शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

पाण्याचे नमुने तपासण्याचे काम युद्धपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 15:12 IST

पूर ओसरल्यानंतर पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत ३६३ गावांमधील ६८१ पाणी नमुने तपासण्यात आले असून, त्यांपैकी ८४ ठिकाणचे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. सात प्रयोगशाळांमध्ये हे पाण्याचे नमुने तपासण्याचे काम अथकपणे सुरू आहे.

ठळक मुद्देपाण्याचे नमुने तपासण्याचे काम युद्धपातळीवर६८१ नमुन्यांपेकी ८४ नमुने अयोग्य, सात प्रयोगशाळांमध्ये तपासणी

कोल्हापूर : पूर ओसरल्यानंतर पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत ३६३ गावांमधील ६८१ पाणी नमुने तपासण्यात आले असून, त्यांपैकी ८४ ठिकाणचे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. सात प्रयोगशाळांमध्ये हे पाण्याचे नमुने तपासण्याचे काम अथकपणे सुरू आहे.जिल्ह्यातील ३६३ गावे ही पुरामुळे बाधित झाली असून, या अनेक गावांमधील पाणी योजना पाण्यात गेल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांमधील पाणीपुरवठा बंद झाला होता. एकीकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून योजना सुरू करण्यात येत असताना, मूळ स्रोतांतील पाणी पिण्यायोग्य आहे का, याची खात्री झाल्याशिवाय गावात पाणीपुरवठा करू नये, अशा सक्त सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.त्यानुसार या सर्व गावांमधून १४ आॅगस्टपासून पाणी उतरेल तसे पाण्याचे नमुने तपासण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ६८१ नमुने तपासल्यानंतर त्यामधील ८४ नमुने अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी पाणी शुद्धिकरणासाठीची प्रक्रिया आणखी सुरू करण्यात आली असून, त्यानंतर पुन्हा नमुने तपासले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांनी दिली.गडहिंग्लज, कोडोली, शिरोळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यालय, सोळांकूर या पाच प्रयोगशाळांव्यतिरिक्त मुख्यालयात पुण्याहून एक टीम आली असून, या सात प्रयोगशाळांच्या माध्यमातून हे नमुने तपासले जात आहेत. शुद्ध पाण्याचे महत्त्व ओळखलेले ग्रामस्थही अशुद्ध पाणी पिणे टाळत असून, अनेक गावांमध्ये बसवण्यात आलेल्या खासगी शुद्धिकरण प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विभागामार्फत बसविण्यात आलेल्या ४० गावांमध्येही शुद्धिकरण प्रकल्पांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असल्याचे जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाचे उपअभियंता उत्तम थोरात यांनी सांगितले.

अयोग्य पाण्याच्या ठिकाणी फलक लावण्याच्या सूचनाज्या गावातील ज्या स्रोतातील पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे, तेथे ‘हे पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे’ असे फलक लावण्याच्या सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी ही माहिती दिली. 

 

टॅग्स :Waterपाणीzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर