शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना फायद्याचीो

By admin | Updated: November 17, 2015 00:26 IST

कुळासह कोणतेही शेतकरी भाग घेऊ शकतात तसेच शेतीकरिता कर्ज उचललेले व कर्ज न उचललेले शेतकरी स्वेच्छेने सहभागी होऊ शकतात.

शेती हा व्यवसाय प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्ग नेहमीच साथ देईल, असे होत नाही. लहरी निसर्गामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर परिणाम होतो आणि यावर मात करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना आधार देऊ शकते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व भारतीय कृषी विमा कंपनीच्या सहकार्याने राज्यात अधिसूचित पिकांसाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना २0१५-१६ या रब्बी हंगामासाठी राबविण्याचा ३१ आॅक्टोबरचा शासन निर्णय झाला आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजनेत नैसर्गिक आपत्ती, रोग व किडीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण व आर्थिक साहाय्य देणे, शेतकऱ्याला उच्च पद्धतीचे आधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च प्रतीची सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंक कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी रब्बी हंगामात बागायती गहू, जिरायत ज्वारी, हरभरा तसेच उन्हाळी हंगामात भुईमूग पिके या योजनेखाली येतात. राष्ट्रीय कृषी विमा योजनेत कुळासह कोणतेही शेतकरी भाग घेऊ शकतात तसेच शेतीकरिता कर्ज उचललेले व कर्ज न उचललेले शेतकरी स्वेच्छेने सहभागी होऊ शकतात. शेतीसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी स्वत: त्यांचे विमा प्रस्ताव पेरणीनंतर एक महिन्यात किंवा जास्तीत जास्त ३१ डिसेंबरपूर्वी बँकेत जमा करणे आवश्यक आहे. एकूण कमाल विमा संरक्षण सरासरी उत्पन्नाच्या १५0 टक्केपर्यंत घेता येते. सर्वसाधारण जोखीमस्तर ६0 व ८0 टक्के असलेल्या अधिसूचित पिकांसाठी राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभाग घेणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी विमा हप्त्यामध्ये १0 टक्के अनुदान ( केंद्र ५ टक्के व राज्य शासन ५ टक्के) मिळण्यास पात्र ठरतील. चालू वर्षाच्या रब्बी हंगामासाठी बागायती गहू, जिरायत ज्वारी व हरभरा पिकांसाठी शेतकऱ्यांनी त्यांचे विमा प्रस्ताव पीक पेरणीपासून १ महिना किंवा ३१ डिसेंबरपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. बँकांनी हे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून एक महिन्यामध्ये किंवा ३१ जानेवारी २0१६ पर्यंत भारतीय कृषी विमा कंपनीस सादर करावयाचे आहेत. उन्हाळी भुईमुगाचे पीक पेरणीपासून १ महिना किंवा ३१ मार्च २0१६ पर्यंत शेतकऱ्यांकडून प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. हे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून १ महिना किंवा ३0 एप्रिल २0१६ पर्यंत बँकांकडून विमा कंपनीकडे प्रस्ताव सादर होतील. रब्बी हंगाम २0१४ च्या पीक विम्यासाठी पीकनिहाय अधिसूचित मंडळे पुढीलप्रमाणे आहेत : रब्बी ज्वारीसाठी शिरोळ तालुक्यातील शिरोळ व नृसिंहवाडी महसूल मंडळ. बागायती गव्हासाठी हातकणंगले, शिरोळ, करवीर, गडहिंग्लज असे चार तालुके, हरभरा पिकासाठी हातकणंगले, करवीर, कागल, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, भुदरगड, आजरा असे नऊ तालुके आहेत. राष्ट्रीय कृषी विमा योजनेत शेतकऱ्यांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन आटोळे यांच्याशी संपर्क साधावा. - वर्षा पाटोळे, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर.