शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जिंकण्यासाठी काहीही.. भाजप आक्रमक वळणावर; लोकसभेतील अपयश पुसण्यासाठी कसली कंबर

By समीर देशपांडे | Updated: September 27, 2024 12:55 IST

फोडाफोडीची जाहीर परवानगी

समीर देशपांडेकोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी नव्हे इतक्या सभा महाराष्ट्रात घेतल्या. भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार यांनी ताकद लावली. तरीही लोकसभेला झालेला पराभव भाजपला किती आणि कसा जिव्हारी लागला आहे हे अमित शाह यांच्या भाषणामधून बुधवारी उमगले. त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ‘जिंकण्यासाठी काहीही’ अशी भूमिका घेत वातावरण ढवळून काढण्यास भाजपने सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर फार अवलंबून रहावे लागू नये यासाठीच भाजपने ही रणनीती आखल्याचे मानले जाते.राज्यात अधिकाधिक जागा पदरात पाडून घेत त्यातील बहुतांशी जागा निवडून आणण्यासाठी ही रणनीती आहे. याचाच एक भाग म्हणून शाह यांचे हे मेळावे होत आहे. लोकसभेला महाराष्ट्रात महायुती पिछाडीवर गेली ही वस्तुस्थिती आहे. भले कमी मतात काही जागा गेल्या असल्यातरी हा पराभवच आहे, हे मान्यच करावे लागेल. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना अशीच सहानुभूती मिळणार असेल तर काय करायचे, असा प्रश्न त्यांच्या मनात घोळत होता. अशातच महायुतीमधील अनेक नेत्यांची मुक्ताफळे ऐकल्यानंतर अनेकवेळा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. अशा स्थितीत आता महाराष्ट्रातील नेत्यांनी काही सांगून फरक पडेल असे वाटत नव्हते. त्यामुळेच ही जबाबदारी शाह यांनी घेतली.त्यांनी राज्यातील आपल्या भाषणांची सुरुवात कार्यकर्त्यांच्या नाराजीला हात घालून केली. आतापर्यंत जे धाडसी निर्णय घेतले गेले नाहीत ते नरेंद्र मोदी यांनी घेतले. ३७० कलम रद्दपासून, चांद्रयानापर्यंतची उदाहरणे दिली. नक्षलवाद संपवला, शिक्षणाचे धोरण बदलले आणि हे केवळ भाजपमुळे शक्य झाल्याचे सांगत निराशा झटकण्याचे आवाहन केले. २०२९ ला भारताची अर्थव्यवस्था जगात तिसरी असेल हे सांगायला ते विसरले नाहीत. त्यांनी जाता जाता धनुष्यबाण आणि घड्याळाचा उल्लेख केला. परंतु त्यांचा भर राहिला तो कमळ फुलवण्यावरच.

फोडाफोडीची जाहीर परवानगीएकीकडे संत, महंतांच्या भेटी घ्या, त्यांचा सत्कार करा, आशीर्वाद घ्या असे सांगणाऱ्या शाह यांनी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना फोडण्याची जाहीर परवानगी देत आपला इरादा स्पष्ट केला आहे. शासकीय योजनांच्या सर्व लाभार्थ्यांच्या घरी चहा पिऊन या आणि मतदानादिवशी सकाळी ११ पर्यंत आपल्या घरातील आणि शेजारच्या चार घरातील मतदान करून घेण्यास बजावले आहे. त्यांनी हा दिलेला सगळा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रात लहान भावांना मागे सोडून आपण एकटेच सुसाट पुढे जायचे असे धोरण दिसते.

कार्यकर्ते रिचार्ज पण..शाह यांच्या या भाषणाने कार्यकर्ते रिचार्ज झाल्याचे वातावरण त्यावेळी दिसले. परंतु मतदानाला अजून पावणे दाेन महिने आहेत. त्यामुळे मिळणाऱ्या जागा, बंडखोरी, मित्रपक्षांची भूमिका या सगळ्यात या कार्यकर्त्यांची बॅटरी किती चार्ज राहणार ते पाहणे औत्सुक्याचे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024BJPभाजपा