शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

जिंकण्यासाठी काहीही.. भाजप आक्रमक वळणावर; लोकसभेतील अपयश पुसण्यासाठी कसली कंबर

By समीर देशपांडे | Updated: September 27, 2024 12:55 IST

फोडाफोडीची जाहीर परवानगी

समीर देशपांडेकोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी नव्हे इतक्या सभा महाराष्ट्रात घेतल्या. भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार यांनी ताकद लावली. तरीही लोकसभेला झालेला पराभव भाजपला किती आणि कसा जिव्हारी लागला आहे हे अमित शाह यांच्या भाषणामधून बुधवारी उमगले. त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ‘जिंकण्यासाठी काहीही’ अशी भूमिका घेत वातावरण ढवळून काढण्यास भाजपने सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर फार अवलंबून रहावे लागू नये यासाठीच भाजपने ही रणनीती आखल्याचे मानले जाते.राज्यात अधिकाधिक जागा पदरात पाडून घेत त्यातील बहुतांशी जागा निवडून आणण्यासाठी ही रणनीती आहे. याचाच एक भाग म्हणून शाह यांचे हे मेळावे होत आहे. लोकसभेला महाराष्ट्रात महायुती पिछाडीवर गेली ही वस्तुस्थिती आहे. भले कमी मतात काही जागा गेल्या असल्यातरी हा पराभवच आहे, हे मान्यच करावे लागेल. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना अशीच सहानुभूती मिळणार असेल तर काय करायचे, असा प्रश्न त्यांच्या मनात घोळत होता. अशातच महायुतीमधील अनेक नेत्यांची मुक्ताफळे ऐकल्यानंतर अनेकवेळा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. अशा स्थितीत आता महाराष्ट्रातील नेत्यांनी काही सांगून फरक पडेल असे वाटत नव्हते. त्यामुळेच ही जबाबदारी शाह यांनी घेतली.त्यांनी राज्यातील आपल्या भाषणांची सुरुवात कार्यकर्त्यांच्या नाराजीला हात घालून केली. आतापर्यंत जे धाडसी निर्णय घेतले गेले नाहीत ते नरेंद्र मोदी यांनी घेतले. ३७० कलम रद्दपासून, चांद्रयानापर्यंतची उदाहरणे दिली. नक्षलवाद संपवला, शिक्षणाचे धोरण बदलले आणि हे केवळ भाजपमुळे शक्य झाल्याचे सांगत निराशा झटकण्याचे आवाहन केले. २०२९ ला भारताची अर्थव्यवस्था जगात तिसरी असेल हे सांगायला ते विसरले नाहीत. त्यांनी जाता जाता धनुष्यबाण आणि घड्याळाचा उल्लेख केला. परंतु त्यांचा भर राहिला तो कमळ फुलवण्यावरच.

फोडाफोडीची जाहीर परवानगीएकीकडे संत, महंतांच्या भेटी घ्या, त्यांचा सत्कार करा, आशीर्वाद घ्या असे सांगणाऱ्या शाह यांनी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना फोडण्याची जाहीर परवानगी देत आपला इरादा स्पष्ट केला आहे. शासकीय योजनांच्या सर्व लाभार्थ्यांच्या घरी चहा पिऊन या आणि मतदानादिवशी सकाळी ११ पर्यंत आपल्या घरातील आणि शेजारच्या चार घरातील मतदान करून घेण्यास बजावले आहे. त्यांनी हा दिलेला सगळा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रात लहान भावांना मागे सोडून आपण एकटेच सुसाट पुढे जायचे असे धोरण दिसते.

कार्यकर्ते रिचार्ज पण..शाह यांच्या या भाषणाने कार्यकर्ते रिचार्ज झाल्याचे वातावरण त्यावेळी दिसले. परंतु मतदानाला अजून पावणे दाेन महिने आहेत. त्यामुळे मिळणाऱ्या जागा, बंडखोरी, मित्रपक्षांची भूमिका या सगळ्यात या कार्यकर्त्यांची बॅटरी किती चार्ज राहणार ते पाहणे औत्सुक्याचे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024BJPभाजपा