शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

पानिपत शौर्ययात्रेचे ७ जानेवारीपासून आयोजन: विश्वास पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:01 IST

महाराष्ट्राचा इतिहास पानिपतच्या लढाईचा उल्लेख झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. एकाच दिवसात नर आणि पशूसंहार झालेले हे जगातील सर्वांत मोठे युद्ध होते. या लढाईत मराठ्यांची हार झाली असली, तरी त्यांनी गाजवलेले शौर्य कालातीत आहे. विजयाची हार गळ्यात पडण्याआधी त्यांनी मान टाकली. हा इतिहास नव्या पिढीला कळावा, यासाठी मंगळवार, दि. ७ जानेवारीपासून काढण्यात येणाऱ्या पानिपत शौर्य यात्रेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी केले.

ठळक मुद्देपानिपत शौर्ययात्रेचे ७ जानेवारीपासून आयोजन: विश्वास पाटील मराठ्यांच्या शौर्याची गाथा सांगणारी पानिपतची लढाई

कोल्हापूर : महाराष्ट्राचा इतिहास पानिपतच्या लढाईचा उल्लेख झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. एकाच दिवसात नर आणि पशूसंहार झालेले हे जगातील सर्वांत मोठे युद्ध होते. या लढाईत मराठ्यांची हार झाली असली, तरी त्यांनी गाजवलेले शौर्य कालातीत आहे. विजयाची हार गळ्यात पडण्याआधी त्यांनी मान टाकली. हा इतिहास नव्या पिढीला कळावा, यासाठी मंगळवार, दि. ७ जानेवारीपासून काढण्यात येणाऱ्या पानिपत शौर्य यात्रेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी केले.पानिपत येथील युद्धामध्ये धारातीर्थी पडलेल्या शूरवीरांना वंदन करण्यासाठी कोल्हापुरातून ७ ते १४ जानेवारी दरम्यान पानिपत शौर्ययात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत युद्धावेळी ज्या ज्या मार्गाने मराठे गेले होते, जेथे त्यांचे पडाव पडले होते, त्या उदगीर, परतूर, बुऱ्हाणपूर, देवास, गुना, ग्वाल्हेर, कुरुक्षेत्र येथे छावणीस थांबून तेथील इतिहास समजून घेतला जाणार आहे. ही शौर्ययात्रा १४ तारखेला पानिपत येथे पोहोचेल.पानिपतच्या इतिहासाबद्दल पाटील म्हणाले, शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर ज्याची छाती भरून येत नाही आणि पानिपतचे नाव घेतल्यावर ज्याच्या डोळ्यांत पाणी येत नाही, तो मराठी माणूस नाही. मराठ्यांचे सर्वश्रेष्ठ गुण आणि दुर्गूण सांगणारी ही लढाई आहे. दुर्दैवाने तीन दिवसांपासून उपाशीपोटी लढत असलेले सैनिक तीव्र सूर्यकिरणे सहन करू शकले नाहीत. अखेर एक लाख सैनिक शत्रूशी लढता लढता मेले. भाऊसाहेबांच्या मदतीला निघालेल्या पेशव्यांनी ख्याली खुशाली आणि रंगबाजीत वेळ घालविला नसता, तर कदाचित मराठे ही लढाई जिंकले असते.इंद्रजित नागेशकर म्हणाले, विठ्ठलाच्या ओढीने ज्याप्रमाणे वारी निघते त्याचप्रमाणे संक्रांतीच्या कालावधीत पानिपतचे शौर्य अनुभवण्यासाठी तरुणाईने या मोहिमेत सहभागी व्हावे. इतिहासाला उजाळा देणाºया स्थळाला पर्यटनाचे स्वरूप यावे, अशी आमची इच्छा आहे. सोलापूर, औरंगाबाद, लातूर, उदगीर, परतूर या ठिकाणाच्या विविध संघटना व स्थानिक लोकांनी यात्रेच्या स्वागतासाठी तयारी सुरू केली आहे.नाव नोंदणीसाठी ग्रॅव्हिटी, आॅफिस नं. ४, पहिला मजला, स्टार टॉवर, पाच बंगला शाहूपुरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परिषदेस विश्वजित जाधव, पवन जामदार, राहुल मगदूम, विवेक मंद्रुपकर उपस्थित होते. 

 

टॅग्स :Vishwash Patilविश्वास पाटील kolhapurकोल्हापूर