शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

मोठी बातमी: कागलच्या राजकारणात उलथापालथ; घाटगेंनी घेतली शरद पवारांची भेट, पक्षप्रवेशाचा मुहूर्तही ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 12:09 IST

समरजीत घाटगे यांनी आगामी विधानसभेला 'तुतारी' फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर कागल विधानसभा मतदारसंघात मोठं राजकीय आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे नेते, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी आगामी विधानसभेला 'तुतारी' फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. ३ सप्टेंबरला पवार कोल्हापूर दौऱ्यावर असून, यावेळी घाटगे यांचा पक्षात प्रवेश होणार आहे. गैबी चौकात मेळावा घेऊनच ते रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. समरजीत यांची भूमिका स्पष्ट झाल्याने कागल विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालं असून, महायुतीचे पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध महाविकास आघाडीचे समरजीत घाटगे अशी थेट लढत तिथे होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

विधानसभेच्या मागील निवडणुकीत 'कागल'मध्ये तिरंगी लढत झाली होती. राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, शिवसेनेकडून संजय घाटगे तर अपक्ष म्हणून समरजित घाटगे रिंगणात उतरले होते. यावेळी समरजीत घाटगे यांनी ८८ हजार मते घेतली होती. तेव्हापासून त्यांनी भाजपच्या माध्यमातून पाच वर्षे तयारी केली आहे, मध्यंतरी राज्यातील नवीन समीकरणामुळे त्यांची कोंडी झाली. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांना जाणार आहे. त्यात महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार संजय घाटगे यांनी निवडणुकीतून माघार घेऊन पालकमंत्री मुश्रीफ यांना पाठिंवा दिल्याने 'कागल'चे राजकारण वेगळ्या वळणावर आले. समरजीत घाटगे यांनी संपर्क मोहीम राबवली असली तरी ते कोणत्या पक्षातून लढणार याविषयी उत्सुकता होती. आघाडीमध्ये 'कागल'ची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाणार असल्याने त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण, ते मुंबईत नसल्याने भेट झाली नाही. 

अपक्ष लढलो आणि तिरंगी लढत झाली तर मतविभागणी होते आणि त्याचा फटका बसतो, असे समरजीत यांचे म्हणणे होते. त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेतल्याचे समजते. घाटगे यांचे भाजपनेच पुनर्वसन करावे, असा मंत्री पाटील यांचा प्रयत्न होता. परंतु, तीन पक्षांच्या सरकारमध्ये सद्यः स्थितीत त्यास अडचणी असल्याने आणि विधानसभा लढवण्याचा निर्णय आधीच जाहीर केल्यामुळे समरजीत यांनी भूमिका घेतल्याचे समजते.

'लोकमत'चे वृत्त खरे.. '

लोकमतने ७ ऑगस्टलाच समरजीत घाटगे तुतारी फुंकणार असल्याचे वृत्त दिले होते. ५ ऑगस्टला मुरगूडला त्यांचा मेळावा झाला. त्यामध्ये त्यांनी मी लढणार हे स्पष्टच आहे. फक्त एबी फॉर्म कोणत्या पक्षाचा असेल हेच ठरलेले नाही, असे जाहीर केले होते. आता त्यांनी एबी फॉर्म कोणत्या पक्षाचा असेल त्याचाही निर्णय घेऊन टाकला आहे. 

राजू शेट्टी यांच्यासारखे व्हायला नको.. 

मुश्रीफ मुत्सद्दी असल्याने एवढ्या लवकर पत्ते ओपन करायला नकोत, असेही काहींना वाटत होते. परंतु, लोकसभेला राजू शेट्टी उमेदवारीचा घोळ घालत बसले आणि त्याचा त्यांना फटका बसला. त्यामुळे एकदा निर्णय घेतला तर तो जाहीर करायला विलंब कशाला, असाही विचार समरजीत यांनी केल्याचे दिसते.

तिरंगी लढत अडचणीची? 

'कागल मतदारसंघात १९९८ पासूनच्या लढती पाहिल्या तर दुरंगी लढती काटाजोड झाल्या आहेत. तिरंगी लढतीत हसन मुश्रीफ यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. हे घाटगे यांना माहीत असल्याने सरळ लढत करण्यासाठी हातात तुतारी घेण्यापलीकडे त्यांच्याकडे पर्याय नव्हता. त्यामुळेच त्यांनी 'आर या पार'चा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :kagal-acकागलSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगेHasan Mushrifहसन मुश्रीफNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार