शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

ऊस दरात राज्यात ‘के. पी’च भारी, प्रतिटन ३४०७ रुपये दराची घोषणा 

By राजाराम लोंढे | Updated: December 15, 2023 12:17 IST

सर्वाधिक दराची परंपरा प्रत्येक वर्षी

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्यांने चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३४०७ रुपये दर जाहीर करण्यात आला. प्रतिटन ३२०० रुपये पहिली उचल आणि हंगाम संपण्यापूर्वी २०७ रुपये देणार आहेत. हा दर उचल राज्यातील सर्वोच्च असून कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी राज्यात ऊस दरात आपणच भारी असल्याचे दाखवून दिले आहे.‘बिद्री’ साखर कारखान्याची आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक दराची परंपरा प्रत्येक वर्षी आहे. मागील हंगामात १२.६२ टक्के साखर उताऱ्याला प्रतिटन ३२०९ रुपये दर दिला होता. मागील हंगामात ८ लाख ८० हजार टनाचे गाळप केले होते. यावर्षी ‘स्वाभिमानी’ने ऊस दराचे आंदोलन सुरु केले, पण कारखान्याची निवडणूक असल्याने त्यांना दर जाहीर करता आला नव्हता.मात्र, प्रचार सभांमधून ते सभासदांना आश्वासित करत होते. कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी येथील पंचगंगा साखर कारखान्याने प्रतिटन ३३०० रुपये जाहीर केला आहे. त्यापेक्षा जादा दर जाहीर करुन ‘बिद्री’ने राज्यात आपणच ऊस दरात भारी असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.निवडणुकीतील शब्द खरा ठरवला‘बिद्री’ची निवडणूक पंधरा दिवसापुर्वी झाली, या प्रचारादरम्यान सभासदांना अपेक्षेपेक्षा जादा दर देण्याचा शब्द कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी दिला होता. तो खरा ठरल्याची चर्चा ‘बिद्री’ परिसरात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने