शहरं
Join us  
Trending Stories
1
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
2
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
3
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
4
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
5
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
6
अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक
7
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?
8
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
9
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
10
WI vs PNG : हलक्यात घेऊन चालणार नाही! नवख्या संघानं वेस्ट इंडिजला घाम फोडला, कसाबसा सामना जिंकला
11
पंचग्रही योग: ‘या’ ५ मूलांकांना सुख-समृद्धी काळ, धनलाभाची संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ होईल!
12
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
13
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण
14
जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी
15
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
16
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 
17
नव्या उच्चांकासाठी बाजार सज्ज, एक्झिट पोलमधून देशात स्थिर सरकारचे येण्याचे संकेत
18
अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
19
प्रवासकोंडीचे ग्रहण सुटले, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉकला पूर्णविराम
20
एआय एक्झिट पोलमध्येही 'कमळ'; पण इंडियाच्याही जागा वाढणार

विशाळगडसारख्या ऐेतिहासिक स्थळाच्या पर्यटनाला गालबोट-अवैध धंदे, हाणामारी-पोलिसांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:53 PM

आंबा : चरस, गांजापासून ते जुगार, सावकारी यातून होणारे वाद नि आता विशिष्ट मंडळींच्या दादागिरीमुळे विशाळगडसारख्या ऐेतिहासिक स्थळाच्या पर्यटनाला गालबोट लागत आहे

आंबा : चरस, गांजापासून ते जुगार, सावकारी यातून होणारे वाद नि आता विशिष्ट मंडळींच्या दादागिरीमुळे विशाळगडसारख्या ऐेतिहासिक स्थळाच्या पर्यटनाला गालबोट लागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासनाचे अभय येथील व्यवस्थेला मिळत असल्याने येथील व्यावसाईक अडचणीत सापडले आहेत.

छोट्याशा कारणावरून पर्यटकांना बेदम मारहाण करून त्यांना वेठीस धरून खोट्या तक्रारीची धमकी देणारी मानसिकता येथे रूजत आहे. विशाळगडावर पोलीस औट ठाणे मंजूर आहे, पण येथे पोलीस नसतात. उरूस, महाशिवरात्रीला तेवढी हजेरी असते. दोन वर्षांपूर्वी दारूबंदीच्या मोहिमेतून येथे येणाऱ्या पर्यटकांची झडती घेतली जात होती; त्यातून वाद होऊन आठवड्याला मारामाºया होत होत्या. त्यातून काहींची लूबाडणूक होत होती, म्हणून येथील दारूबंदी उठविली गेली. मात्र, काही मंडळी पर्यटकांना कोणत्याही कारणाने अडवून त्यांची पिळवणूक करत आहेत.

महाशिवरात्रीच्या आदल्या रात्री मिरज येथील तरुणांना मारहाण झाली. त्यानंतर शासकीय कर्मचाºयांवर जमावाचा हल्ला झाला. सोमवारी दुपारी पायथ्याला उगार येथील पर्यटकाला माजी उपसरपंच असलेल्या एका जबाबदार व्यक्तीने गाडीला झेंडा लावला म्हणून मारहाण केली. ज्याच्या मांडवात पार्किंग केले, त्या स्थानिक व्यावसायिकालाही मारहाण करून दहशत माजवली. मात्र, स्थानिक तरुणाला झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यास गेलेल्या ग्रामस्थांना पोलिसांनी मध्यस्थी करून थांबविले व माफीनाम्यानंतर येथील वादावर पडदा पडला. पोलिसी वर्दीच्या शंकास्पद धोरणामुळे येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जटील बनत चालला असून, त्याचा विपरीत परिणाम पर्यटन व्यवसायावर होत असल्याचा सूर व्यावसायिकांतून व्यक्त होत आहे.आईस्क्रीम कट्ट्याची दहशत..गडावरील आईस्क्रीम कट्ट्यावरील तरुणांचे टोळके दारूबंदीचे निमित्त करून पर्यटकांना वेठीस धरते. मुक्कामास राहणारे भाविक, पर्यटक टाईमपास म्हणून पत्ते खेळतात. मात्र, विशिष्ट मंडळीमार्फत पोलिसांना येथे पाचारण करून पत्ते खेळणाºयांवर कारवाई केली जाते; पण लेखी पोलीस कारवाई होताना दिसत नाही. मुळातच येथे अवैध धंद्याकडे डाळेझाक करणे नि त्या व्यवसायात सापडणाºया मंडळींवर कारवाईची बतावणी करून अर्थकारण साधणे, हे नेहमीचेच झाल्याने पर्यटकांची व भाविकांची संख्या घटू लागल्याचे दुखणे व्यावसायिकांनी मांडले. गैरमार्गाने मिळविलेल्या पैशावर विशिष्ट मंडळीचे हात ओले करून भांडवलदार अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत असल्याची तक्रार विशाळगडवासीयांतून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेforest departmentवनविभागcrimeगुन्हे