शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कोल्हापूर शहरातील ९० रेशन दुकानांत बोगस युनिटद्वारे काळाबाजार; एजंट, दुकानदार, अधिकाऱ्यांचाही सहभाग

By सचिन यादव | Updated: July 8, 2024 16:15 IST

अन्नधान्य वितरण कार्यालयाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत

सचिन यादवकोल्हापूर : शिधापत्रिकेवर एकाच कुटुंबातील नावांऐवजी अन्य कुटुंबातील नावे घुसडून युनिट संख्या वाढवून त्यांच्या नावावर धान्य उचलून काळाबाजार सुरू आहे. ‘ई’ वॉर्डातील प्रतिभानगर परिसरातील एका अन्नधान्य वितरण दुकानात हा प्रकार सुरू आहे. या दुकानात सुमारे २२ रेशनकार्ड अशा प्रकारची असून शहरात सुमारे ९० हून अधिक दुकानांत ५०० हून अधिक रेशनकार्डावर बोगस युनिट दाखवून धान्याचा काळाबाजार केला जात आहे. या भ्रष्टाचाराला अन्नधान्य वितरण विभागातील अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे समजते. त्यासह या यंत्रणेत महिन्याला दुकानदाराकडून हप्ता घेणारे मोठे मासे मोकाट आहेत. त्यामुळे शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आहे.कार्यालयाचा कारभार ऑनलाइन झाला असला तरी कामे अद्याप प्रलंबित आहेत. महा-ई-सेवा केंद्रातून आलेल्या ऑनलाइन अर्जानुसार कार्यालयात कामे केली जातात. त्रुटीही ऑनलाइन दाखविल्या जातात. मात्र, गेल्या सहा महिन्यांतून ऑनलाइन अर्जावरही निर्णय झालेला नाही. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्र चालकही वैतागले आहेत. अर्ज केलेल्या नागरिकांना थेट वितरण कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यातून कर्मचारी आणि नागरिकांच्यात वादावादीचे प्रकार घडत आहेत.रेशनकार्डतील युनिट वाढ करणे, कमी करणे, त्यासह शुभ्र, केशरी, अंत्योदय कार्डातील फेरफारसाठी पहिला टप्पा म्हणून लिपिकाचे लॉगिन, त्यानंतर पुरवठा निरीक्षकांचे लॉगिन आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यात अन्नधान्य वितरण अधिकारी यांचे लाॅगिन केल्यानंतर ओटीपी आल्यानंतर रेशनकार्ड मंजूर केले जाते. शहरात १६६ अन्नधान्य वितरण करणारी दुकाने आहेत. त्यापैकी ६० दुकाने खासगी आणि काही सहकारी तत्त्वावरील १०६ आहेत. दरम्यान, याप्रकरणी शहर अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

‘त्या’ रोजंदारी ऑपरेटरचा पुन्हा वावरजुलै २०२३ मध्ये अन्यधान्य वितरण अधिकाऱ्याचे लॉगिन आयडी वापरून रेशनकार्डाच्या नावात फेरफार करणारा एक रोजंदारी ऑपरेटर होता. राजारामपुरीतील एका महिलेच्या कार्डात केलेल्या फेरफार प्रकरणात तो सापडला. त्यांच्या विरोधात तक्रारीनंतर भ्रष्टाचारात त्याचा मोठा हातखंडा असल्याचे उघड झाल्याने त्याला कामावरून काढून टाकले होते; मात्र त्याचा कार्यालयात पुन्हा वावर वाढला आहे.

कायमस्वरूपी अधिकारी हवाअन्नधान्य वितरण कार्यालयात दररोज २५० नागरिक कामानिमित्त ये-जा करतात. कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने रेशनकार्डाची अनेक कामे प्रलंबित आहेत. ओटीपी लवकर देत नसल्याने कामे खोळंबल्याच्या तक्रारी काही नागरिकांची आहेत. तर एक महिला लिपिक नागिरकांच्या अंगावरच धाऊन जाते. या कार्यालयात कर्मचाऱ्यांवरही कोणाचा वचक नाही. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी अधिकारी नेमावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कामे प्रलंबित ठेवून काहींची करमणूक होत असली, तरी सर्वसामान्यांचे मात्र हेलपाटे वाढले आहेत.

  • एका रेशन दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, एक विशिष्ट यंत्रणा प्रत्येक दुकानदाराकडून महिन्याला १३०० रुपये गोळा करते. त्याचा वाटा ते पुढील यंत्रणेला देतात.
  • त्यातील ८०० रुपयांचा वाटा संबंधिताला दिला जातो. तर बाकीची उर्वरित रक्कमही यंत्रणेला पोहोच होते. तीन महिन्यांतून एकदा २० दुकानांची तपासणी केली जाते.
  • अनेकदा ही तपासणी कार्यालयातच बसून केली जात असल्याचे समजते. गोदामामध्ये शिल्लक धान्य, युनिट संख्येची पडताळणीकडे कानाडोळा केला जात आहे.
  • यामध्ये जोड आडनाव असलेली व्यक्ती, तसेच नावात साहेब असलेली व्यक्ती आणि त्याचे सहकारी आघाडीवर असल्याचे समजते.

इतके मिळते धान्यशुभ्र कार्डावर काहीच धान्य मिळत नाही. केसरी कार्डावर ३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू प्रतिमाणसी मिळतो. पिवळे कार्डावर (अंत्योदय) एकूण ३५ किलो धान्य दिले जाते. त्यामध्ये २० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू दिला जातो. तर १ किलो साखर दिली जाते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर