शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

साखर उत्पादनापेक्षा विक्रीचे मोठे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे -- उत्पादन खर्चाएवढा साखरेला हमीभाव मिळणे हाच साखर उद्योगाला आधार ठरू शकतो. सध्या अतिरिक्त उत्पादनामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे -- उत्पादन खर्चाएवढा साखरेला हमीभाव मिळणे हाच साखर उद्योगाला आधार ठरू शकतो. सध्या अतिरिक्त उत्पादनामुळे साखर उत्पादनापेक्षा विक्रीचे मोठे आव्हान साखर उद्योगापुढे उभे आहे, यामुळे

साखर कारखान्यांचे गोडाउन शिल्लक साखरेने दोन वर्षे फुल्ल आहेत, यासाठी केंद्र शासनाने साखरेला ३६ रुपये प्रति किलो हमीभाव द्यावा, अशी मागणी अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी केली. मंगळवारी कुंभी कासारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगाम समाप्ती कार्यक्रमात नंतर अध्यक्ष चंद्रदीप नरके बोलत होते.

संचालक ॲड. बाजीराव शेलार व त्यांच्या पत्नी मंगल शेलार यांच्या हस्ते समाप्ती कार्यक्रम पार पडला. उपाध्यक्ष निवास वातकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी चंद्रदीप नरके म्हणाले की, कुंभीने या हंगामात ५ लाख ५० हजार ६१५ मे. टन उसाचे गाळप करून १२.६९ टक्के सरासरी उतारासह सात लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. या हंगामात तोडणी व वाहतूक यंत्रणेमुळे गाळप हंगामासाठी मोठी कसरत करावी लागली. सहवीज प्रकल्पातून ४ कोटी ४९ लाख १६ हजार युनिट वीज उत्पादन झाले असून, २ कोटी ७० लाख २९ हजार युनिट वीज विक्री करण्यात आली आहे. यातून १८ कोटी २७ लाख रुपये उत्पादन मिळाले आहे.

केंद्र शासनाचे साखर उत्पादन कमी करून इथेनॉल निर्मिती राबवलेले धोरण योग्य आहे. इथेनॉलच्या खरेदी व दराची हमी केंद्र शासनाने घेतल्याने भविष्यात साखर उत्पादन कमी होईल; पण साखरेला ३६ रुपये हमीभाव हाच उद्योगाला आधार ठरू शकते. यावेळी सर्व संचालक कार्यकारी संचालक अशोक पाटील, सचिव प्रशांत पाटील, संजय पाटील, चिफ केमिस्ट प्रकाश पाटील व कर्मचारी विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(फोटो)

कुंभी कासारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगाम समाप्ती समारोह संचालक ॲड. बाजीराव शेलार व पत्नी मंगला शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अध्यक्ष उपाध्यक्ष निवास वातकर व सर्व संचालक उपस्थित होते.