शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारचा उदासीन अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 09:51 IST

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्र्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यात महाराष्ट्राची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ हरिष साळवे यांना भेटायला राज्य मंत्रिमंडळातील कुणाला सवड नसल्याने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने रविवारी येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाच साकडे घातले.

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्र्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यात महाराष्ट्राची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ हरिष साळवे यांना भेटायला राज्य मंत्रिमंडळातील कुणाला सवड नसल्याने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने रविवारी येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाच साकडे घातले. पवार यानी या समितीच्या प्रतिनिधींना आज सोमवारी दिल्लीत बोलवले आहे. त्यानुसार समितीचे अध्यक्ष दीपक दळवी व प्रकाश मरगाळे हे रविवारी रात्रीच बेळगावहून दिल्लीस रवाना होत आहेत. याप्रश्र्नी महाराष्ट्र सरकारची भूमिका उदासीन असल्याचा अनुभव येत आहे.

पवार शनिवारपासून कोल्हापूर दौ-यावर होेते. रविवारी सकाळी समितीचे नेते दळवी, उपाध्यक्ष अ‍ॅड. राजाभाऊ पाटील, यांच्यासह माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, माजी महापौर मालोजी अष्टेकर, राजू ओऊळकर व निवृत्त अतिरिक्त सहकार आयुक्त दिनेश ओऊळकर यांनी पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायला जशी गर्दी उसळते तशी पवार यांना निवेदन द्यायला गर्दी उसळली होती. त्यातूनही पवार यांनी या शिष्टमंडळाला बाजूला बोलवून वेळ दिला व कांही मिनिटे चर्चा केली.

अनेक पातळ्यांवर संघर्ष करूनही सीमाप्रश्र्नी निर्णय होत नाही म्हटल्यावर महाराष्ट्र शासनानेच २९ मार्च २००४ मध्ये हा वाद सर्वोच्च न्यायालयात नेला. त्यामध्ये केंद्र सरकार व कर्नाटक सरकारला प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली जावी यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ साळवे यांची नियुक्ती केली परंतू त्यांच्याशी नियमित चर्चा करणे व याप्रश्र्नी पाठपुरावा करण्यासाठी सरकारकडून कोणी फारसे उत्सुक नाही. ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील हे दिल्लीत जावून साळवे यांची भेट घेत असत. परंतू त्यांची प्रकृती सध्या बरी नसल्याने त्यांना एवढा प्रवास झेपत नाही. त्यामुळे समितीच्या शिष्टमंडळाने शनिवारी अगोदर प्रा.पाटील यांची भेट घेतली. त्यांनी पवार यांच्याशी संपर्क साधून शिष्टमंडळ भेटायला येत असल्याचे त्यांना सांगितले.

सर्वोच्च न्यायालयातील दाव्यात तत्कालीन मुख्य न्यायाधिश लोढा यांनी २०१४ मध्ये कोट कमिशन म्हणून जम्मू-कश्मिरचे माजी मुख्य न्यायाधिश मनोहन सरीन यांची नियुक्ती केली व साक्षी पुरावे मांडण्याचे आदेश दिले. परंतू ते निवृत्त झाल्यावर हा वाद पुढे सरकला नाही. तोपर्यंत कर्नाटक सरकारने न्यायालयात एक अर्ज (क्रमांक १२(ए)) देऊन हा दावा ‘मेरिट’वर चालवू नये व तो डिसमिस करावा अशी विनंती न्यायालयास केली. त्याची सुनावणी १० डिसेंबर २०१७ ला होती. परंतू त्यादिवशी मुख्य न्यायाधिशांसह न्यायाधिश चंद्रचूड व खानविलकर यांच्या खंडपीठासमोर हे काम आले. हा महाराष्ट्र-कर्नाटक या दोन राज्यांतील वाद असल्याने मराठी न्यायाधिशांसमोर तो चालविला जावू नये असे स्वत:च या दोन न्यायाधिशांनी सांगून संकेत म्हणून ही सुनावणी घेतली नाही. त्यानंतर साळवे यांनी १६ जानेवारीस न्यायालयास सुनावणीसंबंधी विनंती करतो असे सांगितले होते परंतू त्यादिवशी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांची पत्रकार परिषद झाल्याने हा विषय तिथेच थांबला. आता साळवे यांच्याशी पुन्हा चर्चा करून रोस्टरप्रमाणे त्याची लवकर सुनावणी व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. साळवे यांच्यासोबत अ‍ॅड. दातार व अ‍ॅड. शिवाजी जाधव हे देखील महाराष्ट्र सरकारच्यावतीने काम पाहतात.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारkolhapurकोल्हापूर