शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे नमुने तपासण्याचे काम युद्धपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 15:12 IST

पूर ओसरल्यानंतर पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत ३६३ गावांमधील ६८१ पाणी नमुने तपासण्यात आले असून, त्यांपैकी ८४ ठिकाणचे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. सात प्रयोगशाळांमध्ये हे पाण्याचे नमुने तपासण्याचे काम अथकपणे सुरू आहे.

ठळक मुद्देपाण्याचे नमुने तपासण्याचे काम युद्धपातळीवर६८१ नमुन्यांपेकी ८४ नमुने अयोग्य, सात प्रयोगशाळांमध्ये तपासणी

कोल्हापूर : पूर ओसरल्यानंतर पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत ३६३ गावांमधील ६८१ पाणी नमुने तपासण्यात आले असून, त्यांपैकी ८४ ठिकाणचे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. सात प्रयोगशाळांमध्ये हे पाण्याचे नमुने तपासण्याचे काम अथकपणे सुरू आहे.जिल्ह्यातील ३६३ गावे ही पुरामुळे बाधित झाली असून, या अनेक गावांमधील पाणी योजना पाण्यात गेल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांमधील पाणीपुरवठा बंद झाला होता. एकीकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून योजना सुरू करण्यात येत असताना, मूळ स्रोतांतील पाणी पिण्यायोग्य आहे का, याची खात्री झाल्याशिवाय गावात पाणीपुरवठा करू नये, अशा सक्त सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.त्यानुसार या सर्व गावांमधून १४ आॅगस्टपासून पाणी उतरेल तसे पाण्याचे नमुने तपासण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ६८१ नमुने तपासल्यानंतर त्यामधील ८४ नमुने अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी पाणी शुद्धिकरणासाठीची प्रक्रिया आणखी सुरू करण्यात आली असून, त्यानंतर पुन्हा नमुने तपासले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांनी दिली.गडहिंग्लज, कोडोली, शिरोळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यालय, सोळांकूर या पाच प्रयोगशाळांव्यतिरिक्त मुख्यालयात पुण्याहून एक टीम आली असून, या सात प्रयोगशाळांच्या माध्यमातून हे नमुने तपासले जात आहेत. शुद्ध पाण्याचे महत्त्व ओळखलेले ग्रामस्थही अशुद्ध पाणी पिणे टाळत असून, अनेक गावांमध्ये बसवण्यात आलेल्या खासगी शुद्धिकरण प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विभागामार्फत बसविण्यात आलेल्या ४० गावांमध्येही शुद्धिकरण प्रकल्पांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असल्याचे जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाचे उपअभियंता उत्तम थोरात यांनी सांगितले.

अयोग्य पाण्याच्या ठिकाणी फलक लावण्याच्या सूचनाज्या गावातील ज्या स्रोतातील पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे, तेथे ‘हे पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे’ असे फलक लावण्याच्या सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी ही माहिती दिली. 

 

टॅग्स :Waterपाणीzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर