शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

सेनेच्या विरोधात भाजपची रणनीती

By admin | Updated: October 24, 2015 01:09 IST

प्रतिष्ठा पणाला : चंद्रकांतदादा शहरात तळ ठोकणार

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत कमळ फुलविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात तळ ठोकण्याचे नियोजन केले आहे. सत्ता तर काबीज करायचीच; परंतु शिवसेनेपेक्षा किमान एक तरी जागा जास्त मिळाली पाहिजे, असा भाजपचा प्रयत्न आहे. त्याच्याशी या पक्षाची प्रतिष्ठा जोडली गेली आहे.‘विधानसभेला स्वबळावर लढलो म्हणूनच खरी ताकद कळाली,’ असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातच भाजपच्या राज्य अधिवेशनात केले होते. त्यावरून बराच गदारोळ उठला होता. दोन पक्षांतील राजकीय संबंधही ताणले होते. भाजपच्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग त्याचदिवशी फुंकले. त्यानंतर भाजपने पद्धतशीरपणे शिवसेनेला बाजूला करून आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीशी संगत केली. महाडिक यांची संघटनात्मक व आर्थिक ताकद आणि राजकीय मुत्सद्देगिरीचा लाभ उठवून महापालिकेत सत्तेवर येण्याचे हे गणित आहे.मावळत्या सभागृहात शिवसेनेचे चार, तर भाजपचे तीन नगरसेवक आहेत. शिवसेनेला ३९ हजार २४, तर भाजपला १३ हजार १०५ मते मिळाली होती. एकूण मतांमध्ये शिवसेना चौथ्या स्थानावर तर तब्बल भाजप सहाव्या स्थानावर राहिली; परंतु वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मतांचा सगळा बॅकलॉग भरून काढून जोरदार मुसंडी मारली. त्या पक्षाचा ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये आमदार असून ‘कोल्हापूर उत्तर’मध्येही महेश जाधव यांना ४० हजार मते मिळाली आहेत. त्यावेळी देशात आणि राज्यातही नरेंद्र मोदी यांचे वारे होते. आता ते वारे थोडे विसावले आहे. त्यामुळे भाजपचीच या निवडणुकीत खरी कसोटी आहे. दोन्ही काँग्रेसची देशातील व राज्यातीलही सत्ता गेल्यामुळे या निवडणुकीत त्यांना काही मिळवायचे नाही. भाजपला सत्तेपासून रोखणे हेच त्यांचे मुख्य टार्गेट आहे. शिवसेनेपासून बाजूला होऊन राज्यात ‘एक नंबर’चा पक्ष बनू शकलो. त्याच धर्तीवर कोल्हापुरातही शिवसेनेला मागे टाकून सत्ता काबीज करण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू आहे. कोणत्याही स्थितीत शिवसेनेपेक्षा एकतरी जागा जास्त जिंकून दाखवाच, असे आदेश पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांनी दिले आहेत. शिवसेनेला हिणविण्यासाठी भाजपला ते करून दाखवायचे आहे.भाजपचे महापालिकेतील यश हे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे मंत्री पाटील हे बुधवारपासून मतदान होईपर्यंत कोल्हापुरात तळ ठोकणार आहेत. मंत्रिमंडळाची बैठक संपवून ते कोल्हापुरात येणार आहेत. त्यानंतर निकाल झाल्यावरच ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला जातील. जाताना ते महापालिकेतील सत्तेचा गुलाल अंगावर घेऊन जातात की नाही हीच लोकांच्यात उत्सुकता आहे.