शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोल्हापूर : ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’: कौशल इनामदार , अक्षरगप्पांचा शतकमहोत्सवी कार्यक्रमाला उंदड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 17:13 IST

‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी’ या मराठी अभिमान गीताची आनंदयात्रा सोमवारी सांयकाळी येथील राम गणेश गडकरी सभागृहामध्ये रंगली.अक्षर दालन आणि निर्धार यांच्या तर्फे आयोजित अक्षरगप्पांच्या शताब्दीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देअक्षर दालन आणि निर्धार यांच्या तर्फे आयोजित अक्षरगप्पांच्या शताब्दीनिमित्त कार्यक्रमराम गणेश गडकरी सभागृहामध्ये रंगली मराठी अभिमान गीताची आनंदयात्रा

कोल्हापूर : ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी’ या मराठी अभिमान गीताची आनंदयात्रा सोमवारी सांयकाळी येथील राम गणेश गडकरी सभागृहामध्ये रंगली.अक्षर दालन आणि निर्धार यांच्या तर्फे आयोजित अक्षरगप्पांच्या शताब्दीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषेविषयी आणि वास्तवाबाबत भाष्य करतानाच संगीतकार कौशल इनामदार यांनी त्यासाठी महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपण ही जबाबदारी पाड पाडली पाहिजे, असे आवाहन केले.एका मोबाईल कंपनीला फोन केल्यानंतर त्यांनी आम्ही मराठीत बोलू शकत नसल्याचे मुंबईत सांगणे, एका रेडिओ वाहिनीने आम्ही मराठी गाणी लावत नाही असे स्पष्टपणे सांगितल्याने माझा स्वाभिमान दुखावला व त्यातूनच मराठी अभिमान गीताची कल्पना सूचल्याचे इनामदार यांनी सांगितले.

अक्षर दालन आणि निर्धार यांच्यातर्फे आयोजित अक्षरगप्पांच्या शताब्दीनिमित संगीतकार कौशल इनामदार यांचा सोमवारी येथील राम गणेश गडकरी सभागृहामध्ये मराठी अभिमान गीतांच्या कार्यक्रमाला श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.(छाया : आदित्य वेल्हाळ)एकदा ही कल्पना सूचल्यानंतर दोन वर्षे यासाठी संशोधन आणि पाठपुरावा करीत तब्बल ११२ गायकांकडून हे गीत गाऊन घेतल्याचे सांगत त्यांनी या गीताच्या निर्मितीची चित्तरकथाच सांगितली. पुणे येथील मराठी साहित्य संमेलनात अमिताभ बच्चन यांनी या गीताच्या ओळी जाहीरपणे म्हटल्या. ही या अभिमान गीताला मोठी पावती दिल्याचे इनामदार यांनी सांगितले.मराठी भाषा संपत चालली आहे, अशी ओरड करण्यापेक्षा तिचा वापर वाढविला पािहजे. ती जबाबदारी आपल्यावरच आहे, असे सांगत इनामदार यांनी यावेळी अनेक उदाहरणे दिली. अस्मिता पांडे यांनी मुलाखत घेतली, तर मंदार गोगटे यांनी तबला साथ केली.यावेळी न्यू एज्युकेशन सोसायटीचे विनोदकुमार लोहिया, बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, सचिव दिलीप बापट, ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे, दिनेश वालावलकर, प्रा. भारत खराटे, राम देशपांडे, श्रीकांत नाईक, रजनी हिरळीकर, केशव स्वामी, सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. रवींद्र जोशी यांनी स्वागत, तर समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. मंजिरी जोशी यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाला ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे, डॉ. धनंजय गुंडे, सोनाली नवांगूळ, अनुराधा गुरव, अरुणा देशपांडे, अनमोल कोठाडिया, प्रभाकर कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmusicसंगीतcultureसांस्कृतिक