शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

सेनेच्या विरोधात भाजपची रणनीती

By admin | Updated: October 24, 2015 01:09 IST

प्रतिष्ठा पणाला : चंद्रकांतदादा शहरात तळ ठोकणार

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत कमळ फुलविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात तळ ठोकण्याचे नियोजन केले आहे. सत्ता तर काबीज करायचीच; परंतु शिवसेनेपेक्षा किमान एक तरी जागा जास्त मिळाली पाहिजे, असा भाजपचा प्रयत्न आहे. त्याच्याशी या पक्षाची प्रतिष्ठा जोडली गेली आहे.‘विधानसभेला स्वबळावर लढलो म्हणूनच खरी ताकद कळाली,’ असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातच भाजपच्या राज्य अधिवेशनात केले होते. त्यावरून बराच गदारोळ उठला होता. दोन पक्षांतील राजकीय संबंधही ताणले होते. भाजपच्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग त्याचदिवशी फुंकले. त्यानंतर भाजपने पद्धतशीरपणे शिवसेनेला बाजूला करून आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीशी संगत केली. महाडिक यांची संघटनात्मक व आर्थिक ताकद आणि राजकीय मुत्सद्देगिरीचा लाभ उठवून महापालिकेत सत्तेवर येण्याचे हे गणित आहे.मावळत्या सभागृहात शिवसेनेचे चार, तर भाजपचे तीन नगरसेवक आहेत. शिवसेनेला ३९ हजार २४, तर भाजपला १३ हजार १०५ मते मिळाली होती. एकूण मतांमध्ये शिवसेना चौथ्या स्थानावर तर तब्बल भाजप सहाव्या स्थानावर राहिली; परंतु वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मतांचा सगळा बॅकलॉग भरून काढून जोरदार मुसंडी मारली. त्या पक्षाचा ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये आमदार असून ‘कोल्हापूर उत्तर’मध्येही महेश जाधव यांना ४० हजार मते मिळाली आहेत. त्यावेळी देशात आणि राज्यातही नरेंद्र मोदी यांचे वारे होते. आता ते वारे थोडे विसावले आहे. त्यामुळे भाजपचीच या निवडणुकीत खरी कसोटी आहे. दोन्ही काँग्रेसची देशातील व राज्यातीलही सत्ता गेल्यामुळे या निवडणुकीत त्यांना काही मिळवायचे नाही. भाजपला सत्तेपासून रोखणे हेच त्यांचे मुख्य टार्गेट आहे. शिवसेनेपासून बाजूला होऊन राज्यात ‘एक नंबर’चा पक्ष बनू शकलो. त्याच धर्तीवर कोल्हापुरातही शिवसेनेला मागे टाकून सत्ता काबीज करण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू आहे. कोणत्याही स्थितीत शिवसेनेपेक्षा एकतरी जागा जास्त जिंकून दाखवाच, असे आदेश पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांनी दिले आहेत. शिवसेनेला हिणविण्यासाठी भाजपला ते करून दाखवायचे आहे.भाजपचे महापालिकेतील यश हे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे मंत्री पाटील हे बुधवारपासून मतदान होईपर्यंत कोल्हापुरात तळ ठोकणार आहेत. मंत्रिमंडळाची बैठक संपवून ते कोल्हापुरात येणार आहेत. त्यानंतर निकाल झाल्यावरच ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला जातील. जाताना ते महापालिकेतील सत्तेचा गुलाल अंगावर घेऊन जातात की नाही हीच लोकांच्यात उत्सुकता आहे.