शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
2
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
3
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
4
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
5
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
6
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
7
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
8
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
9
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
10
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
11
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
12
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
13
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
14
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
15
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
16
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
17
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
18
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
19
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
20
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध

पानिपत शौर्ययात्रेचे ७ जानेवारीपासून आयोजन: विश्वास पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:01 IST

महाराष्ट्राचा इतिहास पानिपतच्या लढाईचा उल्लेख झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. एकाच दिवसात नर आणि पशूसंहार झालेले हे जगातील सर्वांत मोठे युद्ध होते. या लढाईत मराठ्यांची हार झाली असली, तरी त्यांनी गाजवलेले शौर्य कालातीत आहे. विजयाची हार गळ्यात पडण्याआधी त्यांनी मान टाकली. हा इतिहास नव्या पिढीला कळावा, यासाठी मंगळवार, दि. ७ जानेवारीपासून काढण्यात येणाऱ्या पानिपत शौर्य यात्रेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी केले.

ठळक मुद्देपानिपत शौर्ययात्रेचे ७ जानेवारीपासून आयोजन: विश्वास पाटील मराठ्यांच्या शौर्याची गाथा सांगणारी पानिपतची लढाई

कोल्हापूर : महाराष्ट्राचा इतिहास पानिपतच्या लढाईचा उल्लेख झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. एकाच दिवसात नर आणि पशूसंहार झालेले हे जगातील सर्वांत मोठे युद्ध होते. या लढाईत मराठ्यांची हार झाली असली, तरी त्यांनी गाजवलेले शौर्य कालातीत आहे. विजयाची हार गळ्यात पडण्याआधी त्यांनी मान टाकली. हा इतिहास नव्या पिढीला कळावा, यासाठी मंगळवार, दि. ७ जानेवारीपासून काढण्यात येणाऱ्या पानिपत शौर्य यात्रेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी केले.पानिपत येथील युद्धामध्ये धारातीर्थी पडलेल्या शूरवीरांना वंदन करण्यासाठी कोल्हापुरातून ७ ते १४ जानेवारी दरम्यान पानिपत शौर्ययात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत युद्धावेळी ज्या ज्या मार्गाने मराठे गेले होते, जेथे त्यांचे पडाव पडले होते, त्या उदगीर, परतूर, बुऱ्हाणपूर, देवास, गुना, ग्वाल्हेर, कुरुक्षेत्र येथे छावणीस थांबून तेथील इतिहास समजून घेतला जाणार आहे. ही शौर्ययात्रा १४ तारखेला पानिपत येथे पोहोचेल.पानिपतच्या इतिहासाबद्दल पाटील म्हणाले, शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर ज्याची छाती भरून येत नाही आणि पानिपतचे नाव घेतल्यावर ज्याच्या डोळ्यांत पाणी येत नाही, तो मराठी माणूस नाही. मराठ्यांचे सर्वश्रेष्ठ गुण आणि दुर्गूण सांगणारी ही लढाई आहे. दुर्दैवाने तीन दिवसांपासून उपाशीपोटी लढत असलेले सैनिक तीव्र सूर्यकिरणे सहन करू शकले नाहीत. अखेर एक लाख सैनिक शत्रूशी लढता लढता मेले. भाऊसाहेबांच्या मदतीला निघालेल्या पेशव्यांनी ख्याली खुशाली आणि रंगबाजीत वेळ घालविला नसता, तर कदाचित मराठे ही लढाई जिंकले असते.इंद्रजित नागेशकर म्हणाले, विठ्ठलाच्या ओढीने ज्याप्रमाणे वारी निघते त्याचप्रमाणे संक्रांतीच्या कालावधीत पानिपतचे शौर्य अनुभवण्यासाठी तरुणाईने या मोहिमेत सहभागी व्हावे. इतिहासाला उजाळा देणाºया स्थळाला पर्यटनाचे स्वरूप यावे, अशी आमची इच्छा आहे. सोलापूर, औरंगाबाद, लातूर, उदगीर, परतूर या ठिकाणाच्या विविध संघटना व स्थानिक लोकांनी यात्रेच्या स्वागतासाठी तयारी सुरू केली आहे.नाव नोंदणीसाठी ग्रॅव्हिटी, आॅफिस नं. ४, पहिला मजला, स्टार टॉवर, पाच बंगला शाहूपुरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परिषदेस विश्वजित जाधव, पवन जामदार, राहुल मगदूम, विवेक मंद्रुपकर उपस्थित होते. 

 

टॅग्स :Vishwash Patilविश्वास पाटील kolhapurकोल्हापूर