शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी

शिरोळमध्ये भाजपला ‘अच्छे दिन’

By admin | Updated: September 1, 2016 00:45 IST

पालिका निवडणुकीत पडसाद उमटणार : पाच नेत्यांच्या प्रवेशाने बहुजन विकास आघाडीत फूट

गणपती कोळी-- कुरुंदवाड --शिरोळ तालुक्यातील पाच दिग्गज मंडळी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यात भाजपसाठी मात्र ‘अच्छे दिन’ आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली असून, वर्षअखेरीस होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत याचे पडसाद दिसणार आहेत. तर दुसरीकडे दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत तालुक्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या बहुजन विकास आघाडीत फूट पडली आहे. तालुक्यात जवळपास सर्वच पक्ष असलेतरी काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी संघटना यांचे प्रामुख्याने वर्चस्व आहे. त्याखालोखाल शिवसेना, भाजप असा क्रम लागतो. स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादकांचा प्रश्न घेऊन वेळोवेळी यशस्वी आंदोलन केल्यामुळे त्यांच्या पाठीशी शेतकरी विशेषत: तरुण वर्ग राहिल्याने राजकारणातही त्यांना यश आले आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा तालुका गत पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत स्वाभिमानीच्या बाजूने राहिला आहे. राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेसचे साखर कारखाने, सहकारी संस्थांचे जाळे असल्याने या दोन्ही पक्षांची ठराविक फळी मजबूत आहे. तर शिवसेनेचा तरुण वर्ग असल्याने गेल्या अनेक वर्षात या पक्षाला नेतृत्व मिळाले नसले तरी कोणत्याही निवडणुकीत २० ते २२ हजार मते शिवसेनेची आहेत. त्यामानाने भाजप तालुक्यात नगण्यच आहे. गत विधानसभा निवडणुकीत गुरुदत्त शुगर्सचे माधवराव घाटगे, विठ्ठलराव निंबाळकर-सरकार, ज्येष्ठ नगरसेवक रामचंद्र डांगे, सामाजिक कार्यकर्ते विजय भोजे, ‘गोकुळ’चे माजी संचालक दिलीप पाटील आदींनी तालुक्यात बहुजन विकास आघाडी स्थापन करून शिवसेनेची उमेदवारी मिळालेले उल्हास पाटील यांना निवडून आणले. त्यामुळे तालुक्यात आम्ही ठरवू तेच राजकारण होईल असा आभास या आघाडी नेतृत्वांना होता. मात्र तालुक्यातील जिल्हा बँक निवडणूक, विधानपरिषद निवडणूक, कुरुंदवाड नगरपरिषद पदाधिकारी बदलाच्या वेळी काहींनी टोकाची भूमिका घेतल्याने ही आघाडी एकसंघ नाही, हे निश्चितच होते. केंद्रात व राज्यात भाजप सरकार असल्याने आगामी नगरपरिषद, पंचायत समिती, जि. प. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक तालुक्यातील वजनदार नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न भाजपमधून होत आहे. त्यामध्ये प्रथम शिरोळ तालुक्यात त्यात यश आले असून, कुरुंदवाड शहरातील राजकीय वजनदार नेते विद्यमान नगरसेवक व जिल्हा धनगर समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र डांगे, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष अभिजित जगदाळे, विविध यशस्वी आंदोलन करणारे व स्टार प्रचारक म्हणून ओळखले जाणारे विजय भोजे, ज्येष्ठ विधीज्ज्ञ बाळासाहेब पाटील, जयवंतराव जगदाळे यांना भाजपमध्ये घेऊन भाजपने शिरोळ तालुक्यात राजकीय खळबळ उडवली आहे. एका दगडात तीन पक्षी : वर्चस्व वाढविणारतालुक्यात नेत्यांसाठी भाजपला अच्छे दिन आले असून नेत्यांची पहिली परीक्षा नगरपालिका निवडणुकीने होणार आहे. बहुजन विकास आघाडीत फूट पाडणे, राष्ट्रवादी व काँग्रेसला धक्का देणे व तालुक्यातील आपले राजकीय वर्चस्व वाढविणे अशी एका दगडात तीन पक्षी मारण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला आहे. या राजकीय खेळीत कितपत यशस्वी होतात, हे आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.