शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

मोठी बातमी: कागलच्या राजकारणात उलथापालथ; घाटगेंनी घेतली शरद पवारांची भेट, पक्षप्रवेशाचा मुहूर्तही ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 12:09 IST

समरजीत घाटगे यांनी आगामी विधानसभेला 'तुतारी' फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर कागल विधानसभा मतदारसंघात मोठं राजकीय आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे नेते, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी आगामी विधानसभेला 'तुतारी' फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. ३ सप्टेंबरला पवार कोल्हापूर दौऱ्यावर असून, यावेळी घाटगे यांचा पक्षात प्रवेश होणार आहे. गैबी चौकात मेळावा घेऊनच ते रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. समरजीत यांची भूमिका स्पष्ट झाल्याने कागल विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालं असून, महायुतीचे पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध महाविकास आघाडीचे समरजीत घाटगे अशी थेट लढत तिथे होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

विधानसभेच्या मागील निवडणुकीत 'कागल'मध्ये तिरंगी लढत झाली होती. राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, शिवसेनेकडून संजय घाटगे तर अपक्ष म्हणून समरजित घाटगे रिंगणात उतरले होते. यावेळी समरजीत घाटगे यांनी ८८ हजार मते घेतली होती. तेव्हापासून त्यांनी भाजपच्या माध्यमातून पाच वर्षे तयारी केली आहे, मध्यंतरी राज्यातील नवीन समीकरणामुळे त्यांची कोंडी झाली. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांना जाणार आहे. त्यात महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार संजय घाटगे यांनी निवडणुकीतून माघार घेऊन पालकमंत्री मुश्रीफ यांना पाठिंवा दिल्याने 'कागल'चे राजकारण वेगळ्या वळणावर आले. समरजीत घाटगे यांनी संपर्क मोहीम राबवली असली तरी ते कोणत्या पक्षातून लढणार याविषयी उत्सुकता होती. आघाडीमध्ये 'कागल'ची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाणार असल्याने त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण, ते मुंबईत नसल्याने भेट झाली नाही. 

अपक्ष लढलो आणि तिरंगी लढत झाली तर मतविभागणी होते आणि त्याचा फटका बसतो, असे समरजीत यांचे म्हणणे होते. त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेतल्याचे समजते. घाटगे यांचे भाजपनेच पुनर्वसन करावे, असा मंत्री पाटील यांचा प्रयत्न होता. परंतु, तीन पक्षांच्या सरकारमध्ये सद्यः स्थितीत त्यास अडचणी असल्याने आणि विधानसभा लढवण्याचा निर्णय आधीच जाहीर केल्यामुळे समरजीत यांनी भूमिका घेतल्याचे समजते.

'लोकमत'चे वृत्त खरे.. '

लोकमतने ७ ऑगस्टलाच समरजीत घाटगे तुतारी फुंकणार असल्याचे वृत्त दिले होते. ५ ऑगस्टला मुरगूडला त्यांचा मेळावा झाला. त्यामध्ये त्यांनी मी लढणार हे स्पष्टच आहे. फक्त एबी फॉर्म कोणत्या पक्षाचा असेल हेच ठरलेले नाही, असे जाहीर केले होते. आता त्यांनी एबी फॉर्म कोणत्या पक्षाचा असेल त्याचाही निर्णय घेऊन टाकला आहे. 

राजू शेट्टी यांच्यासारखे व्हायला नको.. 

मुश्रीफ मुत्सद्दी असल्याने एवढ्या लवकर पत्ते ओपन करायला नकोत, असेही काहींना वाटत होते. परंतु, लोकसभेला राजू शेट्टी उमेदवारीचा घोळ घालत बसले आणि त्याचा त्यांना फटका बसला. त्यामुळे एकदा निर्णय घेतला तर तो जाहीर करायला विलंब कशाला, असाही विचार समरजीत यांनी केल्याचे दिसते.

तिरंगी लढत अडचणीची? 

'कागल मतदारसंघात १९९८ पासूनच्या लढती पाहिल्या तर दुरंगी लढती काटाजोड झाल्या आहेत. तिरंगी लढतीत हसन मुश्रीफ यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. हे घाटगे यांना माहीत असल्याने सरळ लढत करण्यासाठी हातात तुतारी घेण्यापलीकडे त्यांच्याकडे पर्याय नव्हता. त्यामुळेच त्यांनी 'आर या पार'चा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :kagal-acकागलSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगेHasan Mushrifहसन मुश्रीफNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार