शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधील सत्ता जाईल हीच भाजपला भीती, त्यामुळेच सर्व ओढून घेण्याचे प्रयत्न; जयंत पाटलांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 12:09 IST

या सरकारचा सगळा वेळ आपले आमदार सांभाळण्यातच जात आहे

कोल्हापूर : टाटा समुहाने पुढाकार घेतलेला उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला गेला, त्याची काळजी राज्य सरकारला वाटत नाही. या सरकारचा सगळा वेळ आपले आमदार सांभाळण्यातच जात आहे, त्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नाकडे पाहायला वेळ मिळत नाही, अशी टीका माजी मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी रात्री पत्रकारांशी बोलताना केली.

माजी मंत्री पाटील सहकुटुंब अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आले होते, त्यावेळी पत्रकारांशी ते बाेलत होते. राज्यातील प्रकल्प गुजरातला गेला. तो थांबविण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला नाही. दिल्लीला हे सरकार घाबरते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री या सर्वांनी अहमदाबादला जाऊन गेलेला उद्योग परत आणायला पाहिजे होता. टाटाचा उद्योग गेल्याने त्याचे दुष्परिणाम महाराष्ट्रात दिसणार आहेत, असे पाटील म्हणाले.

गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीत सत्ता जाईल, अशी भीती भाजपला वाटत आहे. त्यामुळे देशात काहीही आले तरी ते गुजरातमध्ये ओढून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात महाराष्ट्राचे नेतृत्व बळी पडत आहे. एखादा प्रकल्प जातोय म्हटल्यावर जो संताप, थयथयाट करायला पाहिजे तो केला नाही. त्यामुळे पुढील काळातही आणखी काही प्रकल्प जातील, अशी भीती पाटील यांनी व्यक्त केली.

आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत विचारले असता, हे आरोप फारच गंभीर आहेत. राणा यांच्या आरोपमुळे कडू यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांनी आता आपला बाणा दाखविला पाहिजे, असे ते म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेGujaratगुजरात