शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

मानवसेवा करणाऱ्यांच्या पाठीशी रहा

By admin | Updated: January 31, 2015 00:24 IST

विजय कुवळेकर : गडहिंग्लज येथे पंढरीनाथ सावंत, अनंतराव आजगावकर यांचा गौरव

गडहिंग्लज : स्वत:च्या स्वार्थापलीकडे बघणाऱ्या व तपस्वीवृत्तीने समाजाच्या भल्यासाठी झटणाऱ्यांमुळेच समाज घडतो. त्यामुळे अशा मानवसेवकांना समाजाने पाठबळ देण्याची, त्यांच्या पाठीशी राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी आज, शुक्रवारी केले.येथील सुभाष धुमे सेवा प्रतिष्ठानच्या सातव्या राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. आदर्श पत्रकार पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचा, तर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनंतराव आजगावकर यांचा प्रतिष्ठानतर्फे गौरव करण्यात आला.कुवळेकर म्हणाले, लालसा व भोगाच्या हव्यासामुळे माणुसकी कमी होत चालली आहे. भौतिक प्रगती झाली तरी नैतिकतेची कमतरता भासत आहे. अशावेळी शाश्वत मूल्यांशी ठाम राहून काम करणाऱ्यांची समाजाला गरज आहे. सगळ्या गोष्टी विकत घेता येतात, असा समज अलीकडे रूढ होत चालला आहे. त्यामध्ये विकत घेणाऱ्यांचा नाही, तर विकले जाणाऱ्यांचा दोष आहे. त्यासाठी स्वत:ची निष्ठा आणि धारणा ठाम असावी.यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, सुभाष धुमे, पंढरीनाथ सावंत यांचीही भाषणे झाली. तहसीलदार हनुमंत पाटील, प्राचार्य जे. बी. बारदेस्कर, राजेंद्र गड्यान्नावर, विलासराव बागी, अमरनाथ घुगरी, उज्ज्वला दळवी, नरेंद्र भद्रापूर, डॉ. विवेक पाटणे, ज्योती देशपांडे, अनुराधा पाटणे, आदी उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश कोळकी यांनी स्वागत केले. प्रा. स्वाती कोरी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुभाष कोरे यांनी मानपत्रांचे वाचन, सदानंद पुंडपळ यांनी सूत्रसंचालन, तर प्रा. पी. डी. पाटील यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)गांधीजींना श्रद्धांजली..!साधी राहणी व हयातभर पारदर्शक जीवन जगणाऱ्या आजगावकर सरांनी तपस्वी वृत्तीने समाजाची सेवा केली. त्याच भावनेतून धुमे व पंढरीनाथांनी पत्रकारिता केली. गांधीजींच्या पुण्यतिथी दिवशी त्यांचा गौरव झाला, हीच गांधीजींना खरी श्रद्धांजली आहे, असेही कुवळेकरांनी आवर्जून नमूद केले.नागरी सत्कारास नकारशासनाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल कुवळेकर यांचा मेमध्ये गडहिंग्लजला नागरी सत्कार करण्याचा मानस धुमे यांनी जाहीर केला. मात्र, त्यास कुवळेकर यांनी नम्रपणे नकार दिला. यावेळी श्रमिक पत्रकार संघ आणि बेळगाव मराठी पत्रकार संघातर्फे त्यांचा प्रा. पी. डी. पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला.