शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

गुजरातमधील सत्ता जाईल हीच भाजपला भीती, त्यामुळेच सर्व ओढून घेण्याचे प्रयत्न; जयंत पाटलांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 12:09 IST

या सरकारचा सगळा वेळ आपले आमदार सांभाळण्यातच जात आहे

कोल्हापूर : टाटा समुहाने पुढाकार घेतलेला उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला गेला, त्याची काळजी राज्य सरकारला वाटत नाही. या सरकारचा सगळा वेळ आपले आमदार सांभाळण्यातच जात आहे, त्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नाकडे पाहायला वेळ मिळत नाही, अशी टीका माजी मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी रात्री पत्रकारांशी बोलताना केली.

माजी मंत्री पाटील सहकुटुंब अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आले होते, त्यावेळी पत्रकारांशी ते बाेलत होते. राज्यातील प्रकल्प गुजरातला गेला. तो थांबविण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला नाही. दिल्लीला हे सरकार घाबरते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री या सर्वांनी अहमदाबादला जाऊन गेलेला उद्योग परत आणायला पाहिजे होता. टाटाचा उद्योग गेल्याने त्याचे दुष्परिणाम महाराष्ट्रात दिसणार आहेत, असे पाटील म्हणाले.

गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीत सत्ता जाईल, अशी भीती भाजपला वाटत आहे. त्यामुळे देशात काहीही आले तरी ते गुजरातमध्ये ओढून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात महाराष्ट्राचे नेतृत्व बळी पडत आहे. एखादा प्रकल्प जातोय म्हटल्यावर जो संताप, थयथयाट करायला पाहिजे तो केला नाही. त्यामुळे पुढील काळातही आणखी काही प्रकल्प जातील, अशी भीती पाटील यांनी व्यक्त केली.

आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत विचारले असता, हे आरोप फारच गंभीर आहेत. राणा यांच्या आरोपमुळे कडू यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांनी आता आपला बाणा दाखविला पाहिजे, असे ते म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेGujaratगुजरात