शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

विदेशी वृक्षांची लागवड करू नका, तज्ज्ञांची महापालिकेला विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 18:16 IST

कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत येत्या जून महिन्यापासून शहरात पंधरा हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यामध्ये विदेशी वृक्षांचा भरणा असल्यामुळे निसर्गप्रेमी आणि वनस्पती तज्ज्ञांनी या वृक्षांची लागवड न करण्याची विनंती महानगरपालिकेला केली आहे. यामध्ये वनस्पती तज्ज्ञ आणि निवृत्त प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर, निसर्ग मित्र परिवार यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देविदेशी वृक्षांची लागवड करू नका निसर्गप्रेमी आणि वनस्पती तज्ज्ञांची महापालिकेला विनंती

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत येत्या जून महिन्यापासून शहरात पंधरा हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यामध्ये विदेशी वृक्षांचा भरणा असल्यामुळे निसर्गप्रेमी आणि वनस्पती तज्ज्ञांनी या वृक्षांची लागवड न करण्याची विनंती महानगरपालिकेला केली आहे. यामध्ये वनस्पती तज्ज्ञ आणि निवृत्त प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर, निसर्ग मित्र परिवार यांचा समावेश आहे.जून महिन्यात कोल्हापूर महानगरपालिकेने शहर परिसरात राबविणार असलेल्या १५ हजार वृक्षारोपणासाठी अनेक देशी आणि विदेशी रोपांची निवड केली आहे. त्याची यादी यापूर्वी झाली आहे. यामध्ये कोनोकार्पस या घातक विदेशी वृक्षाचा समावेश आहे.

दोन प्रजातींमध्ये आढळणारा हा वृक्ष दक्षिण अमेरिका खंडातील आहे. काही देशांत याची लागवड करण्यात आली. तो हिरडा बेहडाच्या कुळातील आहे. याची फळे, फुले आकर्षक नाहीत, पण घनदाट पर्णसांभार व दाट सावली देणारा हा वृक्ष जलद वाढतो म्हणून लागवड केला जातो. परंतु, तो माणसांच्या आरोग्यासाठी घातक आहे.आपल्याकडे समृद्ध आणि नैसर्गिक वनस्पती विविधता असतानाही अनेक विदेशी वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात करीत आहोत. यामुळे आपली स्थानिक जैवविविधता धोक्यात आली आहे. हे थांबविण्याचे आवाहन डॉ. बाचूळकर यांनी केले.पाणी पिणारा, इमारतींसाठी धोकादायक वृक्षकोनोकार्पस या वृक्षाची मोठ्या वेगाने वाढ होते. त्याची मुळे जमिनीत खोलवर शिरतात व सर्व बाजूंनी वेगाने पसरतात. ही मुळे जमिनीतील पाणी मोठ्या प्रमाणात शोषून घेतात. तसेच ती शेजारी असणाऱ्या इमारतींखाली शिरतात. यामुळे इमारती व इतर वृक्षांना धोकादायक ठरतात.माणसासाठी घातककोनोकार्पस वृक्ष माणसांच्या आरोग्यासाठी घातक आहे. याला वर्षातून दोन वेळा फुलांचा बहर येतो. तेव्हा मोठ्या प्रमाणात परागकण तयार होतात व वातावरणात पसरतात. ते माणसांच्या शरीरात श्वासामार्फत जातात. यामुळे घसा व श्वसनाचे आजार होतात. दमा आणि खोकल्याचा त्रास होतो.देशी वृक्षांचे रोपण कराबाहवा, तामण, कदंब, कडूलिंब, शिरीष, पांगारा, करंज, बकूळ यांसारख्या देशी वृक्षांचीच मोठ्या प्रमाणात लागवड करा आणि कोल्हापूरच्या जैवविविधतेचे संरक्षण करा, असे आवाहन निसर्गमित्र परिवाराने केले. 

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर