शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

‘जनसुराज्य’च्या आडून ‘भाजप’ची बंडखोरी -: शिवसेनेला थोपविण्यासाठी खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:10 IST

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप स्वबळावर लढले. यामध्ये दहापैकी सहा जागा शिवसेनेला तर दोन भाजपला मिळाल्या. लोकसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेनेला देण्यावरूनच भाजपमध्ये अस्वस्थता होती.

ठळक मुद्देते ‘जनसुराज्य’कडून लढले नसले तरी ‘अपक्ष’ म्हणून रिंगणात राहू शकतात.

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : जिल्ह्यात शिवसेनेने दहापैकी आठ मतदारसंघांत पक्षाचे ‘ए बी’ फॉर्म देऊन उमेदवारी निश्चित केल्याने भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. महायुतीतील मित्रपक्ष जनसुराज्य पक्षाच्या साथीने शिवसेनेवर प्रतिडाव खेळण्याची रणनीती भाजपने आखली आहे. भाजपमधील इच्छुकांच्या हातात ‘नारळ’ देऊन ‘जनसुराज्य’च्या मार्फत रिंगणात उतरण्याची तयारी सुरू आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप स्वबळावर लढले. यामध्ये दहापैकी सहा जागा शिवसेनेला तर दोन भाजपला मिळाल्या. लोकसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेनेला देण्यावरूनच भाजपमध्ये अस्वस्थता होती. त्यामुळे शिवसेनेचे सहा विद्यमान आमदार सोडून उर्वरित चार जागांवर भाजपने दावा केला होता. युती तुटली तर आपली तयारी असावी, म्हणून दहाही मतदारसंघांत भाजपने उमेदवार तयार ठेवले आहेत. सात जागी भाजप तर तीन जागा जनसुराज्य पक्षाला देण्याचा ‘फॉर्म्युला’ही ठरला आहे. त्यातूनच ‘कागल’मधून ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दोन वर्षांपासून प्रचारच सुरू केला होता. ‘चंदगड’ ताब्यात घ्यायचाच, या इराद्याने माजी राज्यमंत्री भरमूण्णा पाटील, गोपाळराव पाटील, अशोक चराटी यांना पक्षात घेतलेच, त्याचबरोबर आमदार संध्यादेवी कुपेकर यांचा प्रवेश ठरला होता. राधानगरीतून राहुल देसाई, शिरोळमधून अनिल यादव, राजवर्धन नाईक-निंबाळकर, ‘कोल्हापूर उत्तर’मधून महेश जाधव, सत्यजित कदम यांनी तयारी केली आहे.

पण जागावाटपात कोल्हापुरातील दोनच जागा भाजपच्या पदरात पडल्याने भाजपच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दोन जागा लढून जिल्ह्यातील सत्तास्थाने ताब्यात ठेवणे अडचणीचे ठरू शकते, त्यामुळे भाजपकडील इच्छुकांच्या हातात ‘जनसुराज्य’चा ‘नारळ’ हातात देण्याच्या हालचाली पडद्यामागे सुरू आहेत तसे सिग्नल रविवारी रात्री संबंधितांना वरिष्ठ पातळीवरून आल्याचे समजते.

भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांच्या नावाची ‘हातकणंगले’ तर नगरसेवक सत्यजित कदम यांच्या नावाची ‘कोल्हापूर उत्तर’मधून ‘जनसुराज्य’तर्फे चर्चा सुरू आहे. राधानगरीतून राहुल देसाई गुरुवारी (दि. ३) अर्ज दाखल करणार आहेत. डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी लढणार नसल्याचे सांगितले, त्यानंतर आता तयारी केली आहे. तोपर्यंत राष्टÑवादीने ‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील यांची उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे डॉ. बाभूळकर यांना ‘जनसुराज्य’ हा पर्याय राहू शकतो. शिरोळमधून राजवर्धन नाईक-निंबाळकर, अनिल यादव इच्छुक आहेत. ‘कागल’मधून समरजितसिंह घाटगे हे थांबणार नाहीत. ते ‘जनसुराज्य’कडून लढले नसले तरी ‘अपक्ष’ म्हणून रिंगणात राहू शकतात.

सेनेच्या अडचणी वाढणार!युती होऊनही ‘जनसुराज्य’च्या माध्यमातून भाजपने खेळलेल्या खेळीमुळे शिवसेनेच्या अडचणी वाढणार आहेत. या बंडखोरीचा ‘राधानगरी’, ‘हातकणंगले’, ‘कोल्हापूर उत्तर’ या मतदारसंघांत मोठा फटका बसू शकतो.

‘जनसुराज्य’च्या संपर्कात असलेले इच्छुक मतदारसंघ

इच्छुक

  • हातकणंगले -अशोकराव माने
  • कोल्हापूर उत्तर- सत्यजित कदम
  • चंदगड -डॉ. नंदिनी बाभूळकर

अपक्ष’ म्हणून रिंगणात मतदारसंघ इच्छुक

  • राधानगरी राहुल देसाई
  • कागल समरजितसिंह घाटगे
  • शिरोळ राजवर्धन नाईक- निंबाळकर
टॅग्स :Vidhan Parishad Election 2018विधान परिषद निवडणूक 2018kolhapurकोल्हापूर