शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सेनेच्या विरोधात भाजपची रणनीती

By admin | Updated: October 24, 2015 01:09 IST

प्रतिष्ठा पणाला : चंद्रकांतदादा शहरात तळ ठोकणार

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत कमळ फुलविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात तळ ठोकण्याचे नियोजन केले आहे. सत्ता तर काबीज करायचीच; परंतु शिवसेनेपेक्षा किमान एक तरी जागा जास्त मिळाली पाहिजे, असा भाजपचा प्रयत्न आहे. त्याच्याशी या पक्षाची प्रतिष्ठा जोडली गेली आहे.‘विधानसभेला स्वबळावर लढलो म्हणूनच खरी ताकद कळाली,’ असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातच भाजपच्या राज्य अधिवेशनात केले होते. त्यावरून बराच गदारोळ उठला होता. दोन पक्षांतील राजकीय संबंधही ताणले होते. भाजपच्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग त्याचदिवशी फुंकले. त्यानंतर भाजपने पद्धतशीरपणे शिवसेनेला बाजूला करून आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीशी संगत केली. महाडिक यांची संघटनात्मक व आर्थिक ताकद आणि राजकीय मुत्सद्देगिरीचा लाभ उठवून महापालिकेत सत्तेवर येण्याचे हे गणित आहे.मावळत्या सभागृहात शिवसेनेचे चार, तर भाजपचे तीन नगरसेवक आहेत. शिवसेनेला ३९ हजार २४, तर भाजपला १३ हजार १०५ मते मिळाली होती. एकूण मतांमध्ये शिवसेना चौथ्या स्थानावर तर तब्बल भाजप सहाव्या स्थानावर राहिली; परंतु वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मतांचा सगळा बॅकलॉग भरून काढून जोरदार मुसंडी मारली. त्या पक्षाचा ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये आमदार असून ‘कोल्हापूर उत्तर’मध्येही महेश जाधव यांना ४० हजार मते मिळाली आहेत. त्यावेळी देशात आणि राज्यातही नरेंद्र मोदी यांचे वारे होते. आता ते वारे थोडे विसावले आहे. त्यामुळे भाजपचीच या निवडणुकीत खरी कसोटी आहे. दोन्ही काँग्रेसची देशातील व राज्यातीलही सत्ता गेल्यामुळे या निवडणुकीत त्यांना काही मिळवायचे नाही. भाजपला सत्तेपासून रोखणे हेच त्यांचे मुख्य टार्गेट आहे. शिवसेनेपासून बाजूला होऊन राज्यात ‘एक नंबर’चा पक्ष बनू शकलो. त्याच धर्तीवर कोल्हापुरातही शिवसेनेला मागे टाकून सत्ता काबीज करण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू आहे. कोणत्याही स्थितीत शिवसेनेपेक्षा एकतरी जागा जास्त जिंकून दाखवाच, असे आदेश पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांनी दिले आहेत. शिवसेनेला हिणविण्यासाठी भाजपला ते करून दाखवायचे आहे.भाजपचे महापालिकेतील यश हे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे मंत्री पाटील हे बुधवारपासून मतदान होईपर्यंत कोल्हापुरात तळ ठोकणार आहेत. मंत्रिमंडळाची बैठक संपवून ते कोल्हापुरात येणार आहेत. त्यानंतर निकाल झाल्यावरच ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला जातील. जाताना ते महापालिकेतील सत्तेचा गुलाल अंगावर घेऊन जातात की नाही हीच लोकांच्यात उत्सुकता आहे.