शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
4
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
5
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
6
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
7
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
8
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
9
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
10
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
11
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
12
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
13
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
14
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
15
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
16
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
17
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
18
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
19
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
20
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा

स्वच्छतेचा जागर व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:56 IST

भारत पाटील ‘गावांचे जरी उत्तम नसले! तरी देशाचे भविष्य ढासळले’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेमधील पंक्तीप्रमाणे खरंच अस्वच्छता ...

भारत पाटील‘गावांचे जरी उत्तम नसले! तरी देशाचे भविष्य ढासळले’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेमधील पंक्तीप्रमाणे खरंच अस्वच्छता ही गंभीर समस्या बनली आहे आणि म्हणूनच स्वच्छतेचा जागर व्हावा यासाठी सर्व स्तरांवरून विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. आपल्या देशात अनेक लोक, संस्था, शासन व गावांनी स्वच्छतेच्या दिशेने उचललेले पाऊल म्हणजे ग्रामीण विकासाला कलाटणी देणारे ठरले आहे. उ’ींल्ल’्रल्ली२२ ्र२ ल्ली७३ ३ङ्म ॠङ्म’्रिल्ली२२ या महात्मा गांधीजी यांच्या घोषवाक्यास अनुसरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी नेमकं मर्म ओळखून सर्व यंत्रणा स्वच्छतेच्या कार्याला लावली आहे. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच परिसर व सार्वजनिक स्वच्छतेलादेखील महत्त्व दिले पाहिजे. तरंच आपले शारीरिक व सामाजिक स्वास्थ्य टिकणार आहे आणि यासाठी आपण प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे. जसे वैयक्तिक स्वच्छतेमध्ये दररोज स्नान करणे, दात घासणे, हात साबणाने स्वच्छ धुणे, नखे काढणे, केसांची नीगा, घर स्वच्छता, परिसर स्वच्छता, पिण्याचे पाणी व्यवस्थापन या बाबी महत्त्वाच्या आहेत. तसेच सार्वजनिक स्वच्छता पण ग्रामसमृद्धीमधील अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यातील काही बाबी पुढीलप्रमाणे : १) पाणी व्यवस्थापन - ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समिती सक्षम असावी, गावांचे ६ं३ी१ अ४्रिि३ करावे, जलस्रोत परिसर स्वच्छ व शुद्ध ठेवावा, ळउछ चा नियमित वापर, पाणी गळती थांबविणे, शुद्ध पाणी नियमित पुरविणे. २) सांडपाणी व्यवस्थापन : गावांच्या व शहरांच्या सांडपाण्याची दुरवस्था झाल्यामुळे आपले ओढे व नद्या आपणच गटारगंगा केल्या आहेत. आपले जलस्रोत दूषित झाले आहेत. यासाठी शोषखड्डे, बंदिस्त गटारे, परसबाग, सांडपाण्याची शास्रशुद्ध विल्हेवाट लावणे, त्याचा शेतीसाठी पुनर्वापर. ३) शौचालय/मुतारी व्यवस्थापन : घरोघरी शौचालय व नियमित वापर. सार्वजनिक ठिकाणी पुरेशी शौचालय व मुतारी व्यवस्था असावी. याचे स्वच्छता व्यवस्थापन असावे. शाळा, कॉलेज, बसस्थानके, भाजी मंडई याठिकाणी वॉश बेसीन व पाण्याची सोय असावी. सार्वजनिक शौचालयांमधील मैला विल्हेवाट करून बायोगॅस व खतनिर्मिती करता येते. ४) घनकचरा व्यवस्थापन : सध्या कचरा ही सर्वांत मोठी डोक्याला त्रास देणारी समस्या झाली आहे. घरोघरी कचराकुंडी व ओला, सुका व प्लास्टिक कचऱ्याचे वर्गीकरण व विल्हेवाटची सवय असावी. कचरा उचलून नेण्याची सातत्यपूर्ण व स्वतंत्र व्यवस्था असावी. कचºयाचे नँडेप गांडूळ खत, कम्पोस्ट खत निर्मिती करणे. मेडिकल कचºयाची शास्रशुद्ध विल्हेवाट लावणे. ५) अपारंपरिक ऊर्जेचा वापर : सौर चूल, सौर पथदिवे, सोलर लाईट, सोलर वॉटर हिटर याचा प्रभावी वापर, प्लास्टिक बंदी, निर्र्धूर चूल व बायोगॅसचा सर्रास वापर आवश्यक. ६) पर्यावरण संवर्धन : वृक्षलागवड, जतन, संवर्धन करणे. टँगिग करून वृक्षलागवड नोंदवही ठेवणे. गावातील जलस्रोत बळकट करणे. पाणी आडवा..जिरवा, छतावरील पावसाचे पाणी, शिवकालीन पाणी साठवण तंत्राचा वापर. ७) घर/गाव/परिसर स्वच्छता : गावातील रस्ते, गल्ल्या, अंगण, सार्वजनिक ठिकाणे यांचे सतत स्वच्छता नियोजन. अन्नधान्य साठवणूक व पिण्याचे पाणी शास्रशुद्ध वापर, शालेय स्वच्छता इ. घटक महत्त्वाचे आहेत. वरील सर्व विषयांसंबंधी आपणाला नियोजनबद्ध काम केल्याशिवाय आपली गावं कधीही सुंदर, देखणी व निरोगी होणार नाहीत. अंग मेहनत, श्रमदान व स्वयंशिस्त या बाबी आपणाला अंगीकाराव्याच लागतील. ‘आपलं मनं स्वच्छ, तर आपलं घर स्वच्छ ’, ‘आपलं घर स्वच्छ, तरंच आपलं गांव स्वच्छ’ ही मानसिकता आपल्या अंगी यायलाच हवी. आपण सारे नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी वस्तू व पैसा दान देत असतो; परंतु आता आपला देश व आपला गाव आपल्याकडे श्रमाचे दान मागत आहे. ते ही आपल्या सर्वांच्या भल्यासाठीच. आपण श्रमदान केले तरंच आपली गांव स्वच्छ होणार आहेत. समृद्ध होणार आहेत. किमान महिन्यातील एक दिवस आपला काही वेळ गाव समृद्ध करण्यासाठी देता येईल का? श्रमदान करता येईल का? असा फक्त विचार करून चालणार नाही, तर या कार्यात मनापासून सहभागी व्हावं लागेल. शालेय मुलांमध्ये स्वच्छता, स्वयंशिस्त, श्रमसंस्कार, सिव्हील सेन्स आणावेच लागतील तरंच खेडी आपलं रूपडं बदलून निरोगी व सुदृढ होतील.(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्तीचळवळीतील बिनीचे कार्यकर्ते आहेत.)