा जादा दिलेली किंमत मंत्री समितीच्या शिफारसीनुसार साखर आयुक्तांच्या मान्यतेने दिलेली असल्याने तो राज्याने सुचविलेला दर (एसएपी) ठरतो. त्यामुळे तो नफ्यात धरण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच स्पर्धेमुळे असा दर देणे भाग असल्यामुळे किमान वैधानिक दरापेक्षा जादा दिलेली रक्कम ही कच्च्या मालाच्या खरेदीची किंमत समजून तो कारखान्याचा खर्च आहे. यामुळे प्राप्तिकर खात्याच्या या नोटिसा गैरलागू आहेत.

मात्र, तो प्राप्तिकर खात्याला कारखान्यांचा हा युक्तिवाद अमान्य होता. त्यामुळे १९९९ मध्ये कारखानदारांनी या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.तासगाव तालुका सहकारी साखर कारखान्याने त्यात आघाडी घेतली होती. कारखान्यांच्या या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ५ मार्चला अंतिम निकाल दिला आहे. तो निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने कलम ५ अ मान्य केले आहे. याचवेळी एसएपीपेक्षा जादा दिलेला दर नफा धरावा, असेही म्हटलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना असे म्हटले आहे की, कलम ३ आणि कलम ५ अ पेक्षा जादा दिलेला दर, तसेच साखरेपासून मिळणारे उत्पन्न आणि खर्च याचा सखोल अभ्यास करून नफ्याबाबत निर्णय घ्यावा. त्यामुळे हा निर्णय तसा कारखानदारांच्या बाजूनेही नाही आणि प्राप्तिकर खात्याच्या बाजूनेही नाही. मात्र, या निकालाच्या आधारे प्राप्तिकर खात्याने महाराष्ट, गुजरात आणि कर्नाटकातील सहकारी साखर कारखान्यांना नोटिसा बजावणे सुरू केले आहे. कोट्यवधी रुपयांच्या या नोटिसा असल्यामुळे अतिरिक्त साखरेच्या प्रश्नाने हैराण झालेले कारखानदार आणखी हवालदिल झाले आहेत. या निकालावर काय भूमिका घ्यायची याच्यावर त्यांचे विचारमंथन सुरू आहे.‘एफआरपी’नंतर प्रश्न निकालातऊसदर ठरविण्यासाठी रंगराजन समितीच्या निर्णयानुसार २००९ मध्ये ७०:३० चे सूत्र स्वीकारण्यात आले. हे सूत्र म्हणजेच रास्त आणि वाजवी दर (एफआरपी) होय. यामध्ये एकूण उत्पन्नाच्या ७० टक्के वाटा कारखान्याचा, तर३० टक्के वाटा शेतकऱ्याला उसाची किंमत म्हणून दिला जातो. यामुळे एफआरपी लागू झाल्यापासून प्राप्तिकर कसा आकारायचा, हा मुद्दा निकालात निघाला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास सुरू आहे. तो पूर्ण झाल्यांनतर निवडक कारखानदारांची बैठक बोलावून प्राप्तिकर खात्याच्या नोटिसा आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल यावर काय भूमिका घ्यावयाची, याचा निर्णय चर्चा करून घेतला जाईल.- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्टÑीय साखर कारखाना महासंघ.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर