शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

विशाळगडसारख्या ऐेतिहासिक स्थळाच्या पर्यटनाला गालबोट-अवैध धंदे, हाणामारी-पोलिसांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:54 IST

आंबा : चरस, गांजापासून ते जुगार, सावकारी यातून होणारे वाद नि आता विशिष्ट मंडळींच्या दादागिरीमुळे विशाळगडसारख्या ऐेतिहासिक स्थळाच्या पर्यटनाला गालबोट लागत आहे

आंबा : चरस, गांजापासून ते जुगार, सावकारी यातून होणारे वाद नि आता विशिष्ट मंडळींच्या दादागिरीमुळे विशाळगडसारख्या ऐेतिहासिक स्थळाच्या पर्यटनाला गालबोट लागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासनाचे अभय येथील व्यवस्थेला मिळत असल्याने येथील व्यावसाईक अडचणीत सापडले आहेत.

छोट्याशा कारणावरून पर्यटकांना बेदम मारहाण करून त्यांना वेठीस धरून खोट्या तक्रारीची धमकी देणारी मानसिकता येथे रूजत आहे. विशाळगडावर पोलीस औट ठाणे मंजूर आहे, पण येथे पोलीस नसतात. उरूस, महाशिवरात्रीला तेवढी हजेरी असते. दोन वर्षांपूर्वी दारूबंदीच्या मोहिमेतून येथे येणाऱ्या पर्यटकांची झडती घेतली जात होती; त्यातून वाद होऊन आठवड्याला मारामाºया होत होत्या. त्यातून काहींची लूबाडणूक होत होती, म्हणून येथील दारूबंदी उठविली गेली. मात्र, काही मंडळी पर्यटकांना कोणत्याही कारणाने अडवून त्यांची पिळवणूक करत आहेत.

महाशिवरात्रीच्या आदल्या रात्री मिरज येथील तरुणांना मारहाण झाली. त्यानंतर शासकीय कर्मचाºयांवर जमावाचा हल्ला झाला. सोमवारी दुपारी पायथ्याला उगार येथील पर्यटकाला माजी उपसरपंच असलेल्या एका जबाबदार व्यक्तीने गाडीला झेंडा लावला म्हणून मारहाण केली. ज्याच्या मांडवात पार्किंग केले, त्या स्थानिक व्यावसायिकालाही मारहाण करून दहशत माजवली. मात्र, स्थानिक तरुणाला झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यास गेलेल्या ग्रामस्थांना पोलिसांनी मध्यस्थी करून थांबविले व माफीनाम्यानंतर येथील वादावर पडदा पडला. पोलिसी वर्दीच्या शंकास्पद धोरणामुळे येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जटील बनत चालला असून, त्याचा विपरीत परिणाम पर्यटन व्यवसायावर होत असल्याचा सूर व्यावसायिकांतून व्यक्त होत आहे.आईस्क्रीम कट्ट्याची दहशत..गडावरील आईस्क्रीम कट्ट्यावरील तरुणांचे टोळके दारूबंदीचे निमित्त करून पर्यटकांना वेठीस धरते. मुक्कामास राहणारे भाविक, पर्यटक टाईमपास म्हणून पत्ते खेळतात. मात्र, विशिष्ट मंडळीमार्फत पोलिसांना येथे पाचारण करून पत्ते खेळणाºयांवर कारवाई केली जाते; पण लेखी पोलीस कारवाई होताना दिसत नाही. मुळातच येथे अवैध धंद्याकडे डाळेझाक करणे नि त्या व्यवसायात सापडणाºया मंडळींवर कारवाईची बतावणी करून अर्थकारण साधणे, हे नेहमीचेच झाल्याने पर्यटकांची व भाविकांची संख्या घटू लागल्याचे दुखणे व्यावसायिकांनी मांडले. गैरमार्गाने मिळविलेल्या पैशावर विशिष्ट मंडळीचे हात ओले करून भांडवलदार अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत असल्याची तक्रार विशाळगडवासीयांतून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेforest departmentवनविभागcrimeगुन्हे