शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

गुजरातमधील सत्ता जाईल हीच भाजपला भीती, त्यामुळेच सर्व ओढून घेण्याचे प्रयत्न; जयंत पाटलांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 12:09 IST

या सरकारचा सगळा वेळ आपले आमदार सांभाळण्यातच जात आहे

कोल्हापूर : टाटा समुहाने पुढाकार घेतलेला उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला गेला, त्याची काळजी राज्य सरकारला वाटत नाही. या सरकारचा सगळा वेळ आपले आमदार सांभाळण्यातच जात आहे, त्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नाकडे पाहायला वेळ मिळत नाही, अशी टीका माजी मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी रात्री पत्रकारांशी बोलताना केली.

माजी मंत्री पाटील सहकुटुंब अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आले होते, त्यावेळी पत्रकारांशी ते बाेलत होते. राज्यातील प्रकल्प गुजरातला गेला. तो थांबविण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला नाही. दिल्लीला हे सरकार घाबरते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री या सर्वांनी अहमदाबादला जाऊन गेलेला उद्योग परत आणायला पाहिजे होता. टाटाचा उद्योग गेल्याने त्याचे दुष्परिणाम महाराष्ट्रात दिसणार आहेत, असे पाटील म्हणाले.

गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीत सत्ता जाईल, अशी भीती भाजपला वाटत आहे. त्यामुळे देशात काहीही आले तरी ते गुजरातमध्ये ओढून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात महाराष्ट्राचे नेतृत्व बळी पडत आहे. एखादा प्रकल्प जातोय म्हटल्यावर जो संताप, थयथयाट करायला पाहिजे तो केला नाही. त्यामुळे पुढील काळातही आणखी काही प्रकल्प जातील, अशी भीती पाटील यांनी व्यक्त केली.

आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत विचारले असता, हे आरोप फारच गंभीर आहेत. राणा यांच्या आरोपमुळे कडू यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांनी आता आपला बाणा दाखविला पाहिजे, असे ते म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेGujaratगुजरात