शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

शहरात पुन्हा चुकून आला गवा.. पण माणसांना अकलेचा डोस कुणी द्यावा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 18:07 IST

खरं तर पहिल्यांदा भिती या गोष्टीची वाटतेय की कोल्हापूरात पुण्यात चार महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये.

खरं तर पहिल्यांदा भिती या गोष्टीची वाटतेय की कोल्हापूरात पुण्यात चार महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये. कारण पुण्यात अतिउत्साही मुर्ख लोकांच्या बघ्यांच्या गर्दीने गव्याला पळवून पळवून दमवून त्याचा जीव घेतला होता. कोल्हापूर शहरामध्ये गवा आलाय ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असल्यामुळे आमच्या भागातील बघ्यांची गर्दी पंचगंगा नदीच्या दिशेने जाऊ लागल्याने धास्ती आणखीनच वाढली.तिथे जाणाऱ्या मित्रांबरोबरच काही लोकांनी मला विचारलंच, गवा पकडायला तुम्ही गेला नाही ?गवा पकडायला कशाला हवाय, त्याला परत पाठवण्यासाठी वनविभाग आणि रेस्क्यू टीम त्यांचं कार्य करत असताना बघ्यांच्या गर्दीतील एक म्हणून आम्ही कशाला गर्दी वाढवायची.. असं सांगून तुम्हीही उगाच गर्दी करायला तिथे जाऊ नका हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण निघण्याच्या पूर्ण तयारीत असणाऱ्या गाड्या मागे वळल्या नाहीत. म्हणूनच म्हणावसं वाटलं, शहरात पुन्हा चुकून आला गवा.. पण माणसांना अकलेचा डोस कुणी द्यावा ?त्यावेळी मात्र बाबा आमटेंच्या बोलण्याची आठवण झाली, आमटे परिवारानं जेव्हा आदिवाश्यांच्या साठी कार्य करायचं ठरवलं तेव्हा पहिल्यांदा ते जंगलात गेल्यानंतर शर्ट पँन्ट घातलेलं आणि आपल्यापेक्षा वेगळं कुणीतरी दिसतय म्हणून काहीजण घाबरून पळायचे, तर काहीजण उत्सुकतेपोटी विनाकारण गर्दी करायचे आणि नंतर त्यांच्या समुदायातील लोकांनाही ते दाखवायला हळूहळू घेऊन यायचे. रोज प्राण्यांची शिकार करून पोट भरणाऱ्या आदिवाश्यांच्या विचारांमध्ये नंतर आमटे परिवाराने बदल सुध्दा केला आणि वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणात संरक्षण झाले.आज त्या घटनेला कित्येक वर्ष उलटली.. ते जंगलातील अशिक्षित आदिवासी सुधारले, ज्या जनावरांना मारून स्वतःचे पोट भरायचे त्याच जनावरांचे जीव भुतदयेसाठी वाचवू लागले. पण शहरातील सुशिक्षित लोकांचं काय ? आदिवासी तर अज्ञानापायी आणि  उत्सुकतेपोटी गर्दी करायचे, पण चुकून शहरात आलेल्या वन्यजीवाला बघायला गर्दी करून आणि गोंधळ घालून त्या मुक्या जीवाला दमवून त्याचा जीव घ्यायचा ही शहरातील सुशिक्षितांची कसली अघोरी मानसिकता ?रानगवा दिसताना जरी भारदस्त आणि भक्कम दिसत असला तरी त्याचे हृदय खूप नाजूक असते. अहो माणसाच्या हृदयावर सुध्दा एखाद्या ऐकीव गोष्टीचा परिणाम होतो आणि भितीने कधीतरी जीव सुध्दा जातो. इथे तर शेकडो लोक या बिचाऱ्या मुक्या जीवाच्या समोर जमून हातात काठ्या घेऊन, आरडाओरडा करत, काही अतिशहाणे लांबून दगडफेक करत असतात. त्याच्या जीवाचे भितीने काय हाल होत असतील याचा तरी विचार करा !फिरतं जनावर आहे, वनविभाग त्याला आलेल्या मार्गे किंवा दुसऱ्या मार्गे पुन्हा वनात त्याच्या अधिवासात पाठवण्यासाठी मार्ग दाखवेलच, पण तुमच्या मोबाईल मध्ये फोटो व्हिडीओ करण्याच्या नादात आणि गर्दीच्या गोंधळात त्याचा जीव घेऊ नका !प्राणीमित्रधनंजय वामन नामजोशी (नाना)

टॅग्स :kolhapurकोल्हापूर