शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

‘बिद्री’त ‘के. पी.’च ‘लई भारी’--चंद्रकांतदादा-मुश्रीफ ठरले किंगमेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:28 AM

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अत्यंत अटीतटीने झालेल्या निवडणुकीत

ठळक मुद्देसर्व २१ जागांवर दणदणीत विजयदिनकरराव जाधव-आबिटकर-मंडलिक आघाडीचा धुव्वार्व उमेदवार सरासरी १६०० ते ४९०० च्या मताधिक्याने विजयी

लोकमत न्यूज नेटवर्कदत्ता लोकरेकोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अत्यंत अटीतटीने झालेल्या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हसन मुश्रीफ व के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्टÑवादी-भाजप आघाडीने सर्व २१ जागा मोठ्या फरकाने जिंकून दणदणीत विजय मिळविला. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार दिनकरराव जाधव, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचा धुव्वा उडाला. सर्व उमेदवार सरासरी १६०० ते ४९०० च्या मताधिक्याने विजयी झाले.

राज्याच्या राजकारणात ज्या राष्ट्रवादीचा ‘भ्रष्टाचारवादी’ असा उल्लेख केला, त्याच पक्षाशी या निवडणुकीत भाजपने आघाडी केली होती; त्यामुळे हा नवाच फॉर्म्युला लोक कितपत स्वीकारतात याबद्दल उत्सुकता होती. सभासदांनी त्यावरून झालेल्या टीकेकडे दुर्लक्ष करून याच आघाडीस स्पष्ट बहुमत दिले. ‘भोगावती’ साखर कारखान्याच्या निवडणुकीत पदरी पराभव आल्याने भाजप नेते व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पाच जागा घेऊन राष्टÑवादीसोबत निवडणूक लढविण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याला यश आल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. महसूलमंत्री पाटील यांच्या तालुक्यातील हा कारखाना असल्याने त्यांनी या निवडणुकीत व्यक्तिगत प्रतिष्ठा पणाला लावली होती.

विरोधी आमदार प्रकाश आबिटकर यांनी कारखान्यातील कारभारावर टीका केलीच; त्याचबरोबर मंत्री चंद्रकांतदादा यांना विधानसभा लढविण्याचे जाहीर आव्हान देऊन निवडणुकीत चांगलीच हवा तयार केली होती. त्यामुळे त्यांना चार-पाच तरी जागा मिळतील असे चित्र होते; परंतु त्यांच्या आघाडीस दारुण पराभवास सामोरे जावे लागले. प्रमुख विजयी उमेदवारांत माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, विठ्ठलराव खोराटे, बाबासाहेब हिंदुराव पाटील यांचा समावेश आहे. माजी आमदार दिनकरराव जाधव, के. जी. नांदेकर, विजयसिंह मोरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अपात्र सभासदांचा मुद्दा या निवडणुकीत निर्णायक ठरल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.

कारखान्याच्या वाढीव सभासदांचा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्याने निवडणूक लांबणीवर पडली. त्यामुळे राज्य सरकारने कारखान्यावर प्रशासक नेमला होता. गेली दोन वर्षे कारखान्यावर जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय मंडळ कार्यरत होते. प्रशासक नेमणुकीवरून भाजप व राष्टÑवादीमध्ये वाद झाला होता; परंतु हे दोन पक्ष निवडणुकीसाठी एकत्र येऊन सत्ता काबीज केली. के. पी. पाटील यांच्या कारखाना चांगला चालविण्याच्या प्रतिमेचा फायदा या निवडणुकीत राष्टÑवादी-भाजप आघाडीला झाला. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी रात्री दहा वाजता अधिकृत निकाल जाहीर केला. या निवडणुकीसाठी रविवारी (दि. ८) चुरशीने ४७ हजार २७७ (८०.३२ टक्के) मतदान झाले होते. मंगळवारी लोणार वसाहतीतील रामकृष्ण हॉल मध्ये मतमोजणी झाली.गत निवडणुकीपेक्षा मताधिक्यात घटगत निवडणुकीत राष्टÑवादीने स्वबळावर सर्व जागा जिंकत पाच ते सहा हजारांचे मताधिक्य घेतले होते. या वेळेला वाढीव सभासद असूनही त्यात घट झाली. विरोधी आघाडीने केलेली मोर्चेबांधणी, राष्टÑवादी आघाडीतून ऐनवेळी बाजूला गेलेले विजयसिंह मोरे, के. जी. नांदेकर, जीवन पाटील, अशोक फराकटे, राजेखान जमादार यांच्यामुळे हा फटका बसला.भाजप पहिल्यादांच ‘बिद्री’च्या सत्तेतविजयी आघाडीत भाजपचे पाच संचालक आहेत. यांमध्ये ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व माजी आमदार बजरंग देसाई यांचे प्रत्येकी दोन, तर जनता दलाचे विठ्ठलराव खोराटे असे संचालक आहेत. या संचालकांच्या माध्यमातून भाजप ‘बिद्री’च्या सत्तेत पहिल्यांदाच गेला आहे.संस्था गटाची विजयी सलामीसंस्था गटातील मतमोजणी सुरुवातीला घेण्यात आली. यामध्ये १०३६ पैकी १०३६ मते वैध ठरली. त्यांपैकी महालक्ष्मी आघाडीचे जगदीश पाटील यांना ५४२, तर राजर्षी शाहू आघाडीचे जीवन पाटील यांना ४९० मते मिळाली. संस्था गटातील निकालाने ‘महालक्ष्मी’ आघाडीने विजयी सलामी दिली.निवडणूक यंत्रणेची कौतुकास्पद कामगिरीगत निवडणुकीत दुसºया दिवशी सकाळी आठपर्यंत मतमोजणीचे काम सुरू होते. या निवडणुकीत मतदानात वाढ झाल्याने त्यापेक्षा जादा वेळ लागेल, असा अंदाज होता; पण निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी मतमोजणीचे नेटके नियोजन केल्याने रात्री दहा वाजेपर्यंत कोणताही गोंधळ, गडबड व तक्रारी न होता सर्व निकाल जाहीर झाला.