शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
3
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
4
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
5
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
6
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
7
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
8
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
9
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
10
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
11
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
12
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
13
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
14
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
15
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
16
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
17
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
18
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
19
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: कागलच्या राजकारणात उलथापालथ; घाटगेंनी घेतली शरद पवारांची भेट, पक्षप्रवेशाचा मुहूर्तही ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 12:09 IST

समरजीत घाटगे यांनी आगामी विधानसभेला 'तुतारी' फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर कागल विधानसभा मतदारसंघात मोठं राजकीय आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे नेते, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी आगामी विधानसभेला 'तुतारी' फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. ३ सप्टेंबरला पवार कोल्हापूर दौऱ्यावर असून, यावेळी घाटगे यांचा पक्षात प्रवेश होणार आहे. गैबी चौकात मेळावा घेऊनच ते रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. समरजीत यांची भूमिका स्पष्ट झाल्याने कागल विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालं असून, महायुतीचे पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध महाविकास आघाडीचे समरजीत घाटगे अशी थेट लढत तिथे होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

विधानसभेच्या मागील निवडणुकीत 'कागल'मध्ये तिरंगी लढत झाली होती. राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, शिवसेनेकडून संजय घाटगे तर अपक्ष म्हणून समरजित घाटगे रिंगणात उतरले होते. यावेळी समरजीत घाटगे यांनी ८८ हजार मते घेतली होती. तेव्हापासून त्यांनी भाजपच्या माध्यमातून पाच वर्षे तयारी केली आहे, मध्यंतरी राज्यातील नवीन समीकरणामुळे त्यांची कोंडी झाली. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांना जाणार आहे. त्यात महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार संजय घाटगे यांनी निवडणुकीतून माघार घेऊन पालकमंत्री मुश्रीफ यांना पाठिंवा दिल्याने 'कागल'चे राजकारण वेगळ्या वळणावर आले. समरजीत घाटगे यांनी संपर्क मोहीम राबवली असली तरी ते कोणत्या पक्षातून लढणार याविषयी उत्सुकता होती. आघाडीमध्ये 'कागल'ची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाणार असल्याने त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण, ते मुंबईत नसल्याने भेट झाली नाही. 

अपक्ष लढलो आणि तिरंगी लढत झाली तर मतविभागणी होते आणि त्याचा फटका बसतो, असे समरजीत यांचे म्हणणे होते. त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेतल्याचे समजते. घाटगे यांचे भाजपनेच पुनर्वसन करावे, असा मंत्री पाटील यांचा प्रयत्न होता. परंतु, तीन पक्षांच्या सरकारमध्ये सद्यः स्थितीत त्यास अडचणी असल्याने आणि विधानसभा लढवण्याचा निर्णय आधीच जाहीर केल्यामुळे समरजीत यांनी भूमिका घेतल्याचे समजते.

'लोकमत'चे वृत्त खरे.. '

लोकमतने ७ ऑगस्टलाच समरजीत घाटगे तुतारी फुंकणार असल्याचे वृत्त दिले होते. ५ ऑगस्टला मुरगूडला त्यांचा मेळावा झाला. त्यामध्ये त्यांनी मी लढणार हे स्पष्टच आहे. फक्त एबी फॉर्म कोणत्या पक्षाचा असेल हेच ठरलेले नाही, असे जाहीर केले होते. आता त्यांनी एबी फॉर्म कोणत्या पक्षाचा असेल त्याचाही निर्णय घेऊन टाकला आहे. 

राजू शेट्टी यांच्यासारखे व्हायला नको.. 

मुश्रीफ मुत्सद्दी असल्याने एवढ्या लवकर पत्ते ओपन करायला नकोत, असेही काहींना वाटत होते. परंतु, लोकसभेला राजू शेट्टी उमेदवारीचा घोळ घालत बसले आणि त्याचा त्यांना फटका बसला. त्यामुळे एकदा निर्णय घेतला तर तो जाहीर करायला विलंब कशाला, असाही विचार समरजीत यांनी केल्याचे दिसते.

तिरंगी लढत अडचणीची? 

'कागल मतदारसंघात १९९८ पासूनच्या लढती पाहिल्या तर दुरंगी लढती काटाजोड झाल्या आहेत. तिरंगी लढतीत हसन मुश्रीफ यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. हे घाटगे यांना माहीत असल्याने सरळ लढत करण्यासाठी हातात तुतारी घेण्यापलीकडे त्यांच्याकडे पर्याय नव्हता. त्यामुळेच त्यांनी 'आर या पार'चा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :kagal-acकागलSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगेHasan Mushrifहसन मुश्रीफNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार