शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिंकण्यासाठी काहीही.. भाजप आक्रमक वळणावर; लोकसभेतील अपयश पुसण्यासाठी कसली कंबर

By समीर देशपांडे | Updated: September 27, 2024 12:55 IST

फोडाफोडीची जाहीर परवानगी

समीर देशपांडेकोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी नव्हे इतक्या सभा महाराष्ट्रात घेतल्या. भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार यांनी ताकद लावली. तरीही लोकसभेला झालेला पराभव भाजपला किती आणि कसा जिव्हारी लागला आहे हे अमित शाह यांच्या भाषणामधून बुधवारी उमगले. त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ‘जिंकण्यासाठी काहीही’ अशी भूमिका घेत वातावरण ढवळून काढण्यास भाजपने सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर फार अवलंबून रहावे लागू नये यासाठीच भाजपने ही रणनीती आखल्याचे मानले जाते.राज्यात अधिकाधिक जागा पदरात पाडून घेत त्यातील बहुतांशी जागा निवडून आणण्यासाठी ही रणनीती आहे. याचाच एक भाग म्हणून शाह यांचे हे मेळावे होत आहे. लोकसभेला महाराष्ट्रात महायुती पिछाडीवर गेली ही वस्तुस्थिती आहे. भले कमी मतात काही जागा गेल्या असल्यातरी हा पराभवच आहे, हे मान्यच करावे लागेल. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना अशीच सहानुभूती मिळणार असेल तर काय करायचे, असा प्रश्न त्यांच्या मनात घोळत होता. अशातच महायुतीमधील अनेक नेत्यांची मुक्ताफळे ऐकल्यानंतर अनेकवेळा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. अशा स्थितीत आता महाराष्ट्रातील नेत्यांनी काही सांगून फरक पडेल असे वाटत नव्हते. त्यामुळेच ही जबाबदारी शाह यांनी घेतली.त्यांनी राज्यातील आपल्या भाषणांची सुरुवात कार्यकर्त्यांच्या नाराजीला हात घालून केली. आतापर्यंत जे धाडसी निर्णय घेतले गेले नाहीत ते नरेंद्र मोदी यांनी घेतले. ३७० कलम रद्दपासून, चांद्रयानापर्यंतची उदाहरणे दिली. नक्षलवाद संपवला, शिक्षणाचे धोरण बदलले आणि हे केवळ भाजपमुळे शक्य झाल्याचे सांगत निराशा झटकण्याचे आवाहन केले. २०२९ ला भारताची अर्थव्यवस्था जगात तिसरी असेल हे सांगायला ते विसरले नाहीत. त्यांनी जाता जाता धनुष्यबाण आणि घड्याळाचा उल्लेख केला. परंतु त्यांचा भर राहिला तो कमळ फुलवण्यावरच.

फोडाफोडीची जाहीर परवानगीएकीकडे संत, महंतांच्या भेटी घ्या, त्यांचा सत्कार करा, आशीर्वाद घ्या असे सांगणाऱ्या शाह यांनी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना फोडण्याची जाहीर परवानगी देत आपला इरादा स्पष्ट केला आहे. शासकीय योजनांच्या सर्व लाभार्थ्यांच्या घरी चहा पिऊन या आणि मतदानादिवशी सकाळी ११ पर्यंत आपल्या घरातील आणि शेजारच्या चार घरातील मतदान करून घेण्यास बजावले आहे. त्यांनी हा दिलेला सगळा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रात लहान भावांना मागे सोडून आपण एकटेच सुसाट पुढे जायचे असे धोरण दिसते.

कार्यकर्ते रिचार्ज पण..शाह यांच्या या भाषणाने कार्यकर्ते रिचार्ज झाल्याचे वातावरण त्यावेळी दिसले. परंतु मतदानाला अजून पावणे दाेन महिने आहेत. त्यामुळे मिळणाऱ्या जागा, बंडखोरी, मित्रपक्षांची भूमिका या सगळ्यात या कार्यकर्त्यांची बॅटरी किती चार्ज राहणार ते पाहणे औत्सुक्याचे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024BJPभाजपा