शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

विदेशी वृक्षांची लागवड करू नका, तज्ज्ञांची महापालिकेला विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 18:16 IST

कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत येत्या जून महिन्यापासून शहरात पंधरा हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यामध्ये विदेशी वृक्षांचा भरणा असल्यामुळे निसर्गप्रेमी आणि वनस्पती तज्ज्ञांनी या वृक्षांची लागवड न करण्याची विनंती महानगरपालिकेला केली आहे. यामध्ये वनस्पती तज्ज्ञ आणि निवृत्त प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर, निसर्ग मित्र परिवार यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देविदेशी वृक्षांची लागवड करू नका निसर्गप्रेमी आणि वनस्पती तज्ज्ञांची महापालिकेला विनंती

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत येत्या जून महिन्यापासून शहरात पंधरा हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यामध्ये विदेशी वृक्षांचा भरणा असल्यामुळे निसर्गप्रेमी आणि वनस्पती तज्ज्ञांनी या वृक्षांची लागवड न करण्याची विनंती महानगरपालिकेला केली आहे. यामध्ये वनस्पती तज्ज्ञ आणि निवृत्त प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर, निसर्ग मित्र परिवार यांचा समावेश आहे.जून महिन्यात कोल्हापूर महानगरपालिकेने शहर परिसरात राबविणार असलेल्या १५ हजार वृक्षारोपणासाठी अनेक देशी आणि विदेशी रोपांची निवड केली आहे. त्याची यादी यापूर्वी झाली आहे. यामध्ये कोनोकार्पस या घातक विदेशी वृक्षाचा समावेश आहे.

दोन प्रजातींमध्ये आढळणारा हा वृक्ष दक्षिण अमेरिका खंडातील आहे. काही देशांत याची लागवड करण्यात आली. तो हिरडा बेहडाच्या कुळातील आहे. याची फळे, फुले आकर्षक नाहीत, पण घनदाट पर्णसांभार व दाट सावली देणारा हा वृक्ष जलद वाढतो म्हणून लागवड केला जातो. परंतु, तो माणसांच्या आरोग्यासाठी घातक आहे.आपल्याकडे समृद्ध आणि नैसर्गिक वनस्पती विविधता असतानाही अनेक विदेशी वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात करीत आहोत. यामुळे आपली स्थानिक जैवविविधता धोक्यात आली आहे. हे थांबविण्याचे आवाहन डॉ. बाचूळकर यांनी केले.पाणी पिणारा, इमारतींसाठी धोकादायक वृक्षकोनोकार्पस या वृक्षाची मोठ्या वेगाने वाढ होते. त्याची मुळे जमिनीत खोलवर शिरतात व सर्व बाजूंनी वेगाने पसरतात. ही मुळे जमिनीतील पाणी मोठ्या प्रमाणात शोषून घेतात. तसेच ती शेजारी असणाऱ्या इमारतींखाली शिरतात. यामुळे इमारती व इतर वृक्षांना धोकादायक ठरतात.माणसासाठी घातककोनोकार्पस वृक्ष माणसांच्या आरोग्यासाठी घातक आहे. याला वर्षातून दोन वेळा फुलांचा बहर येतो. तेव्हा मोठ्या प्रमाणात परागकण तयार होतात व वातावरणात पसरतात. ते माणसांच्या शरीरात श्वासामार्फत जातात. यामुळे घसा व श्वसनाचे आजार होतात. दमा आणि खोकल्याचा त्रास होतो.देशी वृक्षांचे रोपण कराबाहवा, तामण, कदंब, कडूलिंब, शिरीष, पांगारा, करंज, बकूळ यांसारख्या देशी वृक्षांचीच मोठ्या प्रमाणात लागवड करा आणि कोल्हापूरच्या जैवविविधतेचे संरक्षण करा, असे आवाहन निसर्गमित्र परिवाराने केले. 

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर