शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

कोल्हापूर शहरातील ९० रेशन दुकानांत बोगस युनिटद्वारे काळाबाजार; एजंट, दुकानदार, अधिकाऱ्यांचाही सहभाग

By सचिन यादव | Updated: July 8, 2024 16:15 IST

अन्नधान्य वितरण कार्यालयाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत

सचिन यादवकोल्हापूर : शिधापत्रिकेवर एकाच कुटुंबातील नावांऐवजी अन्य कुटुंबातील नावे घुसडून युनिट संख्या वाढवून त्यांच्या नावावर धान्य उचलून काळाबाजार सुरू आहे. ‘ई’ वॉर्डातील प्रतिभानगर परिसरातील एका अन्नधान्य वितरण दुकानात हा प्रकार सुरू आहे. या दुकानात सुमारे २२ रेशनकार्ड अशा प्रकारची असून शहरात सुमारे ९० हून अधिक दुकानांत ५०० हून अधिक रेशनकार्डावर बोगस युनिट दाखवून धान्याचा काळाबाजार केला जात आहे. या भ्रष्टाचाराला अन्नधान्य वितरण विभागातील अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे समजते. त्यासह या यंत्रणेत महिन्याला दुकानदाराकडून हप्ता घेणारे मोठे मासे मोकाट आहेत. त्यामुळे शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आहे.कार्यालयाचा कारभार ऑनलाइन झाला असला तरी कामे अद्याप प्रलंबित आहेत. महा-ई-सेवा केंद्रातून आलेल्या ऑनलाइन अर्जानुसार कार्यालयात कामे केली जातात. त्रुटीही ऑनलाइन दाखविल्या जातात. मात्र, गेल्या सहा महिन्यांतून ऑनलाइन अर्जावरही निर्णय झालेला नाही. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्र चालकही वैतागले आहेत. अर्ज केलेल्या नागरिकांना थेट वितरण कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यातून कर्मचारी आणि नागरिकांच्यात वादावादीचे प्रकार घडत आहेत.रेशनकार्डतील युनिट वाढ करणे, कमी करणे, त्यासह शुभ्र, केशरी, अंत्योदय कार्डातील फेरफारसाठी पहिला टप्पा म्हणून लिपिकाचे लॉगिन, त्यानंतर पुरवठा निरीक्षकांचे लॉगिन आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यात अन्नधान्य वितरण अधिकारी यांचे लाॅगिन केल्यानंतर ओटीपी आल्यानंतर रेशनकार्ड मंजूर केले जाते. शहरात १६६ अन्नधान्य वितरण करणारी दुकाने आहेत. त्यापैकी ६० दुकाने खासगी आणि काही सहकारी तत्त्वावरील १०६ आहेत. दरम्यान, याप्रकरणी शहर अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

‘त्या’ रोजंदारी ऑपरेटरचा पुन्हा वावरजुलै २०२३ मध्ये अन्यधान्य वितरण अधिकाऱ्याचे लॉगिन आयडी वापरून रेशनकार्डाच्या नावात फेरफार करणारा एक रोजंदारी ऑपरेटर होता. राजारामपुरीतील एका महिलेच्या कार्डात केलेल्या फेरफार प्रकरणात तो सापडला. त्यांच्या विरोधात तक्रारीनंतर भ्रष्टाचारात त्याचा मोठा हातखंडा असल्याचे उघड झाल्याने त्याला कामावरून काढून टाकले होते; मात्र त्याचा कार्यालयात पुन्हा वावर वाढला आहे.

कायमस्वरूपी अधिकारी हवाअन्नधान्य वितरण कार्यालयात दररोज २५० नागरिक कामानिमित्त ये-जा करतात. कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने रेशनकार्डाची अनेक कामे प्रलंबित आहेत. ओटीपी लवकर देत नसल्याने कामे खोळंबल्याच्या तक्रारी काही नागरिकांची आहेत. तर एक महिला लिपिक नागिरकांच्या अंगावरच धाऊन जाते. या कार्यालयात कर्मचाऱ्यांवरही कोणाचा वचक नाही. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी अधिकारी नेमावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कामे प्रलंबित ठेवून काहींची करमणूक होत असली, तरी सर्वसामान्यांचे मात्र हेलपाटे वाढले आहेत.

  • एका रेशन दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, एक विशिष्ट यंत्रणा प्रत्येक दुकानदाराकडून महिन्याला १३०० रुपये गोळा करते. त्याचा वाटा ते पुढील यंत्रणेला देतात.
  • त्यातील ८०० रुपयांचा वाटा संबंधिताला दिला जातो. तर बाकीची उर्वरित रक्कमही यंत्रणेला पोहोच होते. तीन महिन्यांतून एकदा २० दुकानांची तपासणी केली जाते.
  • अनेकदा ही तपासणी कार्यालयातच बसून केली जात असल्याचे समजते. गोदामामध्ये शिल्लक धान्य, युनिट संख्येची पडताळणीकडे कानाडोळा केला जात आहे.
  • यामध्ये जोड आडनाव असलेली व्यक्ती, तसेच नावात साहेब असलेली व्यक्ती आणि त्याचे सहकारी आघाडीवर असल्याचे समजते.

इतके मिळते धान्यशुभ्र कार्डावर काहीच धान्य मिळत नाही. केसरी कार्डावर ३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू प्रतिमाणसी मिळतो. पिवळे कार्डावर (अंत्योदय) एकूण ३५ किलो धान्य दिले जाते. त्यामध्ये २० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू दिला जातो. तर १ किलो साखर दिली जाते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर