शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे नमुने तपासण्याचे काम युद्धपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 15:12 IST

पूर ओसरल्यानंतर पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत ३६३ गावांमधील ६८१ पाणी नमुने तपासण्यात आले असून, त्यांपैकी ८४ ठिकाणचे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. सात प्रयोगशाळांमध्ये हे पाण्याचे नमुने तपासण्याचे काम अथकपणे सुरू आहे.

ठळक मुद्देपाण्याचे नमुने तपासण्याचे काम युद्धपातळीवर६८१ नमुन्यांपेकी ८४ नमुने अयोग्य, सात प्रयोगशाळांमध्ये तपासणी

कोल्हापूर : पूर ओसरल्यानंतर पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत ३६३ गावांमधील ६८१ पाणी नमुने तपासण्यात आले असून, त्यांपैकी ८४ ठिकाणचे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. सात प्रयोगशाळांमध्ये हे पाण्याचे नमुने तपासण्याचे काम अथकपणे सुरू आहे.जिल्ह्यातील ३६३ गावे ही पुरामुळे बाधित झाली असून, या अनेक गावांमधील पाणी योजना पाण्यात गेल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांमधील पाणीपुरवठा बंद झाला होता. एकीकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून योजना सुरू करण्यात येत असताना, मूळ स्रोतांतील पाणी पिण्यायोग्य आहे का, याची खात्री झाल्याशिवाय गावात पाणीपुरवठा करू नये, अशा सक्त सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.त्यानुसार या सर्व गावांमधून १४ आॅगस्टपासून पाणी उतरेल तसे पाण्याचे नमुने तपासण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ६८१ नमुने तपासल्यानंतर त्यामधील ८४ नमुने अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी पाणी शुद्धिकरणासाठीची प्रक्रिया आणखी सुरू करण्यात आली असून, त्यानंतर पुन्हा नमुने तपासले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांनी दिली.गडहिंग्लज, कोडोली, शिरोळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यालय, सोळांकूर या पाच प्रयोगशाळांव्यतिरिक्त मुख्यालयात पुण्याहून एक टीम आली असून, या सात प्रयोगशाळांच्या माध्यमातून हे नमुने तपासले जात आहेत. शुद्ध पाण्याचे महत्त्व ओळखलेले ग्रामस्थही अशुद्ध पाणी पिणे टाळत असून, अनेक गावांमध्ये बसवण्यात आलेल्या खासगी शुद्धिकरण प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विभागामार्फत बसविण्यात आलेल्या ४० गावांमध्येही शुद्धिकरण प्रकल्पांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असल्याचे जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाचे उपअभियंता उत्तम थोरात यांनी सांगितले.

अयोग्य पाण्याच्या ठिकाणी फलक लावण्याच्या सूचनाज्या गावातील ज्या स्रोतातील पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे, तेथे ‘हे पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे’ असे फलक लावण्याच्या सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी ही माहिती दिली. 

 

टॅग्स :Waterपाणीzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर