शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
6
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
7
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
8
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
10
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
11
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
12
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

गुजरातमधील सत्ता जाईल हीच भाजपला भीती, त्यामुळेच सर्व ओढून घेण्याचे प्रयत्न; जयंत पाटलांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 12:09 IST

या सरकारचा सगळा वेळ आपले आमदार सांभाळण्यातच जात आहे

कोल्हापूर : टाटा समुहाने पुढाकार घेतलेला उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला गेला, त्याची काळजी राज्य सरकारला वाटत नाही. या सरकारचा सगळा वेळ आपले आमदार सांभाळण्यातच जात आहे, त्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नाकडे पाहायला वेळ मिळत नाही, अशी टीका माजी मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी रात्री पत्रकारांशी बोलताना केली.

माजी मंत्री पाटील सहकुटुंब अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आले होते, त्यावेळी पत्रकारांशी ते बाेलत होते. राज्यातील प्रकल्प गुजरातला गेला. तो थांबविण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला नाही. दिल्लीला हे सरकार घाबरते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री या सर्वांनी अहमदाबादला जाऊन गेलेला उद्योग परत आणायला पाहिजे होता. टाटाचा उद्योग गेल्याने त्याचे दुष्परिणाम महाराष्ट्रात दिसणार आहेत, असे पाटील म्हणाले.

गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीत सत्ता जाईल, अशी भीती भाजपला वाटत आहे. त्यामुळे देशात काहीही आले तरी ते गुजरातमध्ये ओढून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात महाराष्ट्राचे नेतृत्व बळी पडत आहे. एखादा प्रकल्प जातोय म्हटल्यावर जो संताप, थयथयाट करायला पाहिजे तो केला नाही. त्यामुळे पुढील काळातही आणखी काही प्रकल्प जातील, अशी भीती पाटील यांनी व्यक्त केली.

आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत विचारले असता, हे आरोप फारच गंभीर आहेत. राणा यांच्या आरोपमुळे कडू यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांनी आता आपला बाणा दाखविला पाहिजे, असे ते म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेGujaratगुजरात