शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
3
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
4
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
5
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
6
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
7
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
8
"जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
9
"अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
10
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
11
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
12
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
13
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
14
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
15
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
16
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
17
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
18
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
19
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
20
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली

स्वच्छतेचा जागर व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:56 IST

भारत पाटील ‘गावांचे जरी उत्तम नसले! तरी देशाचे भविष्य ढासळले’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेमधील पंक्तीप्रमाणे खरंच अस्वच्छता ...

भारत पाटील‘गावांचे जरी उत्तम नसले! तरी देशाचे भविष्य ढासळले’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेमधील पंक्तीप्रमाणे खरंच अस्वच्छता ही गंभीर समस्या बनली आहे आणि म्हणूनच स्वच्छतेचा जागर व्हावा यासाठी सर्व स्तरांवरून विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. आपल्या देशात अनेक लोक, संस्था, शासन व गावांनी स्वच्छतेच्या दिशेने उचललेले पाऊल म्हणजे ग्रामीण विकासाला कलाटणी देणारे ठरले आहे. उ’ींल्ल’्रल्ली२२ ्र२ ल्ली७३ ३ङ्म ॠङ्म’्रिल्ली२२ या महात्मा गांधीजी यांच्या घोषवाक्यास अनुसरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी नेमकं मर्म ओळखून सर्व यंत्रणा स्वच्छतेच्या कार्याला लावली आहे. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच परिसर व सार्वजनिक स्वच्छतेलादेखील महत्त्व दिले पाहिजे. तरंच आपले शारीरिक व सामाजिक स्वास्थ्य टिकणार आहे आणि यासाठी आपण प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे. जसे वैयक्तिक स्वच्छतेमध्ये दररोज स्नान करणे, दात घासणे, हात साबणाने स्वच्छ धुणे, नखे काढणे, केसांची नीगा, घर स्वच्छता, परिसर स्वच्छता, पिण्याचे पाणी व्यवस्थापन या बाबी महत्त्वाच्या आहेत. तसेच सार्वजनिक स्वच्छता पण ग्रामसमृद्धीमधील अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यातील काही बाबी पुढीलप्रमाणे : १) पाणी व्यवस्थापन - ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समिती सक्षम असावी, गावांचे ६ं३ी१ अ४्रिि३ करावे, जलस्रोत परिसर स्वच्छ व शुद्ध ठेवावा, ळउछ चा नियमित वापर, पाणी गळती थांबविणे, शुद्ध पाणी नियमित पुरविणे. २) सांडपाणी व्यवस्थापन : गावांच्या व शहरांच्या सांडपाण्याची दुरवस्था झाल्यामुळे आपले ओढे व नद्या आपणच गटारगंगा केल्या आहेत. आपले जलस्रोत दूषित झाले आहेत. यासाठी शोषखड्डे, बंदिस्त गटारे, परसबाग, सांडपाण्याची शास्रशुद्ध विल्हेवाट लावणे, त्याचा शेतीसाठी पुनर्वापर. ३) शौचालय/मुतारी व्यवस्थापन : घरोघरी शौचालय व नियमित वापर. सार्वजनिक ठिकाणी पुरेशी शौचालय व मुतारी व्यवस्था असावी. याचे स्वच्छता व्यवस्थापन असावे. शाळा, कॉलेज, बसस्थानके, भाजी मंडई याठिकाणी वॉश बेसीन व पाण्याची सोय असावी. सार्वजनिक शौचालयांमधील मैला विल्हेवाट करून बायोगॅस व खतनिर्मिती करता येते. ४) घनकचरा व्यवस्थापन : सध्या कचरा ही सर्वांत मोठी डोक्याला त्रास देणारी समस्या झाली आहे. घरोघरी कचराकुंडी व ओला, सुका व प्लास्टिक कचऱ्याचे वर्गीकरण व विल्हेवाटची सवय असावी. कचरा उचलून नेण्याची सातत्यपूर्ण व स्वतंत्र व्यवस्था असावी. कचºयाचे नँडेप गांडूळ खत, कम्पोस्ट खत निर्मिती करणे. मेडिकल कचºयाची शास्रशुद्ध विल्हेवाट लावणे. ५) अपारंपरिक ऊर्जेचा वापर : सौर चूल, सौर पथदिवे, सोलर लाईट, सोलर वॉटर हिटर याचा प्रभावी वापर, प्लास्टिक बंदी, निर्र्धूर चूल व बायोगॅसचा सर्रास वापर आवश्यक. ६) पर्यावरण संवर्धन : वृक्षलागवड, जतन, संवर्धन करणे. टँगिग करून वृक्षलागवड नोंदवही ठेवणे. गावातील जलस्रोत बळकट करणे. पाणी आडवा..जिरवा, छतावरील पावसाचे पाणी, शिवकालीन पाणी साठवण तंत्राचा वापर. ७) घर/गाव/परिसर स्वच्छता : गावातील रस्ते, गल्ल्या, अंगण, सार्वजनिक ठिकाणे यांचे सतत स्वच्छता नियोजन. अन्नधान्य साठवणूक व पिण्याचे पाणी शास्रशुद्ध वापर, शालेय स्वच्छता इ. घटक महत्त्वाचे आहेत. वरील सर्व विषयांसंबंधी आपणाला नियोजनबद्ध काम केल्याशिवाय आपली गावं कधीही सुंदर, देखणी व निरोगी होणार नाहीत. अंग मेहनत, श्रमदान व स्वयंशिस्त या बाबी आपणाला अंगीकाराव्याच लागतील. ‘आपलं मनं स्वच्छ, तर आपलं घर स्वच्छ ’, ‘आपलं घर स्वच्छ, तरंच आपलं गांव स्वच्छ’ ही मानसिकता आपल्या अंगी यायलाच हवी. आपण सारे नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी वस्तू व पैसा दान देत असतो; परंतु आता आपला देश व आपला गाव आपल्याकडे श्रमाचे दान मागत आहे. ते ही आपल्या सर्वांच्या भल्यासाठीच. आपण श्रमदान केले तरंच आपली गांव स्वच्छ होणार आहेत. समृद्ध होणार आहेत. किमान महिन्यातील एक दिवस आपला काही वेळ गाव समृद्ध करण्यासाठी देता येईल का? श्रमदान करता येईल का? असा फक्त विचार करून चालणार नाही, तर या कार्यात मनापासून सहभागी व्हावं लागेल. शालेय मुलांमध्ये स्वच्छता, स्वयंशिस्त, श्रमसंस्कार, सिव्हील सेन्स आणावेच लागतील तरंच खेडी आपलं रूपडं बदलून निरोगी व सुदृढ होतील.(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्तीचळवळीतील बिनीचे कार्यकर्ते आहेत.)