शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना फायद्याचीो

By admin | Updated: November 17, 2015 00:26 IST

कुळासह कोणतेही शेतकरी भाग घेऊ शकतात तसेच शेतीकरिता कर्ज उचललेले व कर्ज न उचललेले शेतकरी स्वेच्छेने सहभागी होऊ शकतात.

शेती हा व्यवसाय प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्ग नेहमीच साथ देईल, असे होत नाही. लहरी निसर्गामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर परिणाम होतो आणि यावर मात करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना आधार देऊ शकते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व भारतीय कृषी विमा कंपनीच्या सहकार्याने राज्यात अधिसूचित पिकांसाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना २0१५-१६ या रब्बी हंगामासाठी राबविण्याचा ३१ आॅक्टोबरचा शासन निर्णय झाला आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजनेत नैसर्गिक आपत्ती, रोग व किडीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण व आर्थिक साहाय्य देणे, शेतकऱ्याला उच्च पद्धतीचे आधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च प्रतीची सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंक कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी रब्बी हंगामात बागायती गहू, जिरायत ज्वारी, हरभरा तसेच उन्हाळी हंगामात भुईमूग पिके या योजनेखाली येतात. राष्ट्रीय कृषी विमा योजनेत कुळासह कोणतेही शेतकरी भाग घेऊ शकतात तसेच शेतीकरिता कर्ज उचललेले व कर्ज न उचललेले शेतकरी स्वेच्छेने सहभागी होऊ शकतात. शेतीसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी स्वत: त्यांचे विमा प्रस्ताव पेरणीनंतर एक महिन्यात किंवा जास्तीत जास्त ३१ डिसेंबरपूर्वी बँकेत जमा करणे आवश्यक आहे. एकूण कमाल विमा संरक्षण सरासरी उत्पन्नाच्या १५0 टक्केपर्यंत घेता येते. सर्वसाधारण जोखीमस्तर ६0 व ८0 टक्के असलेल्या अधिसूचित पिकांसाठी राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभाग घेणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी विमा हप्त्यामध्ये १0 टक्के अनुदान ( केंद्र ५ टक्के व राज्य शासन ५ टक्के) मिळण्यास पात्र ठरतील. चालू वर्षाच्या रब्बी हंगामासाठी बागायती गहू, जिरायत ज्वारी व हरभरा पिकांसाठी शेतकऱ्यांनी त्यांचे विमा प्रस्ताव पीक पेरणीपासून १ महिना किंवा ३१ डिसेंबरपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. बँकांनी हे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून एक महिन्यामध्ये किंवा ३१ जानेवारी २0१६ पर्यंत भारतीय कृषी विमा कंपनीस सादर करावयाचे आहेत. उन्हाळी भुईमुगाचे पीक पेरणीपासून १ महिना किंवा ३१ मार्च २0१६ पर्यंत शेतकऱ्यांकडून प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. हे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून १ महिना किंवा ३0 एप्रिल २0१६ पर्यंत बँकांकडून विमा कंपनीकडे प्रस्ताव सादर होतील. रब्बी हंगाम २0१४ च्या पीक विम्यासाठी पीकनिहाय अधिसूचित मंडळे पुढीलप्रमाणे आहेत : रब्बी ज्वारीसाठी शिरोळ तालुक्यातील शिरोळ व नृसिंहवाडी महसूल मंडळ. बागायती गव्हासाठी हातकणंगले, शिरोळ, करवीर, गडहिंग्लज असे चार तालुके, हरभरा पिकासाठी हातकणंगले, करवीर, कागल, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, भुदरगड, आजरा असे नऊ तालुके आहेत. राष्ट्रीय कृषी विमा योजनेत शेतकऱ्यांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन आटोळे यांच्याशी संपर्क साधावा. - वर्षा पाटोळे, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर.