शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

शिरोळमध्ये भाजपला ‘अच्छे दिन’

By admin | Updated: September 1, 2016 00:45 IST

पालिका निवडणुकीत पडसाद उमटणार : पाच नेत्यांच्या प्रवेशाने बहुजन विकास आघाडीत फूट

गणपती कोळी-- कुरुंदवाड --शिरोळ तालुक्यातील पाच दिग्गज मंडळी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यात भाजपसाठी मात्र ‘अच्छे दिन’ आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली असून, वर्षअखेरीस होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत याचे पडसाद दिसणार आहेत. तर दुसरीकडे दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत तालुक्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या बहुजन विकास आघाडीत फूट पडली आहे. तालुक्यात जवळपास सर्वच पक्ष असलेतरी काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी संघटना यांचे प्रामुख्याने वर्चस्व आहे. त्याखालोखाल शिवसेना, भाजप असा क्रम लागतो. स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादकांचा प्रश्न घेऊन वेळोवेळी यशस्वी आंदोलन केल्यामुळे त्यांच्या पाठीशी शेतकरी विशेषत: तरुण वर्ग राहिल्याने राजकारणातही त्यांना यश आले आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा तालुका गत पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत स्वाभिमानीच्या बाजूने राहिला आहे. राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेसचे साखर कारखाने, सहकारी संस्थांचे जाळे असल्याने या दोन्ही पक्षांची ठराविक फळी मजबूत आहे. तर शिवसेनेचा तरुण वर्ग असल्याने गेल्या अनेक वर्षात या पक्षाला नेतृत्व मिळाले नसले तरी कोणत्याही निवडणुकीत २० ते २२ हजार मते शिवसेनेची आहेत. त्यामानाने भाजप तालुक्यात नगण्यच आहे. गत विधानसभा निवडणुकीत गुरुदत्त शुगर्सचे माधवराव घाटगे, विठ्ठलराव निंबाळकर-सरकार, ज्येष्ठ नगरसेवक रामचंद्र डांगे, सामाजिक कार्यकर्ते विजय भोजे, ‘गोकुळ’चे माजी संचालक दिलीप पाटील आदींनी तालुक्यात बहुजन विकास आघाडी स्थापन करून शिवसेनेची उमेदवारी मिळालेले उल्हास पाटील यांना निवडून आणले. त्यामुळे तालुक्यात आम्ही ठरवू तेच राजकारण होईल असा आभास या आघाडी नेतृत्वांना होता. मात्र तालुक्यातील जिल्हा बँक निवडणूक, विधानपरिषद निवडणूक, कुरुंदवाड नगरपरिषद पदाधिकारी बदलाच्या वेळी काहींनी टोकाची भूमिका घेतल्याने ही आघाडी एकसंघ नाही, हे निश्चितच होते. केंद्रात व राज्यात भाजप सरकार असल्याने आगामी नगरपरिषद, पंचायत समिती, जि. प. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक तालुक्यातील वजनदार नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न भाजपमधून होत आहे. त्यामध्ये प्रथम शिरोळ तालुक्यात त्यात यश आले असून, कुरुंदवाड शहरातील राजकीय वजनदार नेते विद्यमान नगरसेवक व जिल्हा धनगर समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र डांगे, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष अभिजित जगदाळे, विविध यशस्वी आंदोलन करणारे व स्टार प्रचारक म्हणून ओळखले जाणारे विजय भोजे, ज्येष्ठ विधीज्ज्ञ बाळासाहेब पाटील, जयवंतराव जगदाळे यांना भाजपमध्ये घेऊन भाजपने शिरोळ तालुक्यात राजकीय खळबळ उडवली आहे. एका दगडात तीन पक्षी : वर्चस्व वाढविणारतालुक्यात नेत्यांसाठी भाजपला अच्छे दिन आले असून नेत्यांची पहिली परीक्षा नगरपालिका निवडणुकीने होणार आहे. बहुजन विकास आघाडीत फूट पाडणे, राष्ट्रवादी व काँग्रेसला धक्का देणे व तालुक्यातील आपले राजकीय वर्चस्व वाढविणे अशी एका दगडात तीन पक्षी मारण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला आहे. या राजकीय खेळीत कितपत यशस्वी होतात, हे आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.